२६ ऑगस्ट २०१९

चालू घडामोडी प्रश्नसंच 26/8/2019

📌25 फेब्रुवारी 2018 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या ठिकाणी 'रन फॉर न्यू इंडिया' मॅरेथॉनचे झेंडी दाखवून उद्घाटन केले?

(A) अहमदाबाद
(B) गांधीनगर
(C) सूरत✅✅✅
(D) वडोदरा

📌जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर कोण भारताचा दुसरा रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेता (18 वर्षाखालील) आहे?

(A) मार्कू रागिनी
(B) सुखबीर सिंग
(C) कोमलिका बारी✅✅✅
(D) दिपीका कुमारी

📌कोणत्या ठिकाणी जी-7 शिखर परिषद 2019 आयोजित केली गेली?

(A) मनामा, बहरीन
(B) बिआरिट्झ, फ्रान्स✅✅✅
(C) अबू धाबी, सौदी अरब
(D) वरीलपैकी कुठेही नाही

📌24 ऑगस्ट 2019 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी _ येथे 200 वर्ष जुन्या श्री कृष्णा मंदिराच्या पुनर्विकासासाठी 4.2 दशलक्ष डॉलर इतका खर्च असलेल्या प्रकल्पाचे उद्घाटन केले.

(A) अबू धाबी, संयुक्त अरब अमिरात
(B) मक्का, सौदी अरब
(C) मनामा, बहरीन✅✅✅
(D) जेद्दाह, सौदी अरब

📌कोणत्या देशाने 25 ऑगस्ट 2019 रोजी नव्या “सुपर-लार्ज मल्टीपल रॉकेट लाँचर” याची चाचणी घेतली?

(A) उत्तर कोरिया✅✅✅
(B) दक्षिण कोरिया
(C) संयुक्त राज्ये अमेरिका
(D) रशिया

📌अटल पुनरुज्जीविकरण आणि शहरी पुनरुत्थान मोहीम (AMRUT) याच्या अंतर्गत ऑगस्ट 2019 च्या अखेरीस किती उद्याने विकसित केली गेली आहेत?

(A) 159
(B) 1,159✅✅✅
(C) 2,159
(D) 3,159

पृथ्वीजवळून आज जाणार १०२ मजली इमारतीइतका लघुग्रह


◾️ अमेरिकेतील 102 मजली ‘एम्पायर स्टेट बिल्डिंग’ इतक्या आकाराचा लघुग्रह शनिवारी पृथ्वीच्या जवळून जाणार आहे. त्याला ‘2006 क्यूक्यू 23’ असे नाव देण्यात आले आहे. 1870 फूट व्यास असलेल्या या लघुग्रहाची उंची 1454 फूट इतकी आहे. तो ताशी 16,740 कि.मी. वेगाने पृथ्वीजवळून जाईल.

पृथ्वीच्या तुलनेने अधिक जवळून जात असल्याने त्याच्याकडे सुरुवातीपासूनच बारकाईने नजर ठेवली जात आहे. ‘नासा’च्या प्लॅनेटरी डिफेन्स कोऑर्डिनेशन ऑफिसच्या लिंडले जॉन्सन आणि केली फास्ट यांनी सांगितले की, हा लघुग्रह जवळून जात असला तरी पृथ्वीला धडकण्याचा धोका नाही. तो 50 लाख मैल अंतरावरून पुढे निघून जाईल.

पृथ्वीच्या जवळपास एक किलोमीटरपेक्षाही अधिक मोठ्या आकाराचे असे सुमारे 900 लघुग्रह आहेत. ते या ‘2006 क्यूक्यू 3’ पेक्षाही मोठ्या आकाराचे आहेत. पुढील शंभर वर्षांच्या काळात तरी पृथ्वीला लघुग्रहाची धडक होण्याचा धोका संभवत नाही.

एसटीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती, हा निर्णय घेणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य


🔺 सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून प्रत्येक क्षेत्रात स्त्री आणि पुरुष बरोबरीने काम करताना दिसतात.

◾️सध्याचे युग हे आधुनिक तंत्रज्ञानाचे असून प्रत्येक क्षेत्रात स्त्री आणि पुरुष बरोबरीने काम करताना दिसतात. मात्र असे एक क्षेत्र आहे की ते म्हणजे एसटी महामंडळातील चालकांची जागा, यावर आजवर पुरुषांची मक्तेदारी होती. पण आता याच एसटीच्या चालक म्हणून महिलांच्या हाती स्टेअरींग असणार आहे. असा निर्णय घेणारे देशातील महाराष्ट्र राज्य पाहिले ठरले आहे. चालक आणि वाहक प्रशिक्षण पदासाठी पात्र ठरलेल्या महिलांचा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला होता. त्यातील काही महिलांशी लोकसत्ता ऑनलाईनच्या प्रतिनिधीने नांदेड येथील रब्बाना ह्यातखान पठाण यांच्याशी संवाद साधला आहे.

नांदेड जिल्ह्यातील किनवट तालुक्यातील बोधडी हे गाव तीन हजाराच्या आसपास गावांची लोकसंख्या आहे. या गावांत रब्बाना ह्यातखान पठाण या राहतात. आई वडील शेती करतात. तर चार भाऊ आणि चार बहिणी असे मोठे कुटुंब आहे. त्या घरात मोठ्या असल्याने त्यांचे लहान वयातच लग्न झाले. घरी सर्व काही ठीक चालले असताना त्याच दरम्यान मुलगा झाला. त्यानंतर पतीच्या त्रासामुळे विभक्त होण्याचा निर्णय घेतला आणि मग पुढे काय करायचा असा प्रश्न निर्माण झाला.
सातवी पर्यंत शिक्षण झाले होते. आता पुढे शिक्षण घ्यायचा निर्णय घेतला. त्या निर्णयाला घरातील सर्वांनी पाठिंबा देखील मग मी यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठातून दहावीची परीक्षा दिली. त्यात चांगल्या मार्काने उत्तीर्ण देखील झाल्यावर बीए करण्याचे ठरविले आणि आज बीएच्या शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत आहे. संपूर्ण काळ खूप कठिण होता. या दरम्यान शिवणकाम, सेक्युरीटीची काम देखील केले.

त्याच दरम्यान माझी चार ही भावंडे चार चाकी गाडी चालवित असल्याने मी देखील गाडी चालविणे शिकले होते. हे करताना घरातील कोणी ही केव्हाच अडविले नाही. पेपर मध्ये एसटी महामंडळात चालकांची जाहिरात आली. मग विचार केली की, मी आजवर गाडी चालविली आहे. आता एसटी चालवून नागरिकाची सेवा करू अशी भावना मनात निर्माण झाली आणि मनापासून इच्छा व्यक्त केली. आज चालकाचे प्रशिक्षण घेण्यास पात्र ठरले आहे. आता लवकरच एसटी चालविण्यास मिळेल याचा खूप आनंद असून चार चाकी गाडी चालविण्यास भावाकडून प्रेरणा मिळाली आहे. जरी मी या क्षेत्राकडे आली असले, तरी माझे पोलिस खात्यात जाण्याचे स्वप्न होते. पण या पुढे परीक्षा देऊन पोलीस विभागात प्रयत्न करणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
त्याचबरोबर ज्या प्रकारे मी एका गावातून आलेली महिला एसटीची चालक म्हणून लवकरच जबाबदारी हाती घेणार आहे. तशी समाजातील प्रत्येक महिलांनी आव्हाने स्विकारल्यानंतर यश निश्चित मिळतं आणि कोणत्याही परिस्थितीला डगमगून जाऊ नका असे त्यांनी सांगितले.

मनमोहन सिंग यांची SPG सुरक्षा काढली


📍 देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांची 'SPG' सुरक्षा व्यवस्था काढून घेण्याचा केंद्र सरकारने घेतला निर्णय.

👉 सगळ्या गुप्तचर यंत्रणांकडून आढावा घेतल्यानंतर यापुढे मनमोहन सिंग 'झेड प्लस' सुरक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.

📝 *गृहमंत्रालयाने परिपत्रकात म्हटले* :

● सुरक्षेसंदर्भातील निर्णय पूर्णत: प्रोफेशनल आधारावर घेतला आहे.
● ठराविक काळानंतर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घेतला जातो.
● ही सामान्य प्रक्रिया आहे. याअंतर्गत सुरक्षा कमी करणे किंवा वाढवण्याचा निर्णय घेतला जातो.

🤔 *SPG सुरक्षा म्हणजे काय?* :

● SPG (स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप) ही सुरक्षा देशातील निवडक व्यक्तींनाच दिली जाते.
● देशाच्या सर्वात महत्त्वाच्या राजकारण्यांची सुरक्षा करणारे हे उच्च दर्जाचे पथक आहे.
● आता देशातील केवळ 4 जणांच्या सुरक्षेसाठी हे पथक असेल.
● यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांचा समावेश आहे.

💫 सरकारच्या या निर्णयावरून वाद उद्भवण्याची दाट शक्यता आहे.

बहरीनच्या तुरूंगातून 250 भारतीयांची सुटका

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नुकतेच बहरिन देशाच्या दौऱ्यावर जाऊन आले. दरम्यान, त्यांच्या या दौऱ्यातून चांगले काम झाले आहे. बहरिनच्या तुरुंगात असणाऱ्या काही भारतीय कैद्यांची सुटका करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या दौऱ्यात मोदींना बहरीनचे राजे हमाद बिन इसा बिन सलमान अल खलिफा यांच्या हस्ते 'द किंग हमाद ऑर्डर ऑफ दि रेनेसान्स' हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

▪️ भारत आणि बहरीन यांच्यातील द्विपक्षीय संबंध बळकट करण्यासाठी केलेल्या प्रयत्नांबद्दल शनिवारी मोदींचा सन्मान करण्यात आला आहे.

▪️पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बहरीन भेटीनिमित्त तिथे विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफी देण्यात आली आहे.

▪️त्यामुळे बहरीनच्या जेलमधून 250 भारतीयांची सुटका होणार आहे. पंतप्रधान कार्यालयाच्या वतीने एक ट्‌वीट करून याबाबत माहिती देण्यात आली आहे. 'दया आणि मानवतेच्या भावनेने बहरीन सरकारने विविध आरोपांखाली शिक्षा भोगत असलेल्या 250 भारतीय कैद्यांना माफ केले आहे.

राफेलसाठी आणखी तीन वर्षांचे वेटिंग?

▪️राफेल' या बहुचर्चित लढाऊ विमानांची पहिली तुकडी यंदा सप्टेंबर महिन्यामध्ये फ्रान्सकडून भारताला मिळणार असली तरीसुद्धा भारतीय मानके आणि प्रणालीनुसार तयार करण्यात आलेली ही विमाने हवाईदलामध्ये पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी 2021 हे साल उजाडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

या विमानांची पहिली तुकडी हाती आल्यानंतर त्यांचे भारतीय वैमानिक आणि अभियंत्यांना प्रशिक्षण दिले जाईल.

आतापर्यंत तीन वैमानिक आणि दोन तांत्रिक अधिकाऱ्यांनाच या विमानाचे प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सप्टेंबर महिन्यामध्ये हे विमान भारतात आल्यानंतर 2020 पर्यंत हवाई दलातील वैमानिकांच्या तीन तुकड्यांना त्यांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जीना यांचे चौदा मुद्दे

🔹नेहरू रिपोर्ट हा मुस्लिम लीगला मान्य नव्हता. त्यामुळे नेहरू रिपोर्ट चा फेरविचार करण्यासाठी आगाखान यांच्या अध्यक्षतेखाली डिसेंबर १९२८ मध्ये मुस्लिम लीगचे दिल्ली येथे अधिवेशन याच्या मध्ये मुस्लिम लीगच्या दिल्ली येथे अधिवेशन भरले व या अधिवेशनाचे जीनांनी मुस्लिम लीगच्या दृष्टीकोनातून पुढील १४ मुद्दे प्रसिद्ध केले ते पुढीलप्रमाणे आहेत.

🔸जीना यांचे चौदा मुद्दे

* हिंदी राज्यघटना संघात्मक ठेवून प्रांताकडे शेषाधिकार असावे.

* देशातील सर्व घटक राज्यांना सारखेच स्वतंत्र प्राप्त व्हावे.

* सर्व कायदेमंडळात अल्पसंख्याकांना योग्य व परिणाम कारक प्रतिनिधित्व मिळावे.

* केंद्रीय कायदे मंडळात एकूण सभासदांच्या १३ प्रतिनिधी मुस्लिम असावे.

* स्वतंत्र मतदार संघ अस्तित्वात राहतील एखाद्या समाजाला स्वतंत्र मतदार संघाचा त्याग करायचा असेल तर करता येईल.

* बंगाल पंजाब वायव्य सरहद्द प्रदेशाची पुनर्रचना करीत असताना मुस्लिम मताधिक्य कमी येणार नाही याची काळजी घ्यावी.

* मुंबई प्रदेशापासून सिंध प्रदेश वेगळा करावा.

* सर्व समाजाला आपल्या धर्माचे आचरण करण्यास प्रचार आणि धार्मिक शिक्षण देण्यास पूर्ण स्वतंत्र राहील.

* वायव्य सरहद्द प्रदेशामध्ये आणि बलुचिस्तान या प्रदेशमध्ये इतर प्रांतासारखा राजकीय सुधारणा राबवाव्यात.

* स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रशासनात मुस्लिमांना योग्य त्या नोकऱ्या प्राप्त व्हाव्यात.

* कोणत्याही कायदे मंडळात समाजाविषयी ठराव पास होत असेल तर त्या ठरावाला त्या समाजातील ३४ सभासदांनी जर विरोध दर्शविला तर तो ठराव पास होऊ नये.

* मुस्लिमांनी संस्कृती, भाषा, शिक्षण संस्था इत्यादींना संरक्षण प्राप्त होण्यासाठी घटनेत आवश्यक त्या तरतुदी असाव्यात.

* प्रत्येक प्रांताच्या मंत्रीमंडळामध्ये १३ मुस्लिम सदस्य असले पाहिजेत.

* केंद्रीय कायदे मंडळात बदल करायचा असेल तर त्यासाठी प्रांतीय कायदे मंडळाची समंती असावी.

 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 24 वर्षांनंतर क्रिकेटचा समावेश

​​​

👉 इंग्लंडमध्ये 2022 साली होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत महिलांच्या ट्वेन्टी ट्वेन्टी क्रिकेटच्या समावेशावर शिक्कामोर्तब झालं आहे.

👉 राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून नुकतीच याची घोषणा करण्यात आली. आयसीसीनंही याबाबत ट्वीट करुन याची माहिती दिली.

👉 त्यामुळे 24 वर्षांनी राष्ट्रकुलमध्ये पुन्हा एकदा क्रिकेटचा समावेश होणार आहे.

🍁 क्रिकेटच सर्व समाने बर्मिंहॅम येथील एजबेस्टन स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहेत.

👉 यामध्ये एकूण आठ महिला संघ सहभागी होणार आहेत. याआधी 1998 च्या क्वालालंपूर राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश करण्यात आला होता. त्यावेळी दक्षिण आफ्रिकेने सुवर्ण पदक जिंकलं होतं.

👉 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचे अध्यक्ष लुईस मार्टिन यांनी याबाबत आनंद व्यक्त केला. आज राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत क्रिकेटचा समावेश केल्याचं आम्ही स्वागत करतो. स्पर्धेत महिला टी-20 क्रिकेटसाठी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा चांगला मंच असल्याच लुईस मार्टिन यांनी म्हटलं.

👉 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 27 जुलै ते 7 ऑगस्ट 2022 पर्यंत इंग्लंडच्या बर्मिंगहॅममध्ये पार पडणार आहे.

🍁 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत 18 खेळांमधील जवळपास 45 हजार खेळाडू सहभागी होणार आहेत.

कोमालिका बारीला जगज्जेतेपद

🏹कोमालिका बारी हिने आपल्यापेक्षा वरचढ असलेल्या जपानच्या सोनोडा वाका हिला एकतर्फी झालेल्या अंतिम फेरीत पराभूत करत रिकव्‍‌र्ह कॅडेट गटात
जगज्जेतेपदाला गवसणी घातली.

🏹भारताने जागतिक युवा तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेच्या अखेरच्या दिवशी दुसऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली.

🏹जमशेदपूर येथे जन्मलेल्या आणि टाटा तिरंदाजी अकादमीत प्रशिक्षण घेणाऱ्या कोमालिकाने सुरुवातीलाच ४-० अशी आघाडी घेतली होती.

🏹त्यानंतर ७-३ अशा फरकाने तिने अंतिम फेरीवर वर्चस्व गाजवले.

🏹 रिकव्‍‌र्ह कॅडेट (१८ वर्षांखालील) गटात १७ वर्षीय कोमालिका ही भारताची दुसरी जगज्जेती ठरली आहे.

🏹यापूर्वी दीपिका कुमारीने २००९ मध्ये जगज्जेतेपद पटकावले होते.

🏹भारतीय तिरंदाजी संघटनेवर जागतिक तिरंदाजी महासंघाने बंदी घातल्यामुळे यापुढे भारतीय तिरंदाजांना कोणत्याही आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करता येणार नाही.

🏹मात्र या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण आणि एका कांस्यपदकाची कमाई केली.

फ्रान्समध्ये जी-7 शिखर परिषद 2019 आयोजित

फ्रान्स देशाच्या बिआरिट्झ या शहरात 24 ऑगस्ट ते 26 ऑगस्ट 2019 या काळात 45 वी जी-7 शिखर परिषद आयोजित केली जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या सुरू असलेल्या या शिखर परिषदेत उपस्थित राहणार आहेत. तेथे ते पर्यावरण, हवामान आणि डिजिटल परिवर्तन यासारख्या जागतिक विषयांवर चर्चा करतील आणि जागतिक नेत्यांची भेट घेतील.

💁‍♂जी-7 (ग्रुप ऑफ सेव्हन) बद्दल

1975 साली प्रथम फ्रान्स, जर्मनी, जपान, ब्रिटन, इटली आणि अमेरिका या सहा देशांनी जी-6 समूहाची स्थापना केली. पुढे 1976 साली कॅनडा यात सामील झाले आणि समूहाचे नाव ‘जी-7’ समूह हे पडले.

सन 1997 ते सन 2014 या काळात, या गटात रशियाचा समावेश होता आणि त्यामुळे हा ‘ग्रुप ऑफ एट’ म्हणून ओळखला जात होता. म्हणूनच 2014 साली याची पुनर्रचना झाली असून ते स्थापना वर्ष आहे.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार, या समूहाच्या सदस्यत्वासाठी उच्च निव्वळ राष्ट्रीय संपत्ती आणि उच्च मानव विकास निर्देशांक असणे आवश्यक आहे. या गटातल्या प्रगत अर्थव्यवस्थांची एकत्रित संपत्ती निव्वळ जागतिक संपत्तीच्या 58% आहे.

स्पेनमध्ये जागतिक तिरंदाजी युवा स्पर्धेत भारताने दोन सुवर्णपदके जिंकली

स्पेन देशाच्या माद्रिद शहरात खेळविण्यात आलेल्या जागतिक तिरंदाजी युवा अजिंक्यपद 2019 या स्पर्धेमध्ये ज्युनियर (अंडर-21) मिश्र संघ गटातल्या मार्कू रागिनी आणि सुखबीर सिंग यांच्या जोडीने भारतासाठी पहिले सुवर्णपदक जिंकले.

तसेच भारताची कोमलिका बारी ही स्पर्धेतली रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती बनली. तिने अंतिम फेरीत जापानच्या सोनोदा वाका हिला पराभूत करून भारतासाठी दुसरे सुवर्णपदक जिंकले. 2009 साली विश्वविजेती बनणार्‍या दिपीका कुमारी नंतर हे जेतेपद जिंकणारी 17 वर्षाची कोमलिका भारताची दुसरी रिकर्व्ह कॅडेट विश्वविजेती (18 वर्षाखालील) आहे.

या स्पर्धेत भारताने दोन सुवर्ण व एक कांस्यपदक असे एकूण तीन पदके मिळवून त्याच्या मोहिमेची सांगता केली. कंपाऊंड ज्युनियर पुरुष संघात भारताने कांस्यपदक जिंकले.

✍जागतिक तिरंदाजी बद्दल

जागतिक तिरंदाजी महासंघ ही तिरंदाजी या खेळाची आंतरराष्ट्रीय प्रशासकीय संस्था आहे. 156 राष्ट्रीय महासंघ आणि इतर तिरंदाजी संघटना याचे सदस्य  बनलेले आहे आणि आंतरराष्ट्रीय ऑलम्पिक समितीने त्याला मान्यता दिली आहे. त्याची स्थापना 04 सप्टेंबर 1931 रोजी झाली. स्वित्झर्लंडच्या लुसाने या शहरात त्याचे मुख्यालय आहे.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...