०६ जुलै २०२०

लॉर्ड वेव्हेल

☘  कार्यकाळ

(१९४३-१९४७)

🌷  ऑक्टोबर, १९४३  मध्ये लॉर्ड वेव्हेलने व्हाइसरॉय पदाची सूत्रे घेतली. वेव्हेलच्या काळात द्वितीय महायुद्ध समाप्त  झाले.

🌷   वेव्हेलने राजकीय पेचप्रसंग सोडविण्यासाठी जून १९४५ मध्ये सर्वपक्षीय बैठक सिमला  येथे बोलवली.

🍁   इंग्लंडच्या मजूर पक्षाने भारतात  १९४६ मध्ये कॅबिनेट मिशन पाठविले.

☘   कॅबिनेट मिशनच्या शिफारशीने निवडणुका होऊन २ सप्टेंबर, १९४६ रोजी नेहरूंचे हंगामी सरकार  स्थापन झाले. भारतात घटना समितीच्या बठकांस सुरुवात झाली.

🍁  आझाद हिंदी सेनेच्या सनिकांच्या फाशीच्या शिक्षा जनमताच्या दबावामुळे व्हाइसरॉय वेव्हेलला रद्द कराव्या लागल्या. पंतप्रधान अ‍ॅटलीने भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा केली.

☘  भारतीय घटनात्मक पेचप्रसंग सोडविण्याच्या वादात वेव्हेलला राजीनामा द्यावा लागला.

🌿🌿🍂🍂🌿🌿🍂🍂🌿🌿🍂🍂🌿🌿🍂

बेहरामजी मलबारी

👉मेहरवानजी यांचा मलबार किनारपट्टीवरून मसाले व सुगंधी द्रव्ये आणून सुरतमध्ये विकण्याचा व्यवसाय होता; त्यामुळे त्यांना मलबारी म्हणून ओळखले जात असे.

👉बेहरामजी यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सुरतमधील आयरिश प्रेझबिटेरिअन  मिशन स्कूलमध्ये झाले. ते १८७१ मध्ये शालांत परीक्षा उत्तीर्ण झाले. मिशनरी शाळेत शिकलेल्या बेहरामजींवर रेव्हरंड डॉ. विल्सन यांच्या विचारांचा व व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव होता. बेहरामजी पुढे मुंबईला आले व होरमुसजी जहांगीर यांच्या मालकीच्या शाळेमध्ये शिक्षक म्हणून रुजू झाले (१८७६).

👉बेहरामजी यांचा विवाह धनबाईजी यांच्याशी झाला (१८७४). त्यांना तीन मुले व दोन मुली होत्या.

👉समाजसुधारणेच्या कार्यात आयुष्यभर स्वत:स वाहून घेणारे बेहरामजी यांनी पत्रकार म्हणूनही ख्याती मिळविली. प्रसिद्ध पारशी व्यावसायिक सर कासवजी जहांगीर यांनी बेहरामजी यांची ओळख टाइम्स ऑफ इंडियाचे संपादक मार्टीन वूड यांच्याशी करून दिली. तेव्हापासून त्यांच्या पत्रकारितेतील कार्याची सुरुवात झाली.

👉पुढे वूड यांनी बॉम्बे गॅझेट हे साप्ताहिक सुरू केले. या साप्ताहिकामधून बेहरामजी यांनी गुजरात आणि गुजरातीज  ही  लेखमाला लिहिली. तसेच इंडियन स्पेक्टॅटर या साप्ताहिकामधून त्यांनी स्तंभलेखन करण्यास सुरुवात केली. इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक त्यांनी विकत घेतले (१८७९) व अखेरपर्यंत त्यांनी संपादक म्हणून काम केले.

👉दादाभाई नवरोजी व विल्यम वेडरबर्न यांनी चालविलेल्या व्हॉइस ऑफ इंडिया या नियतकालिकामध्येही त्यांनी लेखन केले. ईस्ट अँड वेस्ट या नियतकालिकाचेही ते संपादक होते (१९०१–१२).

👉बेहरामजी हे एक उत्तम गुजराती कवी होते. त्यांनी सन १८७५ मध्ये नितिविनोद हा काव्यसंग्रह प्रसिद्ध केला.

👉यात त्यांनी बालविवाहाचे दुष्परिणाम व बालविवाहाच्या प्रथेतून महिलांवर लादले गेलेले वैधव्य यांबाबतच्या आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. १८७६ मध्ये त्यांनी इंडियन म्यूज इन इंग्लिश गार्ब हा इंग्रजी काव्यसंग्रह प्रसिद्ध केला. याचबरोबर गुजरात अँड गुजरातीज (१८८२), द इंडियन आय ऑन इंग्लिश लाइफ (१८९१), सोशल रिफॉर्म इन इंडिया : इट्स स्कोपॲन्ड इम्पॉर्टन्स (१८८६), ॲन अपील फ्रॉम द डॉटर्स ऑफ इंडिया (१८९०) हे त्यांचे उल्लेखनीय ग्रंथ. त्यांनी आपल्या लेखनाद्वारे भारतीय स्त्रियांचा सामाजिक दर्जा वाढविण्याचा सातत्याने प्रयत्न केला. शिवाय त्यांनी बालविवाहाला कडाडून विरोध करत विधवांच्या पुनर्विवाहाचे जोरदार समर्थन केले. 

👉बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य – काही टिपणे (१८८४) या लेखातून त्यांनी बालवैधव्यावर प्रकाश टाकला. १८८४–१८९१ या कालखंडात बेहरामजी मलबारी यांनी चालविलेल्या व्यापक आंदोलनामुळे ब्रिटिश शासनाला संमती वयाचा कायदा (१८९१, द एज ऑफ कन्सेन्ट ॲक्ट) संमत करावा लागला.

👉जर्मन प्राच्यविद्यापंडित माक्स म्यूलर यांच्या हिबर्ट व्याख्यानमालेतील ऑरिजिन अँड ग्रोथ ऑफ रिलिजन (१८७८) या भाषणांचा बेहरामजी यांनी गुजराती भाषेत अनुवाद केला (१८८१).

👉बेहरामजी यांचा म्यूलर यांच्याशी पत्रव्यवहार होता. समाजसुधारक दयाराम गिडूमल यांच्या सहकार्याने मुंबई येथे त्यांनी ‘सेवासदनʼ ही संस्था स्थापन केली (११ जुलै १९०८).

👉 सामाजिक, शैक्षणिक व वैद्यकीय सुविधांच्या माध्यमातून निराश्रित व अनाथ स्त्रियांचा विकास घडवून आणणे हे या संस्थेचे ध्येय होते. मुंबईप्रमाणेच अहमदाबाद व सुरत येथेही ‘सेवासदन’च्या शाखा स्थापन करण्यात आल्या.

👉बेहरामजी यांनी क्षयरुग्णांसाठी कन्सम्पटिव्ह होम्स सोसायटीची स्थापना केली. या सोसायटीच्या माध्यमातून १९०९ मध्ये सिमला रोडवरील धर्मपूर या ठिकाणी ‘किंग एडवर्ड सॅनिटेरियम’ सुरू केले. यामुळे अनेक रुग्णांना फायदा झाला. या सोसायटीला पतियाळा, ग्वाल्हेर आणि बिकानेर येथील राजांनी आर्थिक मदत केली होती..

👉बेहरामजी यांना मुंबई विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली (१८८७), तसेच १८९६च्या दुष्काळात केलेल्या कार्याबद्दल ब्रिटिश सरकारकडून कैसर-ए-हिंद या पदवीने त्यांना सन्मानित करण्यात आले (१९००). १८८५ मध्ये मुंबई येथे झालेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये ते सहभागी झाले होते.

👉सिमला येथे त्यांचे निधन झाले.

🍁☘🌷🍁☘🌷🍁☘🌷🍁🌷🍁☘🌷

महाराष्ट्रातील जिल्ह्यांना जोडणारे इतर राज्यांच्या 🏳 सीमा

         

१) मध्य प्रदेश 🐯 :-
नंदूरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया..

२) कर्नाटक 🌮 :-
कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, नांदेड..

३) आंध्र प्रदेश 🍂 :-
गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड..

४) गुजरात 🌾 :-
ठाणे, नाशिक, नंदूरबार, धुळे..

५) दादरा, नगर-हवेली 🏄🏼 :-
ठाणे, नाशिक..

६) छत्तीसगड ⛰:-
गोंदिया, गडचिरोली..

७) गोवा 🌴:-
सिंधुदुर्ग..

ब्राह्मो समाज

🦋🦋 ब्राह्मो समाजाची उद्दिष्टे 🦋🦋

🌿  हिंदू धर्माचे शुद्धीकरण करुन भारतीय लोकांना खऱ्या धर्माच्या तत्त्वाची ओळख करुन देणे.

🌷  समाजातील अनिष्ट रुढी, प्रथा, परंपरा, चालीरीती नाहीशा करणे.

🌿  ख्रिश्चन मिशनऱ्यांच्या हिंदू धर्मावरील टीकेला व धर्मांतरास विरोध करणे आणि त्यांच्या धर्म प्रसार कार्यास शह देणे.

🌷  हिंदू धर्मात आणि समाजात सुधारणा घडवून आणणे.

🦋🦋  ब्राह्मो समाजाचे तत्त्वज्ञान  🦋🦋

🌷  एकेश्वरवाद   : ईश्वर हा एकच असून तो निर्गुण, निराकार आहे. ईश्वर हा या अनंत जगाचा निर्माता व नियत्ता आहे. त्या निराकार अशा ईश्वराची उपासना करावी. ईश्वराच्या उपासनेसाठी कोणत्याही कर्मकांडाची जरुरी नाही.

🌿  मूर्तीपूजेस विरोध  : मूर्तीपूजेला विरोध केला. ईश्वराचे अस्तित्त्व मूर्तीत अथवा वस्तूत नसल्यामुळे मूर्तीपूजा करू नये.

🌷  बंधुत्त्वाची भावना : ईश्वर हा आपणा सर्वांचा पिता आहे. म्हणून आपण सर्वजण एकमेकांचे बंधू आहोत.

🌿  अवतारवादास विरोध : ईश्वर हा निराकार असल्यामुळे तो साकार होऊ शकत नाही. त्यामुळे अवतारवादाची कल्पना भ्रामक व चुकीची आहे.

🌷  आत्म्याचे अमरत्त्व : आत्मा हा अमर असून तो आपल्या कृत्याबद्दल फक्त ईश्वरालाच जबाबदार असतो.

🌿  सर्व धर्मातील ऐक्य  : नीतीमत्ता, सदाचार, मानवाबद्दलचे प्रेम, भूतदया यामुळे विविध धर्मात ऐक्य निर्माण होते.

🌷  विश्वबंधुत्त्वावर श्रद्धा : ब्राह्मो समाज सर्व धर्मातील तत्त्वज्ञानाचा आदर करतो. त्याची निंदा करत नाही. त्यामुळे विश्वबंधुत्वावर श्रद्धा आहे.

🌿  प्रेम, परोपकार, सेवा : धर्माचा खरा अर्थ प्रेम, परोपकार, सेवा असा आहे, हे गृहीत धरुन एकमेकांशी व्यवहार करावेत.

🌿🌿🌷🌷🌿🌿🌷🌷🌿🌿🌷🌷🌿🌿🌷🌷

🦋🦋 देवेद्रनाथ टागोरांचे कार्य 🦋🦋

🌷  राजा राममोहन रॉय यांच्या निधनानंतर ब्राह्मो समाजाला नवचैतन्य देण्याचे कार्य देवेंद्रनाथ टागोरांनी केले.

🌿   त्यांनी ब्राह्मो समाजात  १८३८ मध्ये प्रवेश केला.

🌷   इ. स. १८३८ साली त्यांनी तत्त्वबोंधिनी सभा  स्थापन केली.

☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷☘🌷

🦋🦋  केशवचंद्र सेन 🦋🦋

🌿  केशवचंद्र सेन यांच्या कार्यपद्धतीमुळे ब्राह्मो समाजास नवी दिशा मिळाली.

🌷  त्यांनी ब्राह्मो समाजाचा प्रसार उत्तर प्रदेश, पंजाब, मद्रास प्रांतात केला.

🌿  केशवचंद्रांनी आंतरजातीय व विधवा विवाहाचा  पुरस्कार केला.

🌿🌿🌿🌿🌷🌷🌿🌿🌿🌿🌷🌷🌿🌿🌿

🦋🦋  ब्राह्मो समाजात फूट 🦋🦋

देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले.
केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजातून इ. स. १८६६ मध्ये बाहेर पडले व त्यांनी भारतीय ब्राह्मो समाज स्थापन करुन समाज कार्य सुरू केले.

               🌿🌿🌿🌷🌷🌿🌿🌿

देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्त्वाखाली असणारा समाज आदि ब्राह्मो समाज  या नावाने कार्य करू लागला.

इ. स. १८७८ मध्ये केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजात फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी आपल्या १३ वर्षे वय असणाऱ्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजाबरोबर वैदिक पद्धतीने लावून दिला. त्यांनी स्वत:च सिव्हिल मॅरेज ॲक्टचा भंग केल्याने शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, शिवचंद्र दत्त, उमेशचंद्र दत्त यासारखे जहाल तरुण ब्राह्मो समाजात फूट पडली .

             🌿🌿🌷🌷🌷🌿🌿🌿

देवेंद्रनाथ टागोर आणि केशवचंद्र सेन यांच्यात तात्त्विक मतभेद निर्माण झाले. केशवचंद्र सेन हे ब्राह्मो समाजातून इ. स. १८६६ मध्ये बाहेर पडले व त्यांनी ‘भारतीय ब्राह्मो समाज’ स्थापन करुन समाज कार्य सुरू केले.

देवेंद्रनाथ टागोरांच्या नेतृत्त्वाखाली असणारा समाज आदि ब्राह्मो समाज या नावाने कार्य करू लागला.

            🌿🌿🌷🌷🌷🌿🌿🌿

इ. स. १८७८ मध्ये केशवचंद्र सेन यांच्या भारतीय ब्राह्मो समाजात फूट पडली. केशवचंद्र सेन यांनी आपल्या १३ वर्षे वय असणाऱ्या मुलीचा विवाह कुचबिहारच्या राजाबरोबर वैदिक पद्धतीने लावून दिला. त्यांनी स्वत:च सिव्हिल मॅरेज ॲक्टचा भंग केल्याने शिवनाथ शास्त्री, आनंद मोहन बोस, शिवचंद्र दत्त, उमेशचंद्र दत्त यासारखे जहाल तरुण भारतीय ब्राह्मो समाजातून बाहेर पडले व त्यांनी १८७८ मध्ये ‘साधारण ब्राह्मो समाज स्थापना केला.

🌿🌿🌿🌿🌷🌷🌷🌿🌿🌿🌿🌷🌷🌿🌷

भारतीय राष्ट्रवादाच्या वाढीला सहाभूत घटक


( Factors favouring Growth of Indian Nationalism)

1)ब्रिटिश सत्तेचा उदय

2)भारताचे राजकीय ऐक्य

3)भारतात शांततेची व प्रशासकीय ऐक्याची निर्मिती

4)दळणवळण व संचार साधनाचा जलद विकास

5)आधुनिक शिक्षणाचा प्रसार

6)आधुनिक वृत्तपत्र उदय

7) सामाजिक व धार्मिक चळवळींचे स्वरूप

8) वंशवाद

9) आर्थिक शोषण

G2G तरतुदीनुसार अफगाणिस्तान आणि लेबनॉनकडे गहूची निर्यात केली जाणार

- गव्हर्नमेंट टू गव्हर्नमेंट (G2G) तरतुदीनुसार भारताने सुमारे एक लक्ष टन गहू लेबनॉन व अफगाणिस्तान या देशांकडे निर्यात करणार असल्याची घोषणा केली आहे. राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) लेबनॉनकडे 40 हजार टन गहू तर अफगाणिस्तानकडे 50 हजार टन गहू निर्यात करणार.

- 2020 साली भारतात 106.21 दशलक्ष टन एवढे गहूचे विक्रमी उत्पन्न घेतले जाण्याचे अपेक्षित आहे.

- शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या उद्देशाने कृषी मंत्रालयाने जादा शेतमाल निर्यात करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. देशात गहूचे उत्पन्न जास्त आहे, परंतु जास्त दरामुळे भारतीय गहू जागतिक बाजारपेठेतून बाहेर पडले आहे. आता भारत सरकार मानवतावादी कार्याच्या आधारावर आशियाई आणि आफ्रिकी देशांकडे गहू निर्यात करीत आहे.

- राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (NAFED) लिमिटेड ही कृषी उत्पादनांसाठी विपणन सहकारी संस्थांची एक शीर्ष संस्था आहे, जी भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या अंतर्गत कार्य करते.

- त्याची स्थापना 2 ऑक्टोबर 1958 रोजी झाली आणि त्याचे मुख्यालय नवी दिल्लीत आहे.

- लेबनॉन हा पश्चिम आशियातला एक देश आहे. बेरूत हे देशाचे राजधानी शहर आहे आणि लेबनानी पाउंड हे राष्ट्रीय चलन आहे.

- अफगाणिस्तान हा आशियाच्या साधारणतः मध्यभागी असलेला एक भूपरिवेष्टित देश आहे. काबुल हे देशाचे राजधानी शहर आहे आणि अफगाणिस्तानी अफगाणी हे राष्ट्रीय चलन आहे.

आशियाई विकास बँक भारताच्या मदत

- आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलरची (१६५०० कोटी रुपये ) मदत करोनाचा सामना करण्यासाठी देण्याचे ठरवले आहे. या बँकेचे अध्यक्ष मासत्सुगु असाकावा यांनी भारताच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांना करोना विरोधात लढण्यासाठी २.२ अब्ज डॉलर म्हणजे १६५०० कोटी रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.

- असाकावा यांनी सीतारामन यांना दूरध्वनी करून भारताने करोनाविरोधात केलेल्या प्रयत्नांची प्रशंसा केली आहे. त्याचबरोबर

- कर कपात व इतर सवलतींसह १.७ लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेचेही स्वागत केले आहे. २६ मार्च रोजी सीतारामन यांनी ही १.७ लाख कोटींची मदत योजना जाहीर केली होती.

- आसाकावा यांनी म्हटले की, आशियाई विकास बँकेने भारताला २.२ अब्ज डॉलर्सची मदत देण्याचे ठरवले असून त्यातून असंघटित क्षेत्रातील कामगारांना मदत करता येईल. लघु व मध्यम उद्योगांना सावरण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. गरज वाटल्यास आशियाई विकास बँक भारताला आणखी आर्थिक मदत देईल. बँकेने याआधी भारतासह काही देशांना ६.५ अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली होती. आशियाई विकास बँकेची स्थापना १९६६ मध्ये करण्यात आली होती. आशिया व पॅसिफिकमधील एकूण ६८ देश या बँकेचे सदस्य आहेत.

- सीमाभागांमध्ये सतर्क राहण्याचे गृहमंत्र्यांचे बीएसएफला निर्देश

- पाकिस्तान व बांगलादेशसोबत लागून असलेल्या सीमांवर, विशेषत: कुंपण नसलेल्या भागांमध्ये सतर्कता वाढवावी, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सीमा सुरक्षा दलाला (बीएसएफ) दिले आहेत. गृहमंत्र्यांनी या दोन्ही सीमांवरील सुरक्षाविषयक स्थितीचा गुरुवारी आढावा घेतला.

- या दोन्ही आघाडय़ांवर सीमेपलीकडून कुठलीही हालचाल होणार नाही हे सुनिश्चित करण्याचे निर्देश त्यांनी बीएएसएफला दिले, असे मंत्रालयातील सहसचिव पुण्यसलील श्रीवास्तव यांनी पत्रकारांना सांगितले.

बेरोजगारीचा दर वाढून 23.4 टक्के झाला: CMIE

- सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) या संस्थेनी कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेवरील मंदीचा प्रभाव पाहता बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे.

- या आकडेवारीनुसार, मार्च महिन्याच्या मध्याकाळात भारतात बेरोजगारीचा दर वाढून 8.40 टक्क्यांवरून 23.4 टक्के झाला आहे.

- तर शहरी भागात बेरोजगारीचा दर वाढून 30.90 टक्के इतका झाला आणि एकूणच हा दर 23.4 टक्क्यांवर पोहचलेला आहे.

- सेंटर फॉर मॉनिटरींग इंडिया इकोनॉमी (CMIE) ही एक अग्रणी व्यवसायिक माहिती कंपनी आहे जिची स्थापना 1976 साली झाली. मुंबईत संस्थेचे मुख्यालय आहे आणि एस. ए. दवे हे कंपनीचे विद्यमान अध्यक्ष आहेत.

‘जन औषधी सुगम’ मोबाइल अॅप

- कोविड-19 महामारीशी लढा देण्यासाठी प्रधानमंत्री जन औषधी केंद्राचे “स्वास्थ के सिपाही” या नावाने ओळखले जाणारे औषधविक्रेते भारत सरकारच्या प्रधानमंत्री जनौषधी परीयोजनेच्या (PMBJP) अंतर्गत रुग्णांच्या आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी अत्यावश्यक सेवा आणि औषधे वितरीत करीत आहेत. या उपक्रमाच्या माध्यमातून ते सरकारच्या सामाजिक अंतराच्या उपक्रमाला पाठबळ देत आहेत.

- सर्वसामान्य नागरिकांना निकटचे जनौषधी केंद्र शोधण्यासाठी आणि औषधांच्या किंमतीसह त्यांची उपलब्धता तपासण्यासाठी “जन औषधी सुगम” हे मोबाईल अ‍ॅप तयार करण्यात आले आहे.

- जन औषधी केंद्र, भारत सरकारचे रसायन व खते मंत्रालय, औषधनिर्मिती विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या भारतीय फार्मा PSU विभागाद्वारे हा उपक्रम राबविला जात. सध्या देशभरातल्या 726 जिल्ह्यांमध्ये 63000 केंद्रे कार्यरत आहेत.

राज्यावर अर्थसंकट


विषाणूमुळे तब्बल ३५ हजार कोटींचा तोटा; महसुलात मोठी घट
करोनाच्या साथीमुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने उद्योग-व्यापार उदीम, घरांची खरेदी-विक्री असे सर्वच आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने राज्य सरकारच्या तिजोरीला करोनाचे चटके बसले असून मार्च २०१९ च्या तुलनेत यंदा मार्च मध्ये जवळपास २५ हजार कोटींचा फटका बसला.

- आर्थिक वर्षांचा विचार करता २०१९-२० मध्ये अपेक्षित महसुलापेक्षा सुमारे ३५ हजार कोटींचा फटका बसला आहे.
गेल्या आर्थिक वर्षांचा जमा-खर्चाचा तपशील आता मंत्रालयात मांडण्यात येत आहे. त्यानुसार महसुलात मोठी घट झाली आहे. पेट्रोलियम पदार्थांच्या विक्रीवरील मूल्यवर्धित कराच्या माध्यमातून ३८ हजार ६६ कोटी रुपयांची अपेक्षा होती. पण त्यात ४३६ कोटी रुपये कमी मिळाले.मुळात अर्थव्यवस्थेत थोडी मंदी असल्याने वस्तू व सेवा कराची वसुली कमी राहिली. त्यात करोनाच्या साथीमुळे आणखी फटका बसला. करोनामुळे टाळेबंदी जाहीर झाल्याने आर्थिक व्यवहार ठप्प झाले. त्याचा मोठा परिणाम मार्चमधील महसुलावर झाला.
परिस्थिती काय?

* मार्च २०१९ मध्ये राज्य सरकारच्या तिजोरीत सुमारे ४२ हजार कोटी रुपयांचा महसूल जमा झाला होता.

-  यंदा उद्योग-व्यापार घरांची खरेदी-विक्री, उत्पादन शुल्क, इंधनावरील कर अशा सर्वच आघाडय़ांवरील महसूल आटला आणि मार्च २०२० मध्ये राज्याच्या तिजोरीला अवघे १७ हजार कोटी रुपये मिळाले.

-  म्हणजेच सुमारे २५ हजार कोटींचा फटका एकटय़ा मार्च महिन्यात आपल्याला बसला आहे. सरत्या आर्थिक वर्षांचा विचार केला तर सुमारे ३५ हजार कोटी रुपयांचा फटका बसला, अशी माहिती अर्थ विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.
सारी अनिश्चितता.. वस्तू व सेवा करातून राज्याला २०१९-२० मध्ये १ लाख ३ हजार ७६० कोटी रुपयांचा महसूल अपेक्षित होता. प्रत्यक्षात त्यातून ८२ हजार ५९० कोटी रुपये मिळाले. हा २१ हजार १७० कोटी रुपयांचा फटका बसला.

-  अर्थात केंद्र सरकारकडून त्याची भरपाई अपेक्षित असली तरी ती कधी मिळेल हे याची सद्यस्थितीत खात्री देता येत नाही.

विशिष्ठ विषयाच्या अभ्यासाला काय म्हणतात.

● हवामनाचा अभ्यास - मीटिअरॉलॉजी

● रोग-आजार यांचा अभ्यास - पॅथॉलॉजी

● ध्वनींचा अभ्यास - अॅकॉस्टिक्स

● ग्रह-तार्यांचा अभ्यास -अॅस्ट्रॉनॉमी

● वनस्पतीचा अभ्यास - बॉटनी

● मानवीवर्तनाचाअभ्यास - सायकॉलॉजी

● प्राणी जीवांचा अभ्यास - झूलॉजी

●पृथ्वीच्या पृष्ठभागाचा अभ्यास -जिऑलॉजी

● कीटकजीवनाचा अभ्यास - एन्टॉमॉलॉजी

● धातूंचा अभ्यास - मेटलर्जी

● भूगर्भातील पदार्थांचा अभ्यास -मिनरॉलॉजी

● जिवाणूंचा अभ्यास -बॅकेटेरिओलॉजी

● विषाणूंचा अभ्यास - व्हायरॉलॉजी

● हवाई उड्डाणाचे शास्त्र - एअरॉनाटिक्स

● पक्षीजीवनाचाअभ्यास -ऑर्निथॉलॉजी

●सरपटनार्याप्राण्यांचे शास्त्र - हर्पेटलॉलॉजी

● आनुवांशिकतेचा अभ्यास - जेनेटिक्स

● मज्जासंस्थेसंबंधीचा अभ्यास - न्यूरॉलॉजी

● विषासंबंधीचा अभ्यास - टॉक्सिकॉलॉजी

● ह्रदय व त्यांची कार्ये यांच्याशी संबंधीत शास्त्र - कार्डिऑलॉजी

● अवकाश प्रवासशास्त्र -अॅस्ट्रॉनॉटिक्स

● प्राणी शरीर शास्त्र -अॅनाटॉमी

● मानववंशशास्त्र (मानव जातीचा अभ्यास) -अँथ्रापॉलॉजी

● जीव-रसायनशास्त्र - बायोकेमिस्ट्री

● सजीवानसंबंधीचा अभ्यास (जीवशास्त्र) - बायोलॉजी

● रंगविज्ञानाचे शास्त्र - क्रोमॅटिक्स

●मानववंशासंबंधीचा अभ्यास - एथ्नॉलॉजी

● उद्यानरोपन, संवर्धन व व्यवस्थापन यांचे शास्त्र - हॉर्टिकल्चर

● शरीर-इंद्रिय-विज्ञानशास्त्र - फिजिअॉलॉजी

● फलोत्पादनशास्त्र -पॉमॉलॉजी

● मृतप्राणी भूसा भरून ठेवण्याचा शास्त्र - टॅक्सीडर्मी

● भूपृष्ठांचा अभ्यास - टॉपोग्राफ

प्रश्न मंजुषा


१.  भारतात १९७४ मध्ये सर्वप्रथम दगडी कोळशाचे उत्पादन कोठे घेण्यात आले ?

१. राणीगंज व विरभूम✅
२. झरिया व खेत्री
३. ब्राम्हणी व देवगढ
४. बोकारो व राजमहाल

२. स्वयंपाकाच्या गँसचे (एल.पी.जी) प्रमुख घटक कोणते ?

१. मिथेन व आयसो मिथेन
२. ईथेन व आयसो ईथेन
३. ब्युटेन व आयसो ब्युटेन ✅
४. प्रोपेन व आयसो प्रोपेन

३.  अमेरिकेच्या जपानवरील दुस-या बाँम्बहल्याबाबत शहर,  बाँम्ब, विमान व त्याच्या पायलटचे नाव अनुक्रमे काय होते ?

१. हिरोशिमा, लिटिल बाँय, बाँकस्कार, चार्लस स्विनी
२. नागासाकी, फँट मँन, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
३. हिरोशिमा, लिटिल बाँय, इनोला गे, पाँल तिब्बेट्स
४. नागासाकी, फँट मँन, बाँकस्कार, चार्लस स्विनी ✅

५.  जोड्या लावा :
अ. हेन्री बेक्केरेल।     १. पहिल्या अणु चाचणीचा जनक

ब. आँटो हाँन।         २. पहिल्या अणुभट्टीची बांधणी

क. एन्रिको फर्मी।     ३. किरणोत्सारितेचा शोध

ड. ओपेनहायमर।     ४. केंद्रकीय विखंडनाचा शोध

१. अ-३, ब-४, क-२, ड-१ ✅
२. अ-३, ब-२, क-४, ड-१
३. अ-१, ब-४, क-२, ड-३
४. अ-१, ब-२, क-४, ड-३

६.  भारतात विकसित झालेले 'तेजस' हे काय आहे ?

१. पायदळ लढाऊ विमान
२. हलके लढाऊ विमान ✅
३. वैमानिकरहित लक्ष्य विमान
४. जेट ट्रेनर

७.  राष्ट्रीय सुरक्षा व रणनितीबद्दल प्रशिक्षण देणारी देशातील एकमेव संस्था कोणती ?

१. नँशनल डिफेन्स काँलेज, न्यू दिल्ली✅
२. नँशनल डिफेन्स अँकँडमी, खडकवासला पुणे
३. राष्ट्रीय इंडियन मिलिटरी काँलेज, डेहराडून
४. इंडियन मिलिटरी अँकँडेमी, डेहराडून

८.  जगातील पहिला इलेक्ट्रानिक संगणक कोणी तयार केला ?

१. हरमन होलोरिथ
२. हाँवर्ड एकेन✅
३. थिओडोर मँमन
४. के.आर. पोर्टर

९.  भारतात इंटरनेट सेवा खाजगी व्यक्तींना उपलब्ध करून देण्यास सुरूवात केव्हा पासून झाली ?

१. १५ आँगस्ट १९९३
२. १५ आँगस्ट १९९५✅
३. १५ आँगस्ट १९९७
४. १५ आँगस्ट १९९९

१०.  योग्य विधान निवडा :

१. इंटरनेट हे जगातील संगणकाच्या जाळ्यांचे जाळे आहे.
२. इंटरनेटचे कोठेही मुख्यालय नाही.
३. इंटरनेटचे मध्यवर्ती व्यवस्थापन संयुक्त राष्ट्रसंघामार्फत चालविले जाते.✅
४. इंटरनेटचे भविष्यकालिन कोणतेही धोरण नाही.

११.  जोड्या लावा :

अ. विक्रम साराभाई स्पेस सेंटर।           १. बँगलोर

ब. इस्रो सँटलाईट सेंटर।         २. अहमदाबाद

क. सतिष धवन स्पेस सेंटर।               ३. थुंबा

ड. स्पेस अँप्लिकेशन सेंटर।             ४. श्रीहरीकोटा

१. अ-३, ब-२, क-३, ड-१
२. अ-२, ब-१, क-३, ड-४
३. अ-३, ब-१, क-४, ड-२✅
४. अ-२, ब-३, क-४, ड-१

१२.  पुणे येथील सी-डँक या संस्थेने सुपर काँम्प्युटरचा शिक्षण, संशोधन, व्यापार, इ.क्षेत्रात वापर जनसुलभ व्हावा यासाठी निर्माण केलेल्या  भारताच्या पहिल्या कमी किमतीच्या सुपर काँम्प्युटरचे नाव काय आहे ?

१. परम आनंद
२. परम अनंत✅
३. परम सुलभ
४. परम तेज

१३.  १९३३ मध्ये स्थापन झालेल्या इंडियन नँशनल एअरवेज ने भारतात सर्वप्रथम हवाई सेवा कोणत्या दोन शहरांदरम्यान सुरू केली ?

१. कलकत्ता - हावडा
२. मुंबई - दिल्ली
३. कराची - लाहोर✅
४. मुंबई - ठाणे

१४.  पुणे येथील 'आयुका' या संस्थेमध्ये कोणत्या विषयांवरील संशोधन केले जाते ?
अ. अँस्ट्राँनाँमी।       ब. अँस्ट्राँलाँजी।          क. अँस्ट्रोफिजिक्स

१. अ आणि ब
२. ब आणि क
३. अ आणि क✅
४. अ, ब, आणि क

१५.  'मिसाईल वुमेन' (missile women) म्हणून कोणास ओळखले जाते ?

उत्तर : श्रीमती टेसी थाँमस यांना missile woman तसेच 'अग्निपूत्री' म्हणून ओळखले जाते.
त्या अग्नि-४ या क्षेपणास्त्राच्या प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत होत्या. त्याची पहिली चाचणी १५ नोव्हेंबर २०११ रोजी ओडिशा किना-याजवळील व्हिलर बेटावरून घेण्यात आली.
〰〰〰〰〰〰〰〰〰〰

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...