२४ डिसेंबर २०२१

पहिले कर्नाटक युद्ध (१७४६-१७४८)

◆ युद्धाचे कारणः

√ युरोपात इंग्लंड व फ्रान्स यांच्यादरम्यान ऑस्ट्रीयन वारसा हक्क युद्ध' (Austrian War of Succession) सुरू झाल्यामुळे भारतातही इंग्रज व फ्रेंच यांच्यात युद्ध सुरू झाले.

◆महत्त्वाच्या घटना:

√ १७४५ मध्ये ब्रिटिश नौदलाने फ्रेंचाची जहाजे ताब्यात घेतली.

√ त्यामुळे फ्रेंच गर्व्हनर डुप्ले याने १७४६ मध्ये इंग्रजांचे मद्रास जिंकून घेतले.

√ इंग्रजांनी कर्नाटकच्या नवाबाकडे फ्रेंचांविरूद्ध मद्रास मुक्त करण्यासाठी मदतीची मागणी केली.

√ कर्नाटकचा नवाब अन्वरूद्दीन याने फ्रेंचांना दिलेला आदेश न मानल्यामुळे १७४८ मध्ये अन्वरूद्दीनचे सैन्य व फ्रेंच यांमध्ये प्रसिद्ध सेंट थोमची लढाई' (Battle of St.Thome) झाली.

√ या लढाईचे वैशिष्ट्य म्हणजे के पॅराडाईस याच्या नेतृत्वाखालील फ्रेंच सैन्यात केवळ ९३० सैनिक होते, तर महफूज खान याच्या नेतृत्वाखालील नवाबाच्या सैन्यात १०,००० सैनिक होते. तरीही फ्रेंचांनी नवाबाच्या सैन्याचा दारूण पराभव केला.

√ युरोपात ऑस्ट्रीयन वारसाहक्क युद्ध संपताच भारतातील युद्धही थांबले.

√ 'अॅक्स ला शापेल तहा द्वारे (Treaty of Aix-La-Chapelle) फ्रेंचांनी इंग्रजांना मद्रास परत केले.

√ मात्र युद्धात फ्रेंचांचे वर्चस्व सिद्ध झाले.

अश्या प्रकारची महत्वाची माहिती नियमित मिळविण्यासाठी जॉईन करा टेलिग्राम

★★★★★★★★★★★★★★★★★★★★

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

२३ एप्रिल २०२५ टॉप १० चालू घडामोडींचे MCQ

१. भारताच्या नवीन अ‍ॅथलीट पासपोर्ट युनिटला कोणत्या संस्थेने मान्यता दिली आहे? ए.आय.ओ.सी. बी. युनेस्को सी. वाडा डी. नाडा उत्तर: सी. वाडा २. ...