०५ जुलै २०२०

महान महिला वैज्ञानिक-मेरी क्युरी

    जन्म-7 नोव्हेंबर 1867 (पोलंड)

🔸मेरी क्युरी या पोलिश-फ्रेंच भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ होत्या....
🔸१८९५ साली त्यांचा विवाह पिएरे क्युरी यांच्याशी झाला.तेही संशोधक-शास्त्रज्ञ होते...
🔸मेरी आणि पिएरे क्युरी या दाम्पत्याने पिचब्लेंडसारखी खनिजं युरेनियमपेक्षाही जास्त प्रमाणात किरणोत्सारी असतात,हे दाखवून दिलं.
🔸मेरी यांनी पिचब्लेंडमधून मोठय़ा प्रमाणात किरणोत्सारी पदार्थ वेगळा करून एक नवं मूलद्रव्य तयार केलं...
🔸या नव्या मूलद्रव्यास मेरी यांनी आपल्या पोलंड या जन्मदेशावरून ‘पोलोनियम’ असं नाव दिलं...
🔸पुढे मेरी आणि पिएरे क्युरी यांना पोलोनियमपेक्षाही जास्त किरणोत्सारी असं ‘रेडियम’ नावाचं मूलद्रव्य सापडलं. १९०३ साली मेरी आणि त्यांचे पती पिएर क्युरी तसेच हेन्री बेक्वेरेल यांना भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक विभागून दिलं गेलं...
🔸रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीविषयी त्यांचे संशोधन क्रांतिकारी आणि मूलभूत ठरले. त्या पॅरिस विद्यापीठामध्ये पहिल्या महिला प्रोफेसर होत्या...
🔸नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या पहिल्या महिला आहेत, 2 वेगवेगळ्या विज्ञानांसाठी नोबेल पारितोषिक मिळवणा-या त्या एकमेव महिला आहेत...
🔸त्यांचे सर्वात मोठे शोध म्हणजे रेडिओ अ‍ॅक्टिव्हिटीचा शोध,रेडिओ अ‍ॅक्टिव्ह मूलद्रव्याला वेगळे करणे आणि पोलोनियम व रेडियम या दोन मूलद्रव्यांचा शोध...
🔸रसायनशास्त्रातील कामगिरीबद्दल मेरी ला १९११ साली दुसऱ्यांदा नोबेल पारितोषिक...
🔸यांच्या मार्गदर्शनाखाली जगात प्रथम शरीरावरच्या सुजेवर रेडिओ अ‍ॅक्टिव्ह मूलद्रव्यांचा वापर करून उपचार...
🔸मेरी यांनी पहिल्या महायुद्धाच्या काळात युद्ध जखमींसाठी क्ष-किरण व्हॅन उभारली,क्ष-किरण यंञे पुरवली तसेच क्ष-किरण यंत्रे चालवण्याचं प्रशिक्षणही दिलं.
🔸यांनी रसायनशास्त्र आणि भौतिकशास्त्र त्यांना मिळालेल्या नोबेल पुरस्काराच्या प्रीत्यर्थ मागचे 2011 हे वर्ष आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष म्हणून साजरे...
🔸मेरी क्युरी यांना रेडीयेशनचे दुष्परिणाम स्वतःला टाळता न आल्याने ४ जुलै १९३४ या दिवशी ल्युकेमियाने झाला...
🔸पुढे क्युरी दांम्पत्याची मुलगी इरीन ज्युलीयट-क्युरी व जावई फ्रेडरिक ज्युलीयट या दांपत्यास रसायनशास्त्राचा नोबेल 1935 मध्ये मिळाला(for their discovery of artificial radioactivity)...
   

गुलजारीलाल नंदा

🔸 भारताचे दोन वेळा प्रत्येकी 13-13 दिवसांसाठी पंतप्रधान...
🔸साधं राहणीमान असणारे पंतप्रधान म्हणलं की डोळ्यासमोर येतात ते लालबहादूर शास्त्री...
👉निर्विवादपणे लालबहादूर शास्त्री याचं राहणीमानं अगदी साधच होतं,पण त्यांच्यासारखेच अजून एक पंतप्रधान भारताला लाभले.दुर्देवाने त्यांची कारकिर्द कार्यवाहक पंतप्रधानाची असल्याने त्यांचे किस्से त्यांच्या कथा खूप कमी वाचायला मिळाल्या असतील...

🔸गुलजारीलाल नंदा हे नाव आठवतय. MPSC,UPSC करणाऱ्या मुलांना देखील गुलजारीलाल नंदा म्हणल्यानंतर कोणाच्या अगोदर आणि कोणाच्या नंतर किती दिवस कार्यवाहक पंतप्रधान होते या पलिकडे त्यांची माहिती नसावी...

👉गुलजारीलाल नंदा एक सरळ साधं व्यक्तिमत्व होतं ज्यांनी फक्त आणि फक्त आपल्या जबाबदाऱ्या संभाळल्या.पैशाचा मोह नाही कि सत्तेचा मोह नाही.कदाचित राजकारणाच्या पारदर्शक काळात देखील त्यांना जमवून घेणं अनेकांना जड जात होतं...

🔸शेवटच्या दिवसांमध्ये पेन्शनसाठी अर्ज केला होता.गुलजारीलाल नंदा यांनी आपल्या शेवटच्या काळात स्वातंत्रसैनिकांची पेन्शन मिळावी यासाठी अर्ज केला होता.आज त्यांचा जन्मदिन...

मूलभूत अधिकार आणि इतर वैधानिक हक्कांमधील फरक

१ मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाच्या प्रकरणात, एखादी व्यक्ती अनुच्छेद under२ च्या अंतर्गत थेट सर्वोच्च न्यायालयात जाऊ शकते आणि अंमलबजावणी करू शकते
तर इतर हक्कांच्या बाबतीत, व्यक्ती कलम २२6 अंतर्गत उच्च न्यायालयात किंवा अधीनस्थ न्यायालयात जाऊ शकते.

न्यायालयीन आढावा

न्यायालयीन पुनरावलोकनाच्या तरतुदी घटनेत स्पष्ट व स्वतंत्रपणे नमूद केलेली नाहीत परंतु त्यांचा उत्पत्ति सुप्रीम कोर्टाच्या [अनुच्छेद 32] आणि उच्च न्यायालयाच्या अधिकारांमध्ये आहे. या अधीनस्थ न्यायालयांना या अधिकाराचा प्रवेश नाही, ही न्यायालये कोणत्याही कायद्याला घटनेचे उल्लंघन करण्यापर्यंत बेकायदेशीर घोषित करू शकतात. हे पुनरावलोकन करण्याची शक्ती विधिमंडळ तसेच कार्यकारी परिषदेविरूद्ध वापरली जाऊ शकते.

भारतीय राज्यघटनेचा भाग तीन

घटनेचे तीन प्रमुख भाग आहेत. भाग १ मध्ये संघ आणि त्यातील प्रांत व त्यांची राज्ये व त्यांचे हक्क याबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. दुसर्‍या भागात नागरिकत्वाचा विषय सांगितला गेला आहे की ज्याला भारतीय नागरिक म्हणण्याचा अधिकार आहे व नाही. जे परदेशात राहतात त्यांना भारतातील नागरिकांचे हक्क मिळू शकतात आणि ज्यांना ते शक्य नाही. तिसर्‍या भागात भारतीय राज्यघटनेने दिलेल्या मूलभूत हक्कांचा विषय सविस्तरपणे सांगितला आहे.

घटना भाग 1 संघ आणि त्याचा प्रदेश

भारत जो भारत आहे तो राज्यांची संघटना आहे

[१] युनियनची स्थापना राज्यांच्या कराराने केली जात नाही, म्हणून त्यांना युनियन मधून बाहेर पडण्याचा अधिकारही नाही, त्यामुळे संघ अविनाशी आहे.

[२] केंद्रशासित केंद्राशी संबंधित केवळ ती राज्येच त्याचा भाग आहेत आणि केंद्रशासित प्रदेश
कलम not मध्ये असे म्हटले नाही की राज्याचे नाव, प्रदेश आणि हद्दी बदलण्याचा अधिकार संसदेला आहे, परंतु संसद घटनेत वर्णन केलेल्या नियमांनी बांधील आहे. अंमलबजावणी करेल जेव्हा हे विधेयक संसदेमध्ये आणले जाईल जेव्हा राष्ट्रपती परवानगी देतील तेव्हा राष्ट्रपती परवानगी देण्यापूर्वी ते संबंधित राज्याच्या विधिमंडळाकडे पाठवू शकतात, परंतु त्यांनी व्यक्त केलेल्या मताला ते बांधील नाहीत किंवा विधिमंडळ हे विधेयक कायमचे थांबवू शकत नाही. ठेवू शकतो संसदेने या विधेयकात कोणतीही दुरुस्ती केली तरी ती पुन्हा विधिमंडळात पाठविली जाणार नाही. हे विधेयक संसदेच्या दोन्ही सभागृहात सोप्या बहुमताने मंजूर होईल.आजपर्यंत मंजूर झालेल्या विधेयकांपैकी सर्वात महत्त्वपूर्ण विधेयक म्हणजे राज्य पुनर्निर्माण अधिनियम 1956. या तरतुदीमुळे भारत हे विभाज्य राज्यांचे एक अविभाज्य संघ आहे.

घटना भाग 2 नागरिकत्व

कोणत्याही देशात राहणारे लोक नागरिक आणि परदेशी अशा दोन भागात विभागले गेले आहेत. एक नागरिक म्हणजे जो राजकीय समाजाचा भाग आहे आणि घटनेत आणि इतर कायद्यांमध्ये दिलेल्या सर्व फायद्यांचा फायदा घेतो , केवळ नागरिकतेच्या मूलभूत सूचनाच
राज्यघटनेखाली दिल्या जातात , जसे की

१ सर्व नागरिकांसाठी समान नागरिकत्व
२ राज्यघटना अस्तित्वात आल्यावर भारताचे नागरिक कोण होते
या तत्त्वांच्या आधारे संसदेने भारतीय नागरिक कायदा  1955 संमत केला होता, हा कायदा भारतीय नागरिकांची स्थिती निश्चित करतो.  1986 मध्ये याची पुन्हा दुरुस्ती करण्यात आली, त्यात बदल करूनच सरकार दुहेरी नागरिकतेची तरतूद करू शकते.

घटना भाग 3 मूलभूत हक्क

मूलभूत अधिकार म्हणजे नागरिकांचे हक्क, ते अमेरिकन घटनेच्या हक्क विधेयकातून घेतले जातात. या अधिकारांना मौलिका म्हणून मानण्याचे कारण म्हणजे- <बीआर 1 एखाद्या व्यक्तीसाठी त्यांची उपस्थिती आवश्यक आहे जेणेकरून
या हक्कांच्या अनुपस्थितीत कोणताही देश लोकशाही होऊ शकत नाही. हे अधिकार भारतीय घटनेचा आधार मानले जातात
नागरी हक्क आणि मानवाधिकार एखाद्या व्यक्तीच्या सन्माननीय अस्तित्वासाठी आवश्यक असलेले
हक्क मानवाधिकार म्हणतात परंतु घटना मानवाधिकार जे मानवी हक्क म्हणतात त्यांना नागरी हक्क म्हणतात सर्व नागरी हक्क मानवाधिकार आहेत परंतु सर्व मानवी हक्क नागरी हक्क नाहीत.
नागरी हक्क कायदा आणि लागू करून Prrwty आहेत

1 हे हक्क व्यक्तींकडून उपभोग्य आहेत आणि ते राज्याविरूद्ध दिले आहेत, वैयक्तिक किंवा खाजगी संस्थेच्या विरोधात नाहीत [क्रियाकलाप, अस्पृश्यतेचे हक्क अपवाद आहेत]
2 हे हक्क राज्य अधिकारांवर नियंत्रण ठेवतात आणि राज्याला एकुलता होण्यापासून प्रतिबंधित करतात
3 व्यक्ती त्यांचा वापर करतात, परंतु ते अप्रासंगिक नाही, त्यांच्यावर संबंधित दंडात्मक
कारवाईचा आकार लावला जाऊ शकतो 4 विशिष्ट परिस्थितींमध्ये राष्ट्राची सुरक्षा आणि सार्वभौमत्व, परदेशी देशांशी मैत्रीचे संबंध, मागासवर्गीयांचे आर्थिक-शैक्षणिक उत्थान
, अनुसूचित जमातीचे हितसंबंध.
हे हक्क संरक्षण, सार्वजनिक सुव्यवस्था, नैतिकता, शांतता इमारतीच्या सार्वजनिक हितासाठी नियंत्रित केले जाऊ शकतात.

खासगी प्रवासी रेल्वेसेवा २०२३पासून.

➡️देशातील १०९ मार्गावरील प्रवासी रेल्वेसेवा खासगी कंपन्यांकडे सुपूर्द करण्याचा प्रस्ताव कार्यान्वित झाला असून ही खासगी सेवा एप्रिल २०२३ मध्ये प्रत्यक्षात येईल, अशी माहिती रेल्वेमंडळाचे अध्यक्ष व्ही.के. यादव यांनी गुरुवारी दिली. ‘मेड इन इंडिया’ धोरणाला प्राधान्य दिले जाणार असल्याने देशी खासगी कंपन्यांना अग्रक्रम असेल.

➡️रेल्वे मंत्रालयाने बुधवारी १०९ रेल्वेमार्गावर १५१ रेल्वे गाडय़ांच्या व्यवस्थापनासाठी खासगी कंपन्यांकडून अर्ज मागवले आहेत. या प्रकल्पामध्ये ३० हजार कोटींची गुंतवणूक अपेक्षित आहे. त्याला काँग्रेसने मात्र विरोध दर्शवला आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रेल्वे मंत्रालयाच्या या धोरणावर टीका केली. केंद्र सरकारने रेल्वेच्या खासगीकरणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल असून लोक केंद्राला माफ करणार नाहीत, अशी टिप्पणी त्यांनी केली.

➡️या रेल्वे १६ डब्यांच्या असतील व कमाल १६० किमी वेगाने धावतील. त्यामुळे कमीत कमी वेळेत प्रवास होऊ शकेल. रेल्वेचा चालक आणि गार्ड रेल्वे विभागांकडून दिले जातील. मात्र, गाडय़ांच्या देखभालीची जबाबदारी खासगी कंपनीची असेल. पात्रता सिद्ध झालेल्या खासगी कंपन्यांना ३५ वर्षांसाठी नियुक्त रेल्वेमार्गाची जबाबदारी दिली जाईल. रेल्वेच्या एकूण प्रवासीसेवांमध्ये खासगी प्रवासी सेवांचे प्रमाण फक्त ५ टक्के असेल.

चालू घडामोडी प्रश्नसंच

• प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेमध्ये  (PM-KISAN) सामील न झालेले.................... भरततील एकमेव राज्य
- पश्चिम बंगाल.

• खादी व ग्रामोद्योग आयोग (KVIC) सह सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने ................... ही मोहीम सुरु केली आहे.
– सोलार चरखा मिशन.

• लिवेबल अँड सस्टेनेबल सिटीज: अॅडॉप्टिंग टू ए डिसरप्टेड वर्ल्ड” या विषयाखाली ‘जागतिक शहरे शिखर परिषद-2020’ .................या देशात 5 ते 9 जुलै 2020 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.
- सिंगापूर.

• ....................या भारतीय कंपनीने भूतान देशात पहिले पेट्रोल पंप चालू केला
- हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL).

• कोरोना विषाणूच्या चाचण्या घेण्यासाठी परवाना मिळविणारी पहिली खासगी कंपनी – रोशे डायग्नोस्टिक्स इंडिया (स्विस).

• ..................या राज्य सरकारने आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाचे राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळामध्ये विलय करण्याचा निर्णय घेतला
- महाराष्ट्र.

• राज्य आणि केंद्र सरकारांच्या वित्तीय एकत्रीकरणाच्या मार्गदर्शकांचा आढावा घेण्यासाठी वित्त आयोगाने ............ यांच्या अध्यक्षतेखाली 8 सदस्यांची समिती नेमली
– एन. के. सिंग (15व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष).

• कोरोना विषाणूमुळे त्रस्त झालेल्या व्यवसाय क्षेत्रांसाठी मदत निधीबाबत निर्णय घेण्यासाठी पंतप्रधानांनी...........  यांच्या नेतृत्वाखाली 'COVID-19 आर्थिक प्रतिसाद कार्य दल' गठित करण्याची घोषणा केली
- वित्तमंत्री निर्मला सीतारमण.

• UN च्या जागतिक आनंद अहवालानुसार, जगातला सर्वात आनंदी देश
- फिनलँड (सलग तिसरे वर्ष).

• भारत जगातला ____ सर्वात मोठा वीज उत्पादक देश आहे आणि वर्ष 2017 मध्ये तो दरडोई वापराच्या बाबतीत 106व्या क्रमांकावर आहे
- तिसरा.

• 5 कोटी आदिवासी उद्योजकांचे रूपांतराचा TRIFEDचा अनोखा प्रकल्प
- “टेक फॉर ट्राइबल”.

• मुंबई उच्च न्यायालयाचे नवे मुख्य न्यायाधीश
- न्यायमूर्ती भूषण प्रद्युम्न धर्माधिकारी.

फ्रान्सच्या पंतप्रधानांचा राजीनामा

पॅरिस : फ्रान्सचे पंतप्रधान एदुआर्द फिलीप यांनी राजीनामा दिला असून त्यांच्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे. हा फेरबदल अपेक्षित मानला जात होता.

अध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी त्यांच्या उर्वरित दोन वर्षांच्या कारकीर्दीत नवा अध्याय सुरू करण्याचे ठरवले असून फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेचे पुनरुत्थान करण्याचे ठरवले आहे. सध्या करोनामुळे फ्रान्सच्या अर्थव्यवस्थेला खूप मोठा धक्का बसला आहे.

स्थानिक वृत्तपत्रांना दिलेल्या मुलाखतीत मॅक्रॉन यांनी म्हटले आहे की, देशाची फेरउभारणी करण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत त्यासाठी नवा मार्ग वापरावा लागेल. रविवारच्या पालिका निवडणुकीपूर्वी तसेच  करोना काळात मॅक्रॉन यांच्यावर टीका झाली होती. त्यामुळे मतदानापूर्वीच त्यांनी खांदेपालटाचे संकेत दिले होते.

मॅक्रॉन यांच्या पक्षाला निवडणुकीत अनेक मोठय़ा शहरात पराभवाचा फटका बसला आहे. ग्रीन पार्टीने त्यात आघाडी  घेतली.  मार्च व एप्रिलमध्ये करोनाची साथ शिखरावस्थेत होती त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली.

फुलपाखरांचे मराठी नामकरण!

अतिशय देखणा, रंगीबेरंगी आणि आबालवृद्धांना अगदी क्षणात आपलेसे करणारा कीटक म्हणजे फुलपाखरू! आपल्या सौंदर्याची भुरळ सर्व मानवजातीला घालणारी फुलपाखरे जैवसाखळीतील अत्यंत महत्त्वपूर्ण घटक आहेत.

२२ जून २०१५ या दिवशी महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाने अत्यंत सुंदर आणि आकाराने दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या ‘ब्लू मॉरमॉन’ (निलवंत; सोबतचे फुलपाखराचे चित्र पाहा) या फुलपाखराला ‘राज्य फुलपाखरा’चा दर्जा प्रदान केला. राज्य फुलपाखरू घोषित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले!

फुलपाखरे दिसायला मोहक असली तरी त्यांना देण्यात आलेली इंग्रजी भाषेतील नावे सामान्यजनांच्या आकलनापलीकडे असतात. त्यांना फुलपाखरांविषयी आपलेपणा वाटावा, आत्मीयता वाटावी म्हणून ‘महाराष्ट्र जैवविविधता मंडळा’मार्फत फुलपाखरांचे मराठी नामकरण करण्यात आले आहे.

फुलपाखरांच्या सवयी, खाद्य वनस्पती, रंग, आकार, नक्षी आणि इंग्रजी नावाचे भाषांतर हे तपशील फुलपाखरांना मराठी नावे देताना विचारात घेतले गेले आहेत. सदर नावे आपल्या संस्कृतीशी निगडित, आपल्या मातीतील वाटावीत तसेच उच्चारण्यास, लक्षात ठेवण्यास सोपी असावीत यावरही कटाक्ष ठेवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांच्या एकूण २७४ प्रजातींबरोबरच त्यांच्या सहा कुळांनादेखील मराठमोळी नावे दिलेली आहेत.

उदाहरणार्थ, मुक्तपणे विहरणाऱ्या ‘वाँडरर’ या फुलपाखराला ‘विमुक्ता’, तर ‘प्लमजूडी’ नावाच्या फुलपाखराला ‘पिंगा’ ही नावे त्यांच्या सवयींना अनुसरून तर, ‘ग्रासज्वेल’ या फुलपाखराला ‘रत्नमाला’, ‘जेझबेल’ला ‘हळदीकुंकू’ ही नावे त्यांच्या दिसण्यावरून, ‘यामफ्लाय’ या फुलपाखराला ‘यामिनी’, ‘टायगर’ या गुजरातच्या राज्य फुलपाखराला ‘रुईकर’ ही नावे त्यांच्या खाद्य वनस्पतीवरून दिलेली आहेत.

‘ग्रास डेमॉन’ला ‘तृणासूर’, तर ‘रेडस्पॉट’ला ‘आरक्त बिंदू’ ही नावे भाषांतर म्हणून दिलेली आहेत. ‘लीफब्लू’ला ‘अनिता’, तर ‘क्यूपीड’ला ‘पांडव’ ही नावे त्यांच्या शास्त्रीय नावांवरून देण्यात आलेली आहेत. ‘कुंचलपाद (निम्फॅलिएड)’, ‘चपळ (हेस्पेरायडे)’, ‘निल (लायकेनिडे)’, ‘पितश्वेत (पायरिडे)’, ‘पुच्छ (पॅपिलिऑन्डे)’, ‘मुग्धपंखी (रिओडिनिडे)’ अशा सहा कुळांतील फुलपाखरांच्या मराठी नावांची सूची ‘महाराष्ट्रातील फुलपाखरांची मराठमोळी नावे’ या सचित्र माहितीपुस्तिकेत वाचायला मिळतील. अशा प्रकारे फुलपाखरांना मातृभाषेत नावे देणारे महाराष्ट्र हे दुसरे राज्य (केरळ पहिले) आहे.

पोलीस भरती प्रश्नसंच

▪️ कोणत्या देशाने प्रथम आभासी हवामान संवादाची बैठक आयोजित केली?
उत्तर : जर्मनी

▪️ कोणत्या देशात ‘पीच ब्लॅक’ नावाचा शस्त्रास्त्राचा सराव आयोजित केला जातो?
उत्तर : ऑस्ट्रेलिया

▪️ कोणती संस्था ‘ओपन बजेट सर्वे’ आयोजित करते?
उत्तर : इंटरनॅशनल बजेट पार्टनर्शिप

▪️ कोणत्या व्यक्तीची इंडियन ऑइल कॉर्पोरेशन या कंपनीचे नवे अध्यक्ष म्हणून नेमणूक झाली?
उत्तर : श्रीकांत माधव वैद्य

▪️ कोणत्या व्यक्तीची संयुक्त राष्ट्रसंघात भारताचे पुढचे राजदूत आणि स्थायी प्रतिनिधी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : टी. एस. तिरुमूर्ती

▪️ ‘सयाजीराव गायकवाड III: महाराजा ऑफ बडोदा’ या शीर्षकाखाली ऐतिहासिक चरित्रकथा कुणी लिहिली?
उत्तर : उमा बालसुब्रमण्यम

▪️ कोणत्या देशापुढे भारताने 150 दशलक्ष डॉलर एवढे मूल्य असलेले करन्सी स्वॅप करण्याचा प्रस्ताव मांडला आहे?
उत्तर : मालदीव

▪️ कोणत्या राज्यात ‘जीवन अमृत योजना’ लागू करण्यात आली आहे?
उत्तर : मध्यप्रदेश

▪️कोणत्या राज्य सरकारने ‘डोअरस्टेप अंगणवाडी’ नावाने एका उपक्रमाचा आरंभ केला?
उत्तर : गुजरात

▪️ HUDCO या संस्थेच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक कोण आहेत?
उत्तर : शिव दास मीना

▪️ कोणत्या ठिकाणी 2021 साली पुरुषांची जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धा खेळवल्या जाणार आहेत?
उत्तर : बेलग्रेड, सायबेरिया

▪️ कोणत्या राज्य सरकारने ‘आयुर रक्षा क्लिनिक’ कार्यरत केले?
उत्तर : केरळ

▪️ कोणत्या संरक्षण संस्थेनी ‘समुद्र सेतू’ मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे?
उत्तर : भारतीय नौदल

▪️ निधन झालेले रोनाल्ड व्हिव्हियन स्मिथ कोणत्या क्षेत्राशी जुळलेले होते?
उत्तर : इतिहास कार्य

▪️ प्रथमच कोणता देश आर्क्टिक प्रदेशातल्या वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी उपग्रह प्रक्षेपित करणार आहे?
उत्तर : रशिया

▪️ कोणत्या दिवशी आंतरराष्ट्रीय अग्निशामक दिन साजरा केला जातो?
उत्तर : 4 मे

▪️ कोणत्या मंत्रालयाने “अ रे ऑफ जीनीयस” हा लघुपट प्रदर्शित केला?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या मंत्रालयाने “प्रोफ. बी. बी. लाल - इंडिया रिडिसकव्हर्ड” हे शीर्षक असलेले ई-पुस्तक प्रकाशित केले?
उत्तर : सांस्कृतिक मंत्रालय

▪️ कोणत्या संस्थेनी ‘ईकोवसेन्स’ (eCovSens) नावाचे उपकरण विकसित केले?
उत्तर : राष्ट्रीय पशू जैवतंत्रज्ञान संस्था

▪️ कोणत्या संस्थेनी UV ब्लास्टर नावाचे एक निर्जंतुकीकरण टॉवर विकसित केले?
उत्तर : संरक्षण संशोधन व विकास संस्था

▪️ कोणत्या मंत्रालयाने 49 वनोपज उत्पादनांच्या किमान आधारभूत किंमतीत वाढ केली?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪️ कोणत्या व्यक्तीची येस बँकेच्या मुख्य जोखीम अधिकारी पदावर नेमणूक झाली?
उत्तर : नीरज धवन

▪️ जेमिनी रॉय कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते?
उत्तर : चित्रकला

▪️ कोणत्या काश्मिरी उत्पादनाला GI टॅग प्राप्त झाले?
उत्तर : केसर

▪️ 2020 साली वसंत ऋतूतला आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्र दिन कोणत्या दिवशी साजरा केला गेला?
उत्तर : 2 मे

▪️ कोणते राज्य नागरिकांना मोफत आणि रोखविरहित विमा हप्ता प्रदान करणारे पहिले राज्य ठरले?
उत्तर : महाराष्ट्र

▪️ कोणत्या भारतीय संस्थेनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास करण्यासाठी सिम्युलेशन कोड विकसित केले?
उत्तर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ जिओमॅग्नेटिझम

▪️ कोण इंटरनॅशनल क्रॉप रिसर्च इंस्टीट्यूट फॉर सेमी-अरीड ट्रॉपीक्स या संस्थेचे नवे महासंचालक आहेत?
उत्तर : जॅकलिन डी’अरोस हगेस

▪️ NASA संस्थेच्या मंगळ हेलिकॉप्टरचे नाव काय आहे?
उत्तर : इंजेन्यूटी

▪️ कोणती दूरदर्शन मालिका जागतिक स्तरावर सर्वाधिक बघितला जाणारा कार्यक्रम ठरला?
उत्तर : रामायण

अर्थव्यवस्था

    अर्थव्यवस्था ही उत्पादन, वितरण आणि वापरण्याची एक सामाजिक प्रणाली आहे. हे एखाद्या विशिष्ट देशात किंवा प्रदेशातील अर्थशास्त्राचे चालणारे चित्र आहे. हे चित्र एका विशिष्ट कालावधीचे आहे. उदाहरणार्थ, जर आपण 'समकालीन भारतीय अर्थव्यवस्था' म्हटले तर याचा अर्थ होतो. सध्याच्या भारतातील सर्व आर्थिक उपक्रमांचे वर्णन. अर्थशास्त्र अर्थशास्त्रातील संकल्पना आणि तत्त्वे यांचे व्यावहारिक कार्य.

इतिहास

अर्थशास्त्रामधून एखादी वस्तू वस्तूंचा विनिमय करण्यायोग्य पद्धतीने वापर करते जेव्हा जेव्हा एखादा तह खंडित होतो तेव्हा तो शब्द आणि अर्थ या दोन शब्दांमध्ये एकत्र जोडला जातो. अर्थ म्हणजे चलन होय की संपत्ती आणि सुव्यवस्था म्हणजे प्रस्थापित कार्यपद्धती. या शब्दाचा प्रारंभिक उल्लेख कौटिल्य लिखित अर्थशास्त्र पुस्तकात सापडतो . अर्थव्यवस्थेचा प्राचीन इतिहास सुमेर राजवंशच्या काळापासून ज्ञात आहे जेव्हा त्यांनी वस्तू-आधारित विनिमय प्रणाली वापरली होती. मध्ययुगीन काळात बहुतेक व्यापार हा सामाजिक गटांत झाला. आधुनिक युगात बहुतेक व्यापार युरोपमधील देश वेगवेगळ्या देशांचे गुलाम म्हणून करीत असत. अर्थव्यवस्थेच्या ताबडतोब कम्युनिझम आणि कॅपिटलिझम या दोन विचारसरणी उदयास आल्या.

व्याख्या

अर्थशास्त्र एक शास्त्र आहे, जे मानवी वर्तनाचा अभ्यास, त्याच्या गरजा (इच्छा) आणि उपलब्ध स्त्रोतांचा पर्यायी वापर यांच्यातील संबंधांचा अभ्यास करते. अर्थशास्त्राची सामग्री त्याच्या परिभाषाद्वारे दर्शविली जाते. अर्थशास्त्र ही सामाजिक विज्ञानाची शाखा आहे ज्या अंतर्गत वस्तू आणि सेवांचे उत्पादन, वितरण, देवाणघेवाण आणि वापर यांचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्र हा शब्द संस्कृत शब्द अर्थ (संपत्ती) आणि शास्त्राच्या करारापासून आला आहे, ज्याचा शाब्दिक अर्थ 'संपत्तीचा अभ्यास' आहे. अर्थशास्त्र म्हणजे अक्षरशः संपत्तीचे शास्त्र, म्हणजेच संपत्तीच्या अभ्यासाच्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात.

प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ अ‍ॅडम स्मिथ यांनी 1976 मध्ये प्रकाशित केलेल्या पुस्तकात (अ‍ॅन्क्वायरी इन द नेचर अ‍ॅन्ड द वेल्स ऑफ द वेल्थ ऑफ नेशन्स) अर्थशास्त्राला पैशाचे शास्त्र मानले.

मध्ये प्रकाशित झालेल्या प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमिक्स या पुस्तकात डॉ. मार्शल यांनी अर्थशास्त्राच्या कल्याणाची व्याख्या देऊन ते लोकप्रिय केले.

प्रसिद्ध ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञ लॉर्ड रॉबिन्स यांनी 1932मध्ये प्रकाशित केलेल्या "अ‍ॅन निबंध ऑन द नेचर अँड सिग्नॅपिन्सन्स ऑफ इकॉनॉमिक सायन्स" या पुस्तकात अर्थशास्त्राला दुर्मिळतेचे तत्व मानले आहे. मानवी मते अमर्यादित असून त्या पूर्ण करण्याचे साधन मर्यादित आहेत असे त्यांचे मत आहे.

आधुनिक अर्थशास्त्रज्ञ सॅमुलसन ( सॅम्युल्सन ) अर्थशास्त्र विज्ञान विकास म्हणतात (विज्ञान ऑफ ग्रोथ).

आधुनिक अर्थशास्त्रज्ञ कपिल आर्य यांनी आपल्या "अर्थमहा" या पुस्तकात अर्थशास्त्राला आनंदाचे साधन मानले .

अर्थशास्त्राचे महत्त्व

अर्थशास्त्राला सैद्धांतिक आणि व्यावहारिक महत्त्व आहे.

सैद्धांतिक महत्त्व

ज्ञानासाठी

ज्ञान वाढवा

तत्त्वे वाढवा

तर्कशास्त्र वाढवा

विश्लेषण शक्ती वाढवा

इतर शास्त्रांशी नातेसंबंधाचे ज्ञान

व्यावहारिक महत्त्व

उत्पादकांना फायदे,

कामगारांना लाभ,

ग्राहकांना फायदा,

व्यापा to्यांना लाभ,

सरकारला फायदा,

समाज सुधारकांना लाभ,

राजकारण्यांना लाभ,

व्यवस्थापकांना फायदे,

विद्यार्थ्यांना फायदा,

देशाच्या उन्नतीसाठी फायदे,

मुख्य संकल्पना

मूल्य

अर्थशास्त्रात मूल्य ही संकल्पना मध्यवर्ती आहे. हे मोजण्याचे एक मार्ग म्हणजे वस्तूची बाजारभाव. अ‍ॅडम स्मिथ यांनी श्रमला मुख्य स्त्रोत म्हणून परिभाषित केले. कार्ल मार्क्ससह अनेक अर्थशास्त्रज्ञांनी "लेबर ऑफ थ्री ऑफ व्हॅल्यू" ला चालना दिली आहे. या सिद्धांतानुसार एखाद्या सेवेचे किंवा वस्तूचे मूल्य त्याच्या उत्पादनात वापरल्या जाणार्‍या मजुरीइतकेच असते. बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की त्याचे मूल्य वस्तूंच्या किंमती निश्चित करते. किंमतीचे हे कामगार सिद्धांत "उत्पादन किंमतीच्या सिद्धांताशी" जोडले गेले आहेत.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...