२८ जानेवारी २०२०

चीनमधील भारतीयाला घातक विषाणूचा संसर्ग

चीनच्या वुहान आणि शेनझेन शहरात धोकादायक अज्ञात विषाणू फैलावत असून तेथील भारतीय शिक्षिकेला याचा संसर्ग झाला आहे. सिवियर ऍक्यूट रेस्पायरेटरी सिंड्रोम (सार्स) सारख्या विषाणूचा संसर्ग झालेला चीनमधील त्या पहिल्या विदेशी नागरिक आहेत.

-शेंजेनव येथील आंतरराष्ट्रीय शाळेत शिक्षिका असलेल्या प्रीति माहेश्वरी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रीति यांना संबंधित विषाणूचा संसर्ग झाल्याची पुष्टी डॉक्टरांनी दिली आहे.

-विषाणूचा संबंध सार्सशी असल्याचे सांगण्यात येत असल्याने चिंता निर्माण झाली आहे. 2002-03 मध्ये चीन आणि हाँगकाँगमध्ये सार्सने 650 जणांचा जीव घेतला होता. चीनमध्ये रविवारी या विषाणूच्या संसर्गाचे 17 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यातील तीन जणांची प्रकृती गंभीर असून हे सर्वजण वुहान शहरातील आहेत.

- या विषाणूने शहरात आतापर्यंत 62 जणांनी प्रकृती बिघडविली असून यातील 8 जण गंभीर आहेत.
——————————————

विधान परिषद बरखास्त!; मुख्यमंत्र्यांचा निर्णय


● आंध्र प्रदेशमधील जगनमोहन रेड्डी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत विधान परिषद बरखास्त करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.

●  वायएसआर काँग्रेसचे आमदार गुडीवाडा अमरनाथ यांनी याबाबत माहिती दिली. कॅबिनेटच्या बैठकीनंतर आंध्र प्रदेश सरकारचे विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे.

          😇  प्रकरण काय  😇
       ----------------------------------
▪ मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांना 3 राजधान्या अस्तित्त्वात आणायच्या आहेत, मात्र त्याबाबतचे विधेयक बहुमताअभावी विधानपरिषदेत रखडले आहे.

▪ त्यामुळेच वायएसआर काँग्रेसने चंद्राबाबू नायडूंना धक्का देत, थेट विधानपरिषदच बरखास्तीचा निर्णय घेतला आहे.

▪ माजी मुख्यमंत्री अन् टीडीपी अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाकडून सरकारच्या या प्रस्तावाचा विरोध करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

▪नायडू यांनी पक्षाच्या आमदारांची बैठक घेतली. ज्यामध्ये पक्षाचे 21 आमदार विशेष अधिवेशनावर बहिष्कार टाकणार असल्याचा निर्णय घेण्यात आला.

▪ आंध्र प्रदेशमध्ये विधान परिषदेत 58 सदस्य आहेत. जगन मोहन रेड्डी यांच्या हातात राज्याची सत्ता असली तरी विधान परिषदेत चंद्रबाबू नायडू यांचे बहुमत आहे.

▪ या सभागृहात टीडीपीचे 27 तर वायएसआरचे 9 सदस्य आहेत. विधान परिषदेत जगन मोहन रेड्डी यांच्या राज्याच्या 3 राजधान्या या प्रस्तावाला अडकवले गेले.

--------------------------------------------------------
  
---------------------------------------------------

भारत पर्व 2020: लाल किल्ला मैदानावर कार्यक्रमाचा शुभारंभ झाला

⛔️भारतीय संस्कृतीचे दर्शन घडविणारा “भारत पर्व-2020” या पाचव्या वार्षिक महोत्सवाला नवी दिल्लीतल्या लाल किल्ला मैदानावर 26 जानेवारी 2020 पासून सुरुवात झाली आहे. हा महोत्सव एक फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.

⛔️कार्यक्रमाची संकल्पना: “एक भारत - श्रेष्ठ भारत” आणि “महात्मा गांधींची 150 वी जयंती”

⛔️भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयातर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. नागरिकांना देशातल्या विविध पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी प्रोत्साहित करणे, तसेच “देखो अपना देश” ही संकल्पना रुजविणे हा या महोत्सवाचा मुख्य उद्देश आहे.

⛔️नागरिक कुठल्याही प्रवेश शुल्काशिवाय त्यांचे कोणतेही ओळखपत्र दाखवून दुपारी 12 ते रात्री 10 वाजेपर्यंत भारतपर्व महोत्सवाला भेट देऊ शकतात. या ठिकाणी स्थळांविषयी माहिती देण्यासोबतच विविध कलाकृतींचे प्रदर्शन मांडले जाते.

⛔️यामध्ये भारताची पाक संस्कृती, कला संस्कृती आणि राज्यांच्या विविधतापूर्ण संस्कृती, प्रदर्शनी आणि मेळावे अश्या कार्यक्रमांचे दर्शन घडविले जाते.

Latest post

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

 खालील विधाने विचारात घ्या? अ  पोर्तुगीजांनी भारतात पहिला छापखाना 1556 ला गोवा येथे स्थापित केला. ब  मुंबई ला पहिला छापखाना आणण्याचा प्रयत्न...