०३ नोव्हेंबर २०१९

उत्तर कोकण, उत्तर-मध्य , महाराष्ट्रात अतिवृष्टीचा इशारा

🏈🔴अरबी समुद्रात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळं ६ ते ८ नोव्हेंबर या कालावधीत  आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह  हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळं पावसामुळं पिकांचे नुकसान झाल्यानं हवालदिल झालेल्या शेतकऱ्याच्या चिंतेत आणखी भर पडली आहे. दरम्यान, पुण्यासह औरंगाबाद आणि अन्य भागांत आज संध्याकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली.

🏈🔴राज्यात गेल्या दहा ते पंधरा दिवसां पासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतक ऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसा ळ्याच्या सुरुवातीला दुष्काळाचं सावट निर्माण झालेल्या मराठवाडा, विदर्भात आता परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. मराठवाड्यात सोयाबीन, कापूस, ज्वारी, तूर, उडीद, बाजरी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर विदर्भातील खरीप पिकांबरोबरच रब्बी पिकांचंही मोठे नुकसान झाले आहे. सोसाट्याचा वारा आणि पावसामुळे सोयाबीनसह तूर, हरभरा, ज्वारी, कापूस या रब्बीच्या पिकांचे नुकसान झाले आहे. डाळींब, पपई, या फळबागांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळं शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे. पिकांच्या नुकसानीमुळं उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या महा चक्रीवादळामुळं बुधवारपासून (६ नोव्हेंबर ते ८ नोव्हेंबरपर्यंत) उत्तर कोकणसह उत्तर मध्य महाराष्ट्रातील विविध भागांत मेघगर्जनेसह अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागानं दिला आहे.

📌📌मच्छिमारांनो, परत फिरा रे....

🏈🔴अरबी समुद्रात  आलं आहे. समुद्रामध्ये वाऱ्याचा वेग अधिक असणार आहे. त्यामुळं मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. समुद्रात गेलेल्या मच्छिमारांना पुन्हा किनाऱ्यावर येण्याच्या सूचनाही सरकारनं दिल्या आहेत. तसंच योग्य त्या उपाययोजनांसह सज्ज राहण्याच्या सूचना संबंधित विभागातील सर्व यंत्रणांना देण्यात आल्या आहेत. मदतीसाठी मंत्रालयातील नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

📌📌पुणे, औरंगाबादेत जोरदार पाऊस

🏈🔴पुणे आणि औरंगाबादमध्ये आज संध्याकाळी जोरदार पाऊस पडला. पुण्यातील कात्रज, बिबवेवाडी, वानवडी, धनकवडी, सहकार नगर भागात मुसळधार पाऊस कोसळला. सासवड आणि पुरंदर भागातही पाऊस सुरू आहे. तर औरंगाबादमधील काही भागांतही पावसानं हजेरी लावली.

सराव प्रश्नसंच - भूगोल 9/11/2019


● माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोठे आहे ?

अ. सातारा
ब. नाशिक
क. रायगड
ड. पुणे

उत्तर - क. रायगड

● मुळशी धरण कोणत्या नदीवर आहे

अ. मुळा
ब. तापी
क. गोदावरी
ड. कृष्णा

उत्तर - अ. मुळा

● महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ कोणते?

अ. पुणे विद्यापीठ
ब. मुंबई विद्यापीठ
क. शिवाजी विद्यापीठ
ड. नागपूर विद्यापीठ

उत्तर - ब. मुंबई विद्यापीठ

● महाराष्ट्राचे क्षेत्रफळ एकूण किती चौ. किमी आहे?

अ. 307713
ब. 407434
क. 503932
ड. 603832

उत्तर - अ. 307713

● महाराष्ट्राचा लोकसंख्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो?

अ. पहिला
ब. दुसरा
क. तिसरा
ड. चौथा

उत्तर - ब. दुसरा

● चिकूचे उत्पादन सर्वाधिक कोठे होते?

अ. रायगड
ब. ठाणे
क. पालघर
ड. नाशिक

उत्तर - क. पालघर

● महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक जास्त लोकसंख्या आहे?

अ. रायगड
ब. पुणे
क. नागपूर
ड. ठाणे

उत्तर - ड. ठाणे

● कोणत्या जिल्ह्यात तुषार सिंचनाचे प्रमाण सर्वाधिक आहे?

अ. पुणे
ब. नाशिक
क. नागपूर
ड. कोल्हापूर

उत्तर - ब. नाशिक

● महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीरी कोणत्या जिल्ह्यात आहेत?

अ. अहमदनगर
ब. पुणे
क. सोलापूर
ड. रायगड

उत्तर - अ. अहमदनगर

● सेवाग्राम आश्रम कोणत्या ठिकाणी आहे?

अ. पुणे
ब. सांगली
क. वर्धा
ड. अहमदनगर

उत्तर - क. वर्धा

राज्यांत नाही एकही मानसिक हॉस्पिटल

देशभरात मानसिक रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असूनही देशातील 13 राज्यात एकही मानसिक  हॉस्पिटल नाही. यामध्ये सहा राज्य व सात केंद्रशासीत प्रदेशांचा समावेश असल्याचे WHO च्या अहवालातून आले समोर. देशात साधारण 15 कोटी लोकांना मानसिक आजार असून त्यांना उपचाराची गरज आहे.

▪ *राज्य* : हरियाणा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, सिक्किम, मिझोराम व छत्तीसगड या राज्यात हॉस्पिटल नाही.
▪ *केंद्रशासित प्रदेश* : चंदीगड, दादर व नगर हवेली, पाँडेचरी, दमन दीव, लक्षद्वीप, अंदमान निकोबार आणि लडाख.

WHO रिपोर्ट:

●  24 राज्यात व केंद्र शासित प्रदेशात मेंटल हॉस्पिटल, लोकसंख्येच्या तुलनेत हे अत्यल्प आहेत.
●  बिहार, ओडिशा, पंजाब, तामिळनाडू, आंध्र प्रदेश व दिल्ली या राज्यात फक्त एक-एक हॉस्पिटल आहे.
●  पश्चिम बंगालमध्ये सर्वात जास्त मेंटल हॉस्पिटल आहेत.

राज्यांतील हॉस्पिटल संख्या:

*1.* महाराष्ट्र - 4
*2.* गुजरात - 4
*3.* उत्तर प्रदेश - 3
*4.* केरळ - 3
*5.* मध्य प्रदेश - 2
*6.* झारखंड - 2
*7.* कर्नाटक - 2
*8.* राजस्थान - 2

देशभरात हॉस्पिटलसह डॉक्टरांची संख्याही खूप कमी आहे. एक लाख रुग्णसंख्येमागे तीन डॉक्टर आहेत. आरोग्याच्या बजेटपैकी फक्त 0.06 टक्के रक्कम खर्च केली जाते. त्यामुळे 80 टक्के रुग्णांना देशात उपचार मिळत नाही.

बेरोजगारी दर 8.5 टक्क्यांवर

भारतातील बेरोजगारीचा दर गेल्या तीन वर्षांतील उच्चांकावर 8.5 टक्क्यांपर्यंत (ऑक्टोबर) वाढला आहे.  सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी (CMIE) या संस्थेने नुकतीच बेरोजगारीची आकडेवारी जाहीर केली आहे.

देशातील उद्योगांना मंदीने ग्रासल्यामुळे ऑगस्टनंतर प्रथमच देशातील बेरोजगारीचे प्रमाण आठ टक्क्यांवर गेले आहे. सप्टेंबरमध्ये बेरोजगारीचा दर 7.2 टक्के होता. वाढत्या बेरोजगारीमुळे सरकारपुढे नवे संकट उभे राहिले आहे.

चालू घडामोडी प्रश्न 3/11/2019

• कोणत्या सरकारी योजनेच्या अंतर्गत पाच किलोग्राम वजनी एलपीजी गॅस सिलिंडर उपलब्ध करून दिले जाणार आहे? :- प्रधानमंत्री उज्वला योजना

• भारत सरकार कोणत्या शहरात आंतराष्ट्रीय लवाद केंद्राची स्थापना केली जाणार आहे:- नवी दिल्ली

• भारतातल्या जलमार्गांद्वारे प्रथमच वाहतूक केली जात असून -----------या देशांकडे माल पाठवला जात आहे - भुतान आणि बांग्लादेश.

• 12 जुलै रोजी भारताने बंदी घातली बंडखोर संस्था - शिख फॉर जस्टिस.

•  -------या वैमानिकांनी उत्तर व दक्षिण ध्रुवांना प्रदक्षिणा घालत केवळ 46 तास, 39 मिनिट आणि 38 सेकंदात 24,966 मैल प्रवास करून जगभरात सर्वात वेगवान प्रवास करण्याचा विश्वविक्रम रचला - हामिश हार्डिंग (लंडन) आणि कर्नल टेरी विरट्स (नासाचा अंतराळवीर).

•  2020 साली दिल्या जाणाऱ्या ‍आंतरराष्ट्रीय बुकर पारितोषिकाच्या निर्णय समितीमध्ये निवड झालेले भारतीय लेखक------ हे आहेत - जीत थाईल.

• ऑस्ट्रेलियाच्या-------- या गोलंदाजाने 27 वा बळी घेत एकाच विश्वचषक स्पर्धेत सर्वाधिक बळी घेण्याच्या 12 वर्षांपूर्वीचा ग्लेन मॅक्ग्राथचा विक्रम मोडला - मिशेल स्टार्क.

• 2020 सालापर्यंत जगातला सर्वात तरुण देश कोणता – भारत

• रेल्वे महामंडळ परिसरात अनधिकृतरित्या सिलबंद जलपेय विक्रीवर निर्बंध आणण्यासाठी रेल्वे सुरक्षा दलाने चालविलेले अखिल भारतीय कारवाई अभियान - ‘ऑपरेशन थर्स्ट

• 10 जुलैला घेतलेल्या निर्णयानुसार केंद्रीय मंत्रिमंडळाने या दलाला संघटीत गट ‘ए’ चा दर्जा देण्यास मंजुरी दिली - भारतीय रेल्वे सुरक्षा दल (RPF).

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) थरथर, चुरचुर, खळखळ, सळसळ, ओरड, पीक – हे शब्द कोणते धातू आहेत ?
   1) कृतिवाचक धातू    2) अकर्मक धातू    3) उभयविध क्रियापदे    4) सकर्मक क्रियापदे

उत्तर :- 2

2) खालील वाक्य हे कोणत्या ‘स्थानिक क्रियाविशेषणाचे’ उदाहरण आहे.

     ‘ती काय माती गाते !’

   1) विशेषण      2) नाम      3) कृदंत        4) उभयान्वयी अव्यय

उत्तर :- 2

3) दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

    ‘आज्ञेबरहुकूम’

   1) हेतुवाचक      2) योग्यतावाचक    3) संबंधवाचक      4) भागवाचक

उत्तर :- 2

4) मधूला गोरी नि शिकलेली वधू पाहिजे या वाक्यातील ‘नि’ हे अव्यय कोणते ?

   1) विकल्प बोधक    2) समुच्चय बोधक    3) परिणाम बोधक      4) न्युनत्व बोधक

उत्तर :- 2

5) काल म्हणे मुलांनी गडबड केली. या वाक्यातील अव्ययाचा प्रकार सांगा.

   1) संबोधनदर्शक      2) व्यर्थ उद्गारवाची    3) संमती दर्शक      4) यापैकी नाही

उत्तर :- 2

6) जेव्हा वर्तमान काळाबरोबर क्रिया करण्याचा हेतू समजतो तेव्हा  तो .............. वर्तमानकाळ होतो.

   1) पूर्ण वर्तमानकाळ    2) रीती वर्तमानकाळ
   3) अपूर्ण वर्तमानकाळ    4) उद्देश वर्तमानकाळ

उत्तर :- 4

7) पुढील विधाने वाचून योग्य पर्याय निवडा.

   अ) अकारांत पुल्लिंगी नामाचे सामान्यरूप आ – कारांत होते.
   ब) अकारांत स्त्रीलिंगी नामाचे सामान्यरूप एकवचनात ए – कारांत होते.

   1) केवळ अ बरोबर    2) केवळ ब बरोबर    3) अ आणि ब बरोबर    4) अ आणि ब चूक

उत्तर :- 3

8) खालीलपैकी अनेक वचनी नामे ओळखा.

   अ) रोमांच      ब) हाल      क) शहारे        ड) डोहाळे
   1) फक्त क आणि ड    2) फक्त अ, क आणि ड  3) वरील सर्व      4) फक्त अ आणि ब

उत्तर :- 3

9) कर्मणी प्रयोगात कर्म हे ..................... विभक्तीत असते.

   1) प्रथमा      2) व्दितीया    3) तृतीया      4) चतुर्थी

उत्तर :- 1

10) ‘माणूस जातो. त्याची कीर्ति मागे उरते.’ या वाक्याचे संयुक्त वाक्य कसे होईल ?

   1) माणूस गेला तरी त्याची कीर्ति मागे उरते      2) माणूस जातो. कीर्ति उरते
   3) कीर्ति उरली, माणूस उरला        4) यापैकी काहीही नाही

उत्तर :- 1

इतिहासातील महत्त्वपूर्ण वृत्तपत्र


१) तत्त्वबोधिनी पत्रिका - रविंद्रनाथ टागोर
२) व्हाईस ऑफ इंडिया - दादाभाई नौरोजी
३) रास्तगोफ्तार - दादाभाई नौरोजी
४) न्यू इंडिया - बिपिनचंद्र पाल
५) न्यू इंडिया - अ‍ॅनी बेझंट
६) यंग इंडिया - महात्मा गांधी
७) इंडियन मिरर - डी. डी. सेन
८) द ईस्ट इंडियन - हेन्री डेरोझियो
९) इंडियन ओपिनियन - महात्मा गांधी
१०) नॅशनल हेरॉल्ड - पंडित नेहरू
११) इंडिपेडन्स - पं. मोतीलाल नेहरू
१२) अल-हिलाल - मौलाना आझाद
१३) अल-बलाघ - मौलाना आझाद
१४) कॉमन विल - अ‍ॅनी बेझंट
१५) भारतमाता - अजित सिंग
१६) हिंदू - सी.सुब्रण्यम अय्यर
१७) सर्चलाईट - डॉ. राजेंद्र प्रसाद
१८) सोमप्रकाश - ईश्वरचंद्र विद्यासागर
१९) पंजाबी पीपल - लाला लजपतराय
२०)  गंभीर इशारा - वि. दा. सावरकर
२१) संवाद कौमुदी - राजा राममोहन राय
२२) बॉम्बे क्रॉनिकल - फिरोजशहा मेहता
२३) बंगाली - सुरेंद्रनाथ बॅनर्जी
२४) बेंगाल हेरॉल्ड - राजा राममोहन रॉय
२५) हिन्दुस्थान रिव्ह्यू - एस. पी. सिन्हा
२६) अखबार-ए-आझम - हरिकृष्ण लाल
२७) हिंदुस्थानी वकील - जी. पी. वर्मा
२८) कॉमरेड - मोहम्मद अली जव्हार
२९) हमदर्द - मोहम्मद अली जव्हार
३०) गदर - लाला हरदयाल
३१) व्हँनगार्ड - एम. एन. रॉय
३२) मिरात-उल्-अखबार - राजा राममोहन राय
३३) उदबोधन - स्वामी विवेकानंद
३४) प्रबुद्ध भारत - डॉ. आंबेडकर
३५) रिव्होल्यूशनरी - सचिन्द्रनाथ सन्याल
३६) किर्ती - संतोषसिह
३७) ब्रह्मबोधिनी - उमेशचंद्र दत्त
३८) सुलभ समाचार - केशवचंद्र सेन
३९) बांग्लाकथा - सुभाषचंद्र बोस
४०) इंडिया - सुब्रण्यम भारती
४१) दी इंडियन स्पेक्टॅटर - बेहरामजी मलबारी
४२) इंडियन फिल्ड - किशोरीचंद मित्र
४३) अबला बांधव - द्वारकानाथ गांगुली
४४) फ्री हिन्दुस्थान -तारकानाथ दास
४५) परिदर्शक - बिपिनचंद्र पाल
४६) जन्मभूमी  - पट्टाभि सितारामय्या
४७) मुंबई समाचार - फरदुनजी
४८) तलवार - विरेंद्रनाथ चटोपाध्याय
४९) लीडर - पं. मदनमोहन मालवीय
५०) पख्तून - खान अब्दुल गफारखान
५१) इंडियन मजलीस - अरविद घोष (केम्ब्रिज)
५२) इंडियन सोशॅलॉजिस्ट - श्यामजी कृष्ण वर्मा (लंडन)
५३) वंदे मातरम् - अरविद घोष (कोलकता)
५४) वंदे मातरम् - लाला लजपतराय (पंजाब)
५५) वदे मातरम् - मादाम कामा (पॅरिस)
५६) नवजीवन समाचार - महात्मा गांधी (गुजराती)
५७) युगांतर - भूपेंद्र दत्त बारिंद्र घोष
५८) संध्या - ब्रह्मबांधव उपाध्याय
५९) अमृतबझार पत्रिका - शिरीषकुमार घोष आणि एम. एल. घोष
६०) वंगभाषी - बाबू जोगेन्द्रनाथ बसू
६१) क्रांती - मिरजेकर, जोगळेकर व घाटे
६२) प्रताप (दैनिक) - गणेश शंकर विद्यार्थी (कानपूर)
६३) मुकनायक - डाॅ. आंबेडकर
६४) बहिष्कृत भारत - डाॅ. आंबेडकर
६५) जनता - डाॅ. आंबेडकर
६६) केसरी - लोकमान्य टिळक
६७) मराठा - लोकमान्य टिळक
६८) हास्य संजीवनी - विरेशलिंगम पंतलु
६९)शालापत्रक - विष्णूशास्त्री चिपळूणकर
७०) प्रभाकर - भाऊ महाजन
७१) धुमकेतू - भाऊ महाजन
७२) ज्ञान दर्शन - भाऊ महाजन
७३) दिनबंधू - कृष्णराव भालेकर
७४) दिग्दर्शन - बाळशास्त्री जांभेकर
७५) प्रगती - त्र्यंबक शंकर शेजवलकर
७६) हरिजन - महात्मा गांधी
७७) संजीवनी - कृष्णकुमार मित्र

​​देशातली ‘पशुधन गणना 2019’

देशातल्या पशू संख्येची आकडेवारी स्पष्ट करणारी 20वी ‘पशुधन गणना’ याचा अहवाल केंद्र सरकारने प्रसिद्ध केला आहे.

अहवालात असे दिसून आले आहे की, देशात दुभत्या जनावरांची संख्या वाढत असून देशी आणि क्रॉस-ब्रीड मादा गुराढोरांची संख्या वाढत आहे.

🏆 ताज्या आकडेवारीनुसार -

• सन 2019 मध्ये एकूणच पशुधनाची संख्या 535.78 दशलक्ष एवढी होती.

• मुख्यत: मेंढ्या व बकरींच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे आढळून आले आहे.

• गेल्या वर्षांत घट झाल्यानंतर एकूण जनावरांची संख्या किरकोळ वाढलेली आहे.

• देशी जनावरांच्या संख्या सन 2012 पासून स्थिर आहे.

• सन 2019 मध्ये गुराढोरांची संख्या 192.49 दशलक्ष होती (2012च्या गणनेच्या तुलनेत 0.8 टक्क्यांची वाढ). ही वाढ मुख्यत: क्रॉस-ब्रीड गुरांच्या वाढीमुळे झाली आहे ज्यामुळे दुधाचे प्रमाण जास्त आहे.

• मादा क्रॉस-ब्रीड गुराढोरांची संख्या 46.95 दशलक्षांवर गेली. देशी मादा गुराढोरांची संख्या 98.17 दशलक्ष झाली आहे. म्हशींची संख्या 109.85 दशलक्ष एवढी झाली.

• दुभत्या जनावरांच्या संख्येत 6 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

• सन 2018-19 मध्ये भारतात एकूण 188 दशलक्ष टन दूध उत्पादन झाले. त्यात क्रॉस-ब्रीड प्राण्यांचे जवळपास 28 टक्के योगदान होते, असा अंदाज आहे.

• घरामागच्या अंगणात होणार्‍या कुक्कुटपालनात वाढ दिसून आली आहे. सन 2019 मध्ये कोंबड्यांची संख्या 851.18 दशलक्ष इतकी होती (2012च्या तुलनेत 17 टक्क्यांनी वाढ).

अंदमान आणि निकोबारमधील ट्रॅक आयलँडवर भारतीय वायुसेनेने दोन ब्रह्मोस क्षेपणास्त्रे उडाली

📌अंदमान आणि निकोबार बेटांच्या ट्रॅक आयलँडवर भारतीय वायुसेनेने दोन ब्राह्मोस पृष्ठभाग ते पृष्ठभाग क्षेपणास्त्र डागले.

📌 नियमित ऑपरेशनल ट्रेनिंगचा एक भाग म्हणून जुळ्या ऑपरेशन्स केल्या आहेत.

📌 हे क्षेपणास्त्र 300 किमी अंतरावर नेमलेले लक्ष्य गाठले.

🔴 दोन्ही घटनांमध्ये लक्ष्य थेट फटका बसला.

📌 क्षेपणास्त्रांच्या गोळीबारामुळे पिनपॉईंट अचूकतेसह मोबाइल फलाटांमधून हवाई लक्ष्य ठेवण्याची वायुसेनेची क्षमता वाढली आहे.

सामान्य ज्ञान I General Knowledge

1) कंत्राटी शेती बाबतचा कायदा तयार करणारे भारतातही पहिले राज्य कोणते?
उत्तर : तामिळनाडू

2) भारतात 125 रुपयांच्या चलनी नाण्याचे अनावरण कुणाच्या स्मरणार्थ करण्यात आले आहे?
उत्तर : परमहंस योगानंद

3) भारताकडून कोणता देश ब्रह्मोस क्षेपणास्त्र खरेदी करणार आहे?
उत्तर : फिलीपिन्स

4) सध्याचे जागतिक बँकेचे अध्यक्ष कोण आहेत?
उत्तर : डेव्हिड आर. मालपास

5) ‘शक्ती-2019’ हा कोणत्या 2 देशांदरम्यानचा लष्करी सराव आहे?
उत्तर : भारत आणि फ्रान्स

6) जागतिक ध्वनिचित्र वारसा दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर : 27 ऑक्टोबर

7) ‘इक ओंकार’ हे शब्द कोणत्या भारतीय हवाई सेवा कंपनीने विमानाच्या शेपटीवर चित्रित केले आहेत?
उत्तर : एअर इंडिया

8) शांघाय सहकार्य संघटना (SCO) याच्या सदस्य देशांच्या प्रमुखांची बैठक कोणत्या देशात होणार आहे?
उत्तर : उझबेकिस्तान

9) भारत आणि उझबेकिस्तान देशांदरम्यानच्या ‘डस्टलिक-2019’ या लष्करी सरावाचा कालावधी काय आहे?
उत्तर : 4 ते 13 नोव्हेंबर

10) भारतातही पहिले अणुऊर्जा केंद्रे कोणते आहे?
उत्तर : तारापूर

प्रश्नसंच 3/11/2019

● तांब्याच्या पत्र्यावर कोरलेले लेख म्हणजे काय असते?

अ. तांबेपट
ब. ताम्रपट
क. ताम्रलेख
ड. शिलालेख

उत्तर - ब.ताम्रपट

● मानवाच्या प्रगतीला याच्यामुळे वेग आला.

अ. चाक
ब. अग्नी
क. शेती
ड. हत्यार

उत्तर - अ. चाक

● सर्वात प्राचीन वेद कोणता?

अ. यजुर्वेद
ब. सामवेद
क. ॠग्वेद
ड. अथर्ववेद

उत्तर - क.ॠग्वेद

● सम्राट अशोकाने स्तुप कोठे बांधला?

अ. जयपूर
ब. वाराणसी
क. मथुरा
ड. सांची

उत्तर - ड. सांची

● मुघल सत्तेचा संस्थापक कोण आहे?

अ. बाबर
ब. हुमायून
क. औरंगजेब
ड. अकबर

उत्तर - अ.बाबर

● खालसा दल कोणी स्थापित केले?

अ. गुरूनानक
ब. गुरूगोविंदसिग
क. बदा बैरागी
ड. बलवीरसिंग

उत्तर - ब. गुरूगोविंदसिग

● मुघल काळात तांब्याच्या नाण्याला काय म्हणत?

अ. टंका
ब. दाम
क. मोहर
ड. पैसा

उत्तर - ब. दाम

● लाल किल्ला कोणी बांधला?

अ. शाहजहान
ब. बाबर
क. अकबर
ड. जहागीर

उत्तर - अ. शाहजहान

● खेळणा किल्लास शिवाजी महाराजांनी काय नाव ठेवले?

अ. प्रतापगड
ब. रायगड
क. विशाळगड
ड. पन्हाळा

उत्तर - क. विशाळगड

● शिवाजी महाराजांनी या अधिकाऱ्यावर जमीन महसुलाची व्यवस्था सोपवली?

अ. पंडीत गागापट्ट
ब. रामचंद्र डबीर
क. मुरारबाजी देशपांडे
ड. अण्णाजी दत्तो

उत्तर - ड. अण्णाजी दत्तो

राजधानीत आरोग्य आणीबाणी

📌वायुप्रदूषणाची स्थिती खालावली, शाळांना सुट्टी

📌 शुक्रवारी वायुप्रदूषणाची स्थिती इतकी खालावली की पर्यावरण प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने संपूर्ण दिल्ली परिसरात आरोग्य आणीबाणी जाहीर करावी लागली.

📌दिल्ली गॅस चेंबर बनली असून नागरिकांच्या आरोग्यावर अत्यंत घातक परिणाम होऊ  लागला आहे.

📌पंजाब आणि हरियाणातील शेतजमिनी जाळल्या जात असून त्याचा भुर्दंड दिल्लीकरांना भोगावा लागत असल्याची टीका आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केरीजवाल यांनी केली आहे.

📌दिल्ली सरकारने शाळांना पुढील पाच दिवस सुट्टी दिली असून ५० लाख मास्कचे वाटप केले जाणार असून शुक्रवारी केजरीवाल यांनी वाटपाला सुरुवात केली.

📌राजधानीत ५ नोव्हेंबपर्यंत सर्व बांधकामांवर बंदी घालण्याचा आदेश प्रदूषण नियंत्रण प्राधिकारणाने दिला आहे. ऑक्टोबरपासूनच शेतजमिनी जाळण्याची प्रक्रिया सुरू होते.

📌त्याचा प्रचंड धूर थेट दिल्ली शहरात पसरत असल्याने तसेच, दिवाळीच्या काळात फटाक्यांमुळे वायुप्रदूषणाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर वाढते.

✍ अत्यंत गंभीर स्थिती

📌हवेची श्रेणी उत्तम गुणवत्ता सरासरी ०-५० इतकी   मानली जाते.
📌 ५१-१०० ही श्रेणी समाधानकारक, 📌 १०१-२०० मध्यम,
📌 २०१-३०० घातक,
📌 ३०१-४०० अत्यंत घातक,
📌 ४०१-५०० अत्यंत गंभीर अशा श्रेणीमध्ये हवेतील प्रदूषणाची स्थिती मोजली जाते.

📌शुक्रवारी दिल्लीत हवेची गुणवत्ता सरासरी ५०० हूनही अधिक म्हणजेच अत्यंत गंभीर या श्रेणीत होती.

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न विषय :-सामान्य ज्ञान

1)औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण हे छोटंसं नगर कशासाठी प्रसिद्ध आहे ?

👉साडी

2)लक्षद्वीप येथे........ स्थित आहे ?

👉 अरबी समुद्र

3)महाराष्ट्रातील सर्वात उंच धबधबा कोणता ?

👉ठोसेघर धबधबा

4)डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ कोणत्या शहरात आहे ?

👉औरंगाबाद

5)महाराष्ट्रातील कोणत्या शहराला पूर्वेचे ऑक्सफर्ड म्हणतात ?

👉पुणे

6)एपिसेंटर हा शब्द कशाच्या संदर्भात वापरला जातो ?

👉 भूकंप

7)भारतातील बारा ज्योतिर्लिंगांपैकी त्रंबकेश्वर हे ज्योतिर्लिंग कोठे स्थित आहे ?

👉 नाशिक

8)महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यातील त्रिवेणी संगमात येऊन वारुणी आणि थारुणी नद्यांना मिळणाऱ्या नदीचे नाव काय ?

👉गोदावरी

9) हुजूर साहेब गुरुद्वारा महाराष्ट्रात कोठे आहे ?

👉नांदेड

10)अजिंठा आणि वेरूळ लेण्या कोणत्या जिल्ह्यात स्थित आहेत ?

👉 औरंगाबाद

11) महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मर्यादित चे मुख्यालय कोठे स्थित आहे ?

👉अकोला

12) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?

👉1962

13) माथेरान, म्हैसमाळ आणि गगनबावडा हे महाराष्ट्रातील........... आहेत.

👉 थंड हवेची ठिकाणे

14) 2011 च्या जनगणनेनुसार खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यांमध्ये शहरीकरणाची पातळी सर्वात कमी आहे ?

👉 गडचिरोली

15)महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्याला सर्वात मोठी किनारपट्टी लाभली आहे ?

👉 रत्नागिरी
============================

चालू घडामोडी वन लाइनर्स, 02 नोव्हेंबर 2019.

✳ 01 नोव्हेंबर: जागतिक शाकाहारी दिवस

✳ 01 नोव्हेंबरच्या स्थापना दिन: केरळ, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि छत्तीसगड

✳ कोलंबियाने आर्थिक समावेश अहवाल 2019 वर ग्लोबल मायक्रोस्कोप अव्वल स्थान प्राप्त केले

✳ ग्लोबल मायक्रोस्कोप ऑन फायनान्शियल इन्क्लूजन रिपोर्ट 2019 मध्ये पेरूचा दुसरा क्रमांक आहे

✳ वैश्विक मायक्रोस्कोप ऑन वित्तीय समावेश अहवाल 2019 मध्ये उरुग्वेचा तिसरा क्रमांक आहे

✳ ग्लोबल मायक्रोस्कोप ऑन फायनान्शियल इन्क्लूजन रिपोर्ट 2019 मध्ये भारताचा पाचवा क्रमांक आहे

✳ जम्मू आणि काश्मीर आणि लडाख औपचारिकपणे केंद्र शासित प्रदेश बनतात

✳ रॉडटेक 2019 रोजी 5 व्या आंतरराष्ट्रीय परिषद नवी दिल्ली येथे आयोजित

✳ पश्चिम बंगालने गुटखा उत्पादन, साठवण, विक्री यावर पूर्ण बंदी घातली

✳ हैदराबाद आता अधिकृतपणे युनेस्को क्रिएटिव्ह सिटी ऑफ गॅस्ट्रोनॉमी म्हणून अधिकृतपणे नियुक्त केले गेले आहे

✳ थायलंडमध्ये 3 रा क्षेत्रीय व्यापक आर्थिक भागीदारी

✳ झारखंड विधानसभा निवडणुका 2019 च्या निवडणुका 30 नोव्हेंबरपासून 5 टप्प्यात घेण्यात येतील

✳ मिनर्वा पंजाब एफसी पंजाब फुटबॉल क्लब म्हणून नामकरण करण्यात आले

✳ लोकप्रिय तेलुगू अभिनेत्री गीतांजली यांचे नुकतेच निधन झाले

✳ 22 नोव्हेंबरपासून जगभरात सर्व राजकीय जाहिरातींवर बंदी घालण्यासाठी ट्विटर

✳ पवन कपूर यांची युएईमध्ये राजदूत म्हणून नेमणूक

✳ छत्तीसगडमध्ये आरपी मंडळाची मुख्य सचिव म्हणून नेमणूक

✳ ग्लोबल मेरीटाईम फोरमच्या 2020 च्या होस्टसाठी लंडन नेमणूक केली

✳ अमरेश्वर प्रताप साही यांना मद्रास उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले

✳ के मित्तल यांची मध्य प्रदेश हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती

✳ संजय करोल यांची पटना हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती

✳ प्रणव मिस्त्री यांनी सॅमसंगच्या स्टार लॅबचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी नियुक्त केले

✳ सेनेचे सभागृह नेते म्हणून एकनाथ शिंदे निवडून आले

✳ ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून रोहित शर्मामध्ये ट्रुसॉक्स इंडिया रोप

✳ चिली रद्द झाल्यानंतर स्पेनने यूएन हवामान परिषदेचे आयोजन केले आहे

✳ संजीव नंदन सहाय यांची ऊर्जा मंत्रालयाच्या सचिवपदी नियुक्ती

✳ सिंगापूरमध्ये जगातील प्रथम ब्लॉकचेन-आधारित कार्बन ट्रेडिंग एक्सचेंज

✳ एअर इंडिया पेंट्स 'एक ओंकार' प्रतीक त्याच्या बोईंग 787 विमानावरील

✳ मेरी कॉमला आयओसीच्या 2020 ऑलिम्पिक अ‍ॅथलिट अम्बेसॅडर्स ग्रुपमध्ये नाव

✳ केरळमध्ये आयोजित जागतिक आयुर्वेद समिट 2019 चे तिसरे संस्करण

✳ 35 व्या एशियन समिटची सुरुवात थायलँडच्या बँकॉकमध्ये झाली

✳ 35 व्या एशियन थीम: "टिकाव धैर्याने वाढवण्यासाठी भागीदारी"

✳ इस्रो नवी दिल्लीमध्ये अवकाश तंत्रज्ञान सेल स्थापित करेल

✳ जर्मन चांसलर अँजेला मर्केल 2 दिवसाच्या भेटीसाठी भारतात आल्या आहेत

✳ पाचव्या इंडो-जर्मन इंटिगोव्हेंमेंटल सल्लामसलत दिल्ली येथे

✳ सार्वजनिक आरोग्य आणीबाणीची घोषणा नवी दिल्लीत झाली

✳ जेके आणि लडाखमध्ये बांबू टेक्नॉलॉजी पार्क उभारण्याचे केंद्र

✳ सिकंदराबाद देशाचा पहिला विज्ञान कॉरिडोर मिळविण्यासाठी

✳ अरुणाचल प्रदेशच्या पहिल्या भाषेत लेखकांच्या पहिल्या बैठकीचे आयोजन

✳ भारत दरम्यान पहिला नौदल व्यायाम - सन 2020 मध्ये सौदी अरेबिया होणार आहे

✳ संरक्षणमंत्री राजनाथ सिंह ताश्कंद, उझबेकिस्तानला पोहोचले

✳ राजनाथ सिंह ताशकंदमध्ये एससीओच्या प्रमुख ऑन स्टेट्स बैठकीस उपस्थित होते

✳ एक भारत श्रेष्ठ भारत पर्व 2019 नवी दिल्ली येथे आयोजित

✳ राष्ट्रपती आर एन कोविंद यांनी आयआयटी दिल्लीचा एंडोमेंट फंड लाँच केला

✳ 5 लाख शासकीय वाहने ई-वाहनात रुपांतरित केली जातील

✳ पंतप्रधान नरेंद्र मोदी आसियान शिखर परिषदेसाठी थायलंडला भेट देणार आहेत

✳ 16 व्या आसियान-भारत समिट थायलँडच्या बँकॉकमध्ये होणार आहे

✳ 14 वेस्ट एशिया आशिया समिट बँकॉक, थायलंड येथे होणार आहे.