Wednesday 9 December 2020

मलेरिया रोखण्यात भारताला यश.


🧲जागतिक आरोग्य संघटनेने मलेरिया जागतिक परिस्थिती अहवाल प्रसिद्ध केला असून भारतातील मलेरिया रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्याचे निरीक्षण त्यात नोंदवण्यात आले आहे.मलेरियाचे अस्तित्व असलेल्या देशांपैकी त्याचा प्रसार रोखण्यात यशस्वी ठरलेला भारत हा एकमेव देश ठरला आहे.


🧲जागतिक आरोग्य संघटनेने भारतासह जगातील 11 देशांमध्ये मलेरियाच्या दृष्टीने जोखमीच्या प्रदेशांवर लक्ष केंद्रित केले होते. त्या देशांतील रुग्णसंख्येच्या गणितीय प्रारूपाच्या अभ्यासातून हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.


🧲2000 ते 2019 या कालावधीत भारतातील मलेरिया रुग्णांची संख्या तब्बल 72 टक्क्यांनी कमी करण्यात यश आले आहे. मलेरियामुळे दगावणाऱ्या रुग्णांची संख्याही 74 टक्क्यांपर्यंत कमी झाल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने अहवालात नमूद केले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...