०२ मार्च २०२०

पाकिस्तानसाठी चीन पाठवणार बदकांची फौज

🦗 पाकिस्तानमध्ये सध्या टोळधाडीने धुमाकूळ घातला असून अनेक पिकांचे नुकसान केले आहे. टोळ कीटकांना नष्ट करण्यासाठी चीनने पाकिस्तानला 1 लाख बदकांची फौज पाठवण्याचा निर्णय घेतला आहे.

🧐 *प्रकरण काय? :*

▪ अलीकडेच टोळांनी पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील संपूर्ण पीके नष्ट केली.  पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी टोळांशी लढा देण्यासाठी आपल्या देशात राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली.

▪ पाकिस्तानच्या बलुचिस्तान आणि येमेन हे टोळांचे प्रजनन केंद्र मानले जाते. येथे हिवाळ्यामध्ये टोळ किड्यांची पैदास होते. टोळ नियंत्रणात पाकिस्तानकडे प्रभावी व्यवस्थापन नाही.

🧐 *बदके खातात 200 टोळ :* चीन पूर्वेकडील झेजियांग प्रांतातून टोळ खाणाऱ्या बदकांना पाकिस्तानात पाठवले जाणार आहे. एक बदक दिवसाला 200 टोळ कीटक खाऊ शकतो. त्यामुळे 1 लाख बदकांची फौज दिवसाला 2 कोटी टोळ कीटकांना खाऊ शकते.

📍 दरम्यान, टोळ नाकतोड्याचाच एक प्रकार आहे. या कीटकामुळे पिकांची दरवर्षी मोठ्या प्रमाणावर हानी होते.

📣 *देश, आंतरराष्ट्रीय पातळीपासून ते गाव, शहर पातळीपर्यंत सर्व घडामोडींचा वेगवान आढावा जाणून घेण्यासाठी आजच जॉईन करा

“मर्केरियन 231’ आकाशगंगेमध्ये ऑक्सिजन वायू आढळला

🔰 पृथ्वीपासून दीड अब्ज प्रकाशवर्षांच्या अंतरावर असलेल्या “मर्केरियन 231’ नावाच्या आकाशगंगेमध्ये खगोलशास्त्रज्ञांना आण्विक ऑक्सिजनचा शोध लागला आहे. पृथ्वीपासून 561 दशलक्ष प्रकाशवर्षांच्या अंतरावर असलेली “मर्केरियन 231’ आकाशगंगा ‘ओरियन नेबुला’ (मृगशीर्ष नक्षत्रसमूह) याचा एक भाग आहे.

🔴ठळक बाबी

🔰 आण्विक ऑक्सिजन शोधला गेला असलेल्या प्रदेशांपैकी एक म्हणजे ‘ओरियन नेबुला’ होय. असा विश्वास आहे की अंतराळात ऑक्सिजन पाण्याच्या बर्फाच्या रूपात हायड्रोजनसोबत बांधलेल्या अवस्थेत आहे, जो धूळीचे कण आणि लहान दगडांवर तयार होतो.

🔰 “मर्केरियन 231’ आकाशगंगेचा “क्वासर” नावाचा अत्यंत तेजस्वी सूर्य आहे, ज्याच्या मध्यभागी एक प्रचंड असे कृष्णविवर आहे. क्वासर हे विश्वातल्या अत्यंत तेजस्वी वस्तूंपैकी एक आहे. असे मानले जाते की ‘ओरियन नेबुला’वर हायड्रोजनच्या तुलनेत ऑक्सिजनचे प्रमाण 100 पटीने जास्त आहे.

🔰 ऑक्सिजन हा हायड्रोजन आणि हीलियम नंतर विश्वातला तिसरा सर्वात सामान्य घटक आहे. खगोलशास्त्रज्ञांनी मिलीमीटर रेडिओमेट्री आणि स्पेक्ट्रोस्कोपीचा वापर करून ऑक्सिजनचा शोध घेतला.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...