०१ नोव्हेंबर २०२१

भारतीय रिझर्व बॅंक.


🅾 ही भारत सरकारने स्थापन केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.सर्वप्रथम १७७१ मध्ये भारतासाठी मध्यवर्ती बॅंकेची संकल्पना वॉरन हेस्टिंग्जने मांडली होती ,१९२६ च्या यंग हिल्टन आयोगाच्या शिफारशीवरून तसेच गोलमेज परिषदेच्या चर्चेअंती भारतासाठी एक मध्यवर्ती बॅंक स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला ,यासाठी संसदेत ६ मार्च  १९३४ ला आर बी आय कायदा १९३४ संमत करण्यात आला आणि १ एप्रिल १९३५ ला रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडिया ची स्थापना करण्यात आली  भारतीय रिझर्व बॅंकेचे मुख्य कार्यालय मुंबई येथे आहे.

🅾भारतीय रिझर्व बॅंक ही देशपातळीवर आर्थिक संस्थांना शिस्त आणण्याचे काम करते. रिझर्व बॅंक वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण (मॉनेटरी पॉलिसी व क्रेडिट पॉलिसी) जाहीर करते.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

💠💠प्रमुख उद्देश.💠💠

🧩भारतीय रिझर्व बॅंकेचे प्रमुख उद्देश खालीलप्रमाणे आहेत:

🅾भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे.

🅾भारताची गंगाजळी राखणे.

🅾भारताची आर्थिक स्थिती राखणे.

🅾भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...