२० नोव्हेंबर २०१९

पृथ्वीला प्राप्त झालेल्या गती व त्याच्या परिणामांबद्दल माहिती


पृथ्वी सूर्याभोवती तसेच स्वत:भोवती फिरते. यामुळे पृथ्वीला परिवलन आणि परीभ्रमण अशा दोन गती प्राप्त झालेल्या आहेत.

परिवलन गती

पृथ्वीच्या स्वत:भोवतीच्या फिरण्याला परिवलन गती किंवा दैनिक गती असे सुद्धा म्हणतात.

पृथ्वीला स्वत:भोवती एक फेरी पूर्ण करण्यास 23 तास 56 मिनीटे 4 सेकंद लागतात. सापेक्षता हा कालावधी चोवीस तासाचा मानला जातो. पृथ्वी स्वत:भोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते.

पृथ्वीचा परिवलन वेग विषुववृत्तावर सर्वात जास्त असून ध्रुवावर सर्वात कमी आहे.

विषववृत्तावर पृथ्वीच्या परिवलनाचा वेग 1665.6 कि.मी. इतका आहे. पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर खालील परिणाम घडून आलेले आहेत.

दिवस व रात्र चक्र – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे पृथ्वीवर दिवस आणि रात्र होण्याचे चक्र सुरू झाले असून पृथ्वीच्या ज्या भागावरच सूर्यकिरण पडतात तो भाग प्रकाशमान होवून तेथे दिवस होतो व राहिलेल्या अर्ध्या भागावर अंधार पडतो म्हणजे तेथे रात्र होते. पृथ्वीवरील दिवस रात्र चक्र अखंड चालू आहे.

सागर प्रवाह – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे सागराच्या पाण्याला वेग प्राप्त होतो. विषवृत्तीय प्रदेशातील पाणी पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जाते. यालाच सागर प्रवाह असे म्हणतात.

वार्‍यांना दिशा प्राप्त होते – पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे वार्‍याची दिशा बदलते. याबाबतचा नियम फेरेल या शास्त्रज्ञाने मांडला. त्यांच्या मते पृथ्वीच्या परिवलन गतीमुळे उत्तर गोलार्धातील वारे त्यांच्या उजवीकडे आणि दक्षिण गोलार्धातील वारे डावीकडे झुकतात.

झटपट महत्त्वाचे 10 प्रश्न उत्तरे 20/11/2019

1) कोणत्या विषाणूमुळे विषमज्वर होतो?
उत्तर : साल्मोनेला टायफी

2) पिण्याचे पाणी तपासण्यासाठी BISद्वारे कोणते मानक ठरवण्यात आले आहे?
उत्तर : इंडियन स्टँडर्ड 10500:2012

3) आदी महोत्सव 2019 या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : नवी दिल्ली

4) कोणत्या राज्य वा केंद्रशासित प्रदेशात “NISHTHA” ही राष्ट्रीय मोहीम राबवण्यात येत आहे?
उत्तर : जम्मू व काश्मीर

5) कोणत्या शहरात CPR प्रशिक्षणाच्या बाबतीत गिनीज विक्रम करण्यात आला?
उत्तर : कोची

6) कोणते राज्य 14 ते 21 नोव्हेंबर या कालावधीत ‘वाळू आठवडा’ पाळत आहे?
उत्तर : आंध्रप्रदेश

7) ‘ब्रह्मपुत्र पुष्करम’ हा कार्यक्रम कोणत्या राज्य सरकारने आयोजित केला?
उत्तर : आसाम

8) राष्ट्रीय नदी गंगा विधेयक-2019 नुसार, गंगा नदी प्रदूषित केल्यास दंड काय असू शकतो?
उत्तर : 50 कोटी रुपये आणि 5 वर्षांचा तुरुंगवास

9) राष्ट्रीय पत्र दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 16 नोव्हेंबर

10) UNESCOच्या शिक्षण आयोगाच्या प्रमुखपदी कोणत्या देशाची निवड झाली?
उत्तर : पाकिस्तान

चालू घडामोडी प्रश्नसंच 20/11/2019

प्र.१)     भारत सरकारच्या कोणत्या मंत्रालयाने ‘अटल भाषांतर योजना’ सुरू केली आहे?
स्पष्टीकरण :  ब) परराष्ट्र कल्याण मंत्रालय 

प्र.२) शीख समुदायाला सेवा देण्यासाठी कोणत्या भारतीय ब्रिटिश व्यक्तीला ‘ऑफ ब्रिटिश एम्पायर (MBE)’चा रॉयल सन्मान देऊन गौरवण्यात आले?
स्पष्टीकरण : ड) जगदेव सिंग वीरदी

प्र.3) दिबांग वन्यजीवन अभयारण्याला व्याघ्र प्रकल्प घोषित करण्याच्या विरोधात असलेला ‘इडू मिश्‍मी’ हा आदिवासी समाज कोणत्या राज्यातल्या आहे?
स्पष्टीकरण : क) अरुणाचल प्रदेश

प्र.4) कोणत्या अग्निबाणाच्या साहाय्याने अमेरिकेच्या वायुदलाचा सर्वांत शक्तिशाली जीपीएस उपग्रह अवकाशात पाठवला?
स्पष्टीकरण : अ) फाल्कन ९

प्र.5) कोणते भारतीय राज्य सार्वभौमिक आरोग्य सेवा पुरविणारे पहिले राज्य बनले आहे?
स्पष्टीकरण : ड) उत्तराखंड

प्र.6) कोणत्या आशियाई देशाच्या संसदेने वैद्यकीय वापरासाठी मारज्युआनाचा वापर करण्यास परवानगी दिली?
स्पष्टीकरण : क) थायलंड

प्र.7) ग्रामीण भागात वैद्यकीय मदत मिळवणे कठीण असताना हजारो बाळंतपणे विनामूल्य करणाऱ्या पद्मश्रीप्राप्त ------------ यांचे २५ डिसेंबर २०१८ रोजी निधन झाले?
 स्पष्टीकरण : ड) सुलागिट्टी नरसम्मा

प्र.8) भारतात दरवर्षी कोणत्या दिवशी सुशासन दिन पाळला जातो?
स्पष्टीकरण : अ) २५ डिसेंबर

प्र.9) __ येथे प्रवेशासाठी चाबहार बंदराला धोरणात्मकदृष्ट्या (व्यापार) महत्त्वपूर्ण म्हणून पाहिले जाते?
स्पष्टीकरण : क) मध्य आशिया

चालू घडामोडी सराव प्रश्न

1) पाचवे भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे?
उत्तर : कोलकाता

2) ऑस्ट्रेलियात झालेल्या फेड चषक 2019 या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले?
उत्तर : फ्रान्स

3)  ‘फूझौ चाइना ओपन 2019’ या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष गटाचे विजेतेपद कोणी पटकावले?
उत्तर : केंटो मोमोटा

4) NASAचे पहिले संपूर्ण विद्युत चलित विमान कोणत्या प्रयोगासाठी बनवले आहे?
उत्तर : मॅक्सवेल X-55

5) BRICS व्यापार मंत्र्यांची 9 वी बैठक कोठे होणार आहे?
उत्तर : ब्राझिलिया

6) ‘MILAN’ सरावाच्या संदर्भातली मध्य नियोजन परिषद (MPC) कुठे पार पडली?
उत्तर : विशाखापट्टणम

7) मॉरिशस या देशात झालेल्या निवडणूकीत कोणत्या व्यक्तीच्या पक्षाचा विजय झाला?
उत्तर : प्रविंद जुगनाथ

8) 11 वा बाल संगम महोत्सव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : नवी दिल्ली

9) राष्ट्रीय नागरिक नोंदणी (NRC) प्रक्रियेचे राज्य समन्वयक कोण आहेत?
उत्तर : हितेश देव शर्मा

10) नवोदय विद्यालय समितीसाठी बनवण्यात आलेल्या डिजिटल व्यासपिठाचे नाव काय?
उत्तर : शाला दर्पण

इतिहास महत्त्वाचे प्रश्नसंच 20/11/2019

1. पहिल्या भारतीय स्वातंत्र्य युद्धात अतिशूरपणे दीर्घकाळ कोण लढले?

 तात्या टोपे

 राणी लक्ष्मीबाई

 शिवाजी महाराज

 नानासाहेब पेशवे

उत्तर : तात्या टोपे

2. महात्मा गांधी राजकीय गुरु कोणाला मानत होते?

 महादेव गोविंद रानडे

 लिओ टॉलस्टॉय

 दादाभाई नौरोजी

 गोपाळ कृष्ण गोखले

उत्तर : गोपाळ कृष्ण गोखले

3. कोणती युवती क्रांतीकारी युवती होती?

 सरोजिनी नायडू

 प्रितीलता वडडेदार

 इंदिरा गांधी

 राणी लक्ष्मीबाई

उत्तर : प्रितीलता वडडेदार

4. संस्थानाचे विलीनिकरण कोणी केले?

 पंडित नेहरू

 विनोबा भावे

 साने गुरुजी

 सरदार पटेल

उत्तर : सरदार पटेल

5. पुणे करार महात्मा गांधी व —– यांच्यात झाला होता?

 डॉ. आंबेडकर

 लॉर्ड आयर्विन

 बॅ. जिना

 पंडित नेहरू

उत्तर : डॉ. आंबेडकर

6. ‘अभिनव भारत’ या संघटनेची स्थापना कोणी केली?

 स्वा.सावरकर

 बटूकेश्वर दत्त

 रासबिहारी घोष

 भुपेंद्रनाथ दत्त

उत्तर : स्वा.सावरकर

7. आझाद हिंद सेना कोणी स्थापन केली?

 सुभाषचंद्र बोस

 रासबिहारी बोस

 कॅ. भोसले

 कर्नल धिल्लन

उत्तर : रासबिहारी बोस

8. झाशीचा दत्तक वारसा कोणी नामंजूर केला?

 लॉर्ड कॅनिंग

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेटिंग

 लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

9. भारतात तार आणि सुधारीत टपालसेवा कोणी सुरू केली?

 लॉर्ड डलहौसी

 लॉर्ड बेटिंग

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड मेयो

उत्तर : लॉर्ड डलहौसी

10. वृत्तपत्रांवर बंदी घालणारा कायदा कोणत्या साली पारित झाला?

 1 एप्रिल 1878

 मार्च 1905

 मार्च 1978

 एप्रिल 1994

उत्तर : 1 एप्रिल 1878

11. स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोण?

 लॉर्ड रिपन

 लॉर्ड मॅकॉले

 लॉर्ड मेयो

 लॉर्ड विलीग्टन

उत्तर : लॉर्ड रिपन

12. भारतातील पहिला रेल्वेमार्ग खालीलपैकी कोणता?

 मुंबई ते ठाणे

 मुंबई ते दिल्ली

 कल्याण ते ठाणे

 मुंबई ते पुणे

उत्तर : मुंबई ते ठाणे

13. 1857 च्या उठावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती कोण?

 मंगल पांडे

 तात्या टोपे

 कूंवरसिंह राणा

 कर्नल आयरे कूट

उत्तर : कूंवरसिंह राणा

14. जालियनवाला बाग कोठे आहे?

 पटियाळा

 दिल्ली

 अमृतसर

 अलाहाबाद

उत्तर : अमृतसर

15. खिलाफत चळवळीचे अध्यक्ष कोण होते?

 सर सय्यद अहमद खान

 मौलाना अली महंमद

 आगाखान

 महात्मा गांधी

उत्तर : महात्मा गांधी

16. त्रिपुरा येथील राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष कोण होते?

 नेताजी सुभाषचंद्र बोस

 जवाहरलाल नेहरू

 मोतीलाल नेहरू

 मौलाना आझाद

उत्तर : नेताजी सुभाषचंद्र बोस

17. मुस्लिम लीगची स्थापना कोणी केली?

 नबाब सलीमुल्ला

 आगाखान

 बॅ. महंमद जीना

 मौलाना आझाद

उत्तर : नबाब सलीमुल्ला

18. मुंबईत कोणाच्या नेतृत्वाखाली नाविक दलाचे बंड झाले?

 सेनापती बापट

 बी.सी.दत्त

 मोहन रानडे

 पं. जवाहरलाल नेहरू

उत्तर : बी.सी.दत्त

19. 1857 चे स्वातंत्र्यसमर व मॅझिनीचे लेखक कोण?

 स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

 सच्छिंद्रनाथ सन्याल

 नानासाहेब पेशवे

 तात्या टोपे

उत्तर : स्वातंत्र्यवीर वि.दा. सावरकर

20. ‘बंदीजीवन’ कोणी लिहिले?

 सच्छिंद्रनाथ सन्याल

 बंकिमचंद्र चटर्जी

 व्योमेशचंद्र बॅनर्जी

 महात्मा गांधी

उत्तर : सच्छिंद्रनाथ सन्याल

सारांश, 19 नोव्हेंबर 2019


                  🔘दिनविशेष🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌भारतातला निसर्गोपचार दिन - 18 नोव्हेंबर.

                      🔘संरक्षण🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌17 नोव्हेंबर रोजी दोहा येथे या दोन देशांच्या नौदलांच्या दरम्यानचा ‘झ’ईर-अल-बहर (समुद्राची गर्जना)’ नावाचा सागरी सराव सुरू झाला - भारत आणि कतार.

📌20 नोव्हेंबर 2019 रोजी भारताचे राष्ट्रपती या संस्थेला ‘राष्ट्रपती रंग’ प्रदान करणार आहेत - इंडियन नेव्हल अॅकॅडमी.

📌समुद्रसपाटीपासून 1900 फूटपेक्षा अधिक उंचीवरच्या प्रदेशात रस्ता तयार करण्याच्या उद्देशाने दौलत बेग ओल्डी (DBO) येथे सीमा रस्ते संस्था (BRO) प्रथमच या तंत्रज्ञानाचा वापर करीत आहे - मायक्रोपाईल किंवा सिमेंटेशियस सब बेस (CTSB) तंत्रज्ञान.

                  🔘अर्थव्यवस्था🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌अखिल भारतीय व्यापारी संघटना (CAIT) याने अनैतिक व्यवसाय पद्धती वापरल्या जाणार्‍या उत्पादनांसाठी या प्रकाराचे मूल्य लावण्याची शिफारस सरकारला केली आहे - "मिनिमम ऑपरेटिव्ह प्राइस".

                🔘आंतरराष्ट्रीय🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌सहाव्या एशियन डिफेन्स मिनिस्टर्स मिटींग-प्लस (ADMM प्लस) बैठकीचे ठिकाण - बँकॉक, थायलँड.

📌किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याची बैठक 18 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत या शहरात आयोजित केली जात आहे - नवी दिल्ली.

📌2019 या वर्षासाठी किंबर्ली प्रोसेसचा अध्यक्ष - भारत (“KP चेअर” - बी. बी. स्वाइन; “KP फोकल पॉईंट” - रूपा दत्ता).

📌या देशाने 002 या नावाने ओळखले जाणारे प्रथम स्वदेशी निर्मित विमानवाहू जहाज तैवान सामुद्रधुनीत तैनात केले - चीन.

                        🔘राष्ट्रीय🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌या वैचारिक संस्थेनी ‘हेल्थ सिस्टीम्स फॉर ए न्यू इंडिया: बिल्डिंग ब्लॉक्स –पोटेंशल पाथवेज टू रीफॉर्म्स’ या शीर्षकाचा अहवाल जाहीर केला – NITI आयोग.

📌या प्रदेशासाठीची पहिली विंटर-ग्रेड डिझेल आउटलेट सुविधा सुरू करण्यात आली - लडाख.

                    🔘व्यक्ती विशेष🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌श्रीलंका या देशाचे नवे राष्ट्रपती - गोताबया राजपक्षे.

📌18 नोव्हेंबर रोजी लोकसभेत शपथ घेणार्‍या चार खासदारांची नावे - प्रिन्स राज (बिहार), हिमाद्री सिंग (मध्यप्रदेश), श्रीनिवास दादासाहेब पाटील (महाराष्ट्र) आणि डी.एम. काथिर आनंद (तामिळनाडू).

                       🔘क्रिडा🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌17 नोव्हेंबरला झेक प्रजासत्ताकच्या या टेनिसपटूने आंतरराष्ट्रीय टेनिस क्षेत्रातून आपल्या निवृत्तीची घोषणा केली - टॉमस बर्डीच.

📌‘AIBA अॅथलीट्स कमिशन’ याचा सदस्य म्हणून निवडला गेलेला भारतीय मुष्टियोद्धा - लैशराम सरिता देवी.

📌11 जानेवारी ते 28 जून या कालावधीत खेळवल्या जाणार्‍या 2020 हॉकी प्रो लीग भारतातले सामने या शहरात होणार – भुवनेश्वर, ओडिशा.

📌मॅड्रिड (स्पेन) येथल्या या टीव्ही वाहिनीच्या हिंदी मंचाचे 13 नोव्हेंबरला उद्घाटन झाले - ऑलम्पिक चॅनल.

                 🔘ज्ञान - विज्ञान🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌हिमाच्छादित प्रदेशांकरिता उणे 33 अंश सेल्सियसवर ओतल्या जाऊ शकणारे विशेष विंटर-ग्रेड डिझेल इंधन तयार करणारी कंपनी - इंडियन ऑइल कॉर्पोरेशन.

📌‘किरीन A1’ हे शरीरावर परिधान केली जाऊ शकणारी जगातली पहिली समर्पित चिपसेट - हुवेई (चीन).

                 🔘सामान्य ज्ञान🔘
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📌इंडियन नेव्हल अॅकॅडमी - कायमस्वरूपी ठिकाण: एझिमाला, केरळ; उद्घाटन: 8 जानेवारी 2009.

📌जागतिक प्रत्यारोपण खेळ महासंघ (WTGF) - स्थापना: सन 1978; मुख्यालय: विंचेस्टर, ब्रिटन; संस्थापक: डॉ. मॉरिस स्लॅपॅक.

📌आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघ (FIH) - स्थापना: सन 1924 (07 जानेवारी); मुख्यालय: लॉझने, स्वित्झर्लंड; विद्यमान अध्यक्ष: नरिंदर बत्रा.

📌किंबर्ली प्रोसेस सर्टिफिकेशन स्कीम (KPCS) याची स्थापना – सन 2003.

📌किंबर्ली प्रोसेस (KP) जागतिक पुरवठा साखळीमधून ही वस्तू वगळण्यासाठी वचनबद्ध आहे – विवादात असलेले हिरे.

📌सीमा रस्ते संस्था (BRO) - स्थापना: सन 1960 (7 मे); संस्थापक: जवाहरलाल नेहरू.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) समानार्थी वाक्प्रचार द्या. -  ‘ब्रभा करणे’

   1) काखा वर करणे    2) खो घालणे   
   3)  टाके ढिले करणे    4) डांगोरे पिटणे

उत्तर :- 4

2) शब्दसमूहासाठी योग्य शब्द निवडा. – ‘फौजेबरोबर असलेली अवांतर माणसे’

   1) शिपाईगडी    2) बाजारबुणगे   
   3) सेवेकरी    4) भोई

उत्तर :- 2

3) प्रचलित शुध्दलेखनानुसार चुकीचा शब्द कोणता ?

   1) लघुकथा    2) गतिमान   
   3) वधुपरीक्षा    4) महीपाल

उत्तर :- 3

4) एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की, त्या संयुक्त व्यंजनाला ...................... म्हणतात.

   1) अनुनासिक    2) व्दित्त     
   3) घर्षक    4) अल्पप्रमाण

उत्तर :- 2

5) ‘कवीश्वर’ या शब्दातील संधीचा प्रकार कोणता ?

   1) विसर्गसंधी    2) स्वरसंधी   
  3) व्यंजनसंधी    4) पररूप संधी

उत्तर :- 2

6) पुढील वाक्यातील कोणत्या भाववाचक नामाचा विशेषनामासारखा उपयोग केला आहे?

      ‘विश्वास परीक्षेत उत्तीर्ण झाला’
   1) उत्तीर्ण    2) परीक्षेत    3) झाला      4) विश्वाय

उत्तर :- 4

7) पुढील वाक्यातील सर्वनाम कोणते ते सांगा.

      ती मुलगी चांगली गाते.
   1) मुलगी    2) ती      3) गाते      4) चांगली

उत्तर :- 2

8) हल्ली सज्जन मित्र मिळणे कठीण झाले आहे. – अधोरेखित शब्दांचे विशेषण प्रकार ओळखा.

   1) साधित विशेषण    2) परिणाम दर्शक विशेषण
   3) नामसाधित विशेषण    4) अविकारी विशेषण

उत्तर :- 3

9) ‘मला आता काम करवते’ या वाक्यातील करवते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे ?

   1) शक्य क्रियापद  2) प्रयोजक क्रियापद  3) अनियमित क्रियापद  4) साधित क्रियापद

उत्तर :- 1

10) जोडया जुळवा.

   अ) नामसाधित क्रियाविशेषणे    i) निजल्यावर, खेळताना
   ब) विशेषणसाधित क्रियाविशेषणे     ii) दररोज, शास्त्रदृष्टया
   क) धातुसाधित क्रियाविशेषणे    iii) सकाळी, प्रथमत:
   ड) समासघटित क्रियाविशेषणे    iv) मोटयाने, सर्वत्

  अ  ब  क  ड

         1)  iii  iv  i  ii
         2)  iii  i  iv  ii
         3)  iv  ii  iii  i
         4)  i  iii  iv  ii

उत्तर :- 1

भुतान, जगातले प्रथम क्रमांकाचे आनंदी राष्ट्र कसे बनले ?

🔰"भुतान" हिमालयाच्या कुशीत वसलेला एक नितांत सुंदर देश आहे. शून्य प्रदुषण.  देशभर कमालीची स्वच्छता, शांताता, सुरक्षितता आहे. हसतमुखपणा हा या देशातील सर्व लोकांचा स्वभाव आहे.

🔰मानव विकास निर्देशांक आणि हॅपी इंडेक्स अशा दोन प्रकारे जगातील देशांची सुची तयार केली जाते. जगातील सुमारे 222 देशांच्या आनंदी राष्ट्रांच्या यादीत भुतान प्रथम क्रमांकावर आहे.

🔰खरं तर भुतान आपल्यापेक्षा खूप गरीब देश आहे. तरीही इथला माणूस आनंदी आहे. प्रसन्न आहे. सुखी आहे.

🔰का आहे? कसं जमलं त्यांना हे?
भुतानमध्ये सर्व प्रकारचे केजी ते पीजी सर्व शिक्षण मोफत आहे.
भुतानमध्ये सर्व प्रकारची आरोग्यसेवा मोफत आहे.

🔰हिमालयात असल्यानं डोंगराळ भाग. पारो हा एकमेव विमानतळ. तोही भारतानं नेहरूंच्या काळात तयार करून दिलेला.

🔰थिंफू हे सध्याचं राजधानीचं शहर.

🔰शहराच्या मुख्य रस्त्याच्या लगतच्या हॉटेलात एकही हॉर्न ऎकू येत नाही. सिग्नलची गरज पडत नाही. स्वयंशिस्तीने लोक गाड्या चालवत असल्यानं हॉर्न नाही. सिग्नल नाही. ट्रॅफिक जॅम नाही.

🔰तुम्ही जगात कुठेही गेलात तरी प्रत्येक हॉटेलात पाट्या दिसतात. चोरांपासून सावध रहा. तुमचे किमती सामान चोरीला गेल्यास हॉटेल मॅनेजमेंट जबाबदार नाही. वगैरे.

🔰भुतानमधल्या कुठल्याही हॉटेलात अशा पाट्या दिसल्या नाहीत. कारण प्रवाश्यांच्या सामानाच्या चोर्‍या झाल्या तर ते परत येणार नाहीत, त्यांच्या देशातील इतरांनाही जाऊ नका म्हणून सांगतील. तेव्हा नो चोर्‍या असा संस्कार प्रत्येक भुतानीवर असल्यानं तिथं चोर्‍या होत नाहीत.

🔰हॉटेलातील कष्टाची कामं मुलीही तत्परतेनं करतात. टुरीझम हा मुख्य व्यवसाय. शेती दुसरा. उद्योगधंदे फारसे नाहीत.
चोर्‍या बंद. शील जपा. गरजा कमी. सुख ज्यादा.

🔰भारतीय माणसांना त्यांच्या नोटा घ्यायची गरज नाही.  आपली करंसी तिकडे चालते. हिंदी सर्वांना येते. पासपोर्टची गरज पडत नाही.

🔰भारतीयांबद्दल त्यांना विशेष आस्था आहे. कारण आपण बुद्धाच्या देशातले म्हणून. भुतान प्रामुख्याने बौद्ध देश आहे.

🔰इतका स्वच्छ, सुंदर, सुरक्षित आणि स्वस्ताई असलेला देश जगात दुसरा नाही.

🔰यातनं भारतानं घ्यायचा धडा हा आहे की भारतातील सर्व आरोग्य आणि शिक्षण व्यवस्था मोफत करा. सर्व प्रकारच्या चोर्‍या बंद करा. शील जपा.

🔰माणसाला सगळ्यात जास्त काळज्या असतात त्या मुलामुलींचं शिक्षण कसं होणार, आपलं म्हातारपणी आरोग्याचं काय होणार आणि कमावलेलं सगळं चोरीला गेलं तर आपलं कसं होणार?

🔰हे दोन प्रश्न सुटले की माणूस आनंदी होऊ शकतो. मुख्य म्हणजे वखवख नसली की माणसं सुखी होऊ शकतात.

🔰भारतानं भुतानकडून हे शिकायल हवं...

18 नोव्हेंबर झटपट दिवसभरातील संक्षिप्त घडामोडी

केंद्र सरकारने मेघालयमधील फुटीरतावादी एचएनएलसी आणि त्याच्याशी संबंधित सर्व गटांना केले बेकायदेशीर घोषित

▪ जेएनयू विद्यापीठ प्रशासनानं वसतिगृहाच्या शुल्कामध्ये वाढ केल्याने विद्यार्थी आक्रमक; पोलिसांकडून विद्यार्थ्यांची धरपकड

▪ पंतप्रधान मोदींकडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि बिजू जनता दल पक्षांचं कौतुक; भाजपने आदर्श घेण्याचा सल्ला

▪ व्हॅटिकनपोप फ्रान्सिस धार्मिक तसेच कौटुंबिक दौऱ्यावर जाणार; युद्धातील हुतात्म्यांच्या कुटुंबियांचे करणार सांत्वन

▪ कभी कभी लगता है की अपुन ही भगवान है; संसदेच्या हिवाळी अधिवेशनात संजय राऊतांचा भाजपला टोला.

▪ किशोरी पेडणेकर यांचा मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल

▪ दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; येत्या वर्षात 3 मार्चपासून दहावी तर 18 फेब्रुवारीपासून बारावीची लेखी परीक्षा होणार सुरु

▪ फेसबुक आणि ट्विटरला टक्कर देण्यासाठी विकिपीडियाचे 'डब्लूटी: सोशल' अ‍ॅप येणार; वेबसाईटही सुरु

▪ धोनीमुळं 2011 च्या वर्ल्डकप फायनलमध्ये माझं शतक हुकलं: गौतम गंभीरचा खळबळजनक खुलासा

▪ अभिनेता शाहरुख खानची कन्या सुहाना खानचा 'द ग्रे पार्ट ऑफ ब्लू' हा लघुचित्रपट प्रदर्शित