२१ ऑगस्ट २०१९

दिनांक 21 ऑगस्ट 2019 प्रश्न आणि उत्तरे

📌ऑस्ट्रेलियाच्या कोणत्या माजी गोलंदाजांना मेरीलेबोन क्रिकेट क्लब (MCC) याचे मानद आजीवन सभासदत्व बहाल केले गेले?

(A) शेन वॉर्न
(B) नॅथन लियोन
(C) मिशेल जॉन्सन✅✅✅
(D) मिशेल स्टार्क

📌19 ऑगस्टला निधन झालेल्या ज्येष्ठ संगीतकाराचे नाव काय होते?

(A) मोहम्मद जहूर 'खय्याम' हाशमी✅✅✅
(B) नौशाद
(C) रवी शंकर
(D) मदन मोहन

📌कोणत्या खेळाडूने 2019 सालाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जिंकला आहे?

(A) बजरंग पुनिया✅✅✅
(B) शिखर धवन
(C) सुनील छेत्री
(D) मिताली राज

📌ग्रीनपीस या संस्थेच्या मते, कोणता देश जगात सर्वाधिक मानवनिर्मित सल्फर डायऑक्साइड (SO2) उत्सर्जित करणारा देश आहे?

(A) जर्मनी
(B) संयुक्त राज्ये अमेरिका
(C) स्वित्झर्लंड
(D) भारत✅✅✅

📌19 ऑगस्टला निधन झालेल्या बिहारच्या माजी मुख्यमंत्रीचे नाव काय होते?

(A) अचल त्यागी
(B) जगन्नाथ मिश्रा✅✅✅
(C) ए. के. मिश्रा
(D) देवेश्वर दत्त

📌2019 साऊथ एशियन स्पेलिंग बी कोंटेस्ट नावाची स्पर्धा जिंकणार्‍या भारतीय वंशाच्या अमेरीकावासीचे नाव ओळखा.

(A) नवनीत मुरली✅✅✅
(B) दिपक गुप्ता
(C) सुधीर वर्मा
(D) नलिन गुप्ता

📌एसो अल्बेन कोणत्या क्रिडाप्रकारासाठी ओळखला जातो?

(A) कुस्ती
(B) हॉकी
(C) सायकलिंग✅✅✅
(D) टेबल टेनिस

इमाव, साशैमाप्र, विजाभज, विमाप्र विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस मान्यता

🔳राज्यात नव्याने निर्माण करण्यात आलेल्या इतर मागास वर्ग, सामाजिक-शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

🔳 इमाव, साशैमाप्र, विजाभज, विमाप्र विभागाकडे पूर्वीच्या 16 योजनांसह मराठा आरक्षण, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग कल्याण, राज्‍य मागास आयोग, छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यासह इतर संबधित विषय तसेच धनगर समाजासाठीच्या 22 योजना नुकत्याच वर्ग करण्यात आल्या आहेत.

🔳 तसेच विभागांतर्गत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) स्थापन करण्यात आली आहे. विभागाकडील कामाच्या वाढत्या प्रमाणामुळे नवीन पद निर्मितीस मान्यता देण्यात आली आहे. नवीन पदनिर्मितीमुळे विभागाच्या विविध योजनांची अंमलबजावणी अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे.

सर सिडने यांचा रौलट कायदा [१९१९]


* यालाच काळा कायदा किंवा Black Act असे म्हणतात

* राजद्रोही व्यक्तीवरील खटले हायकोर्टातील तीन न्यायाधीशांच्या विशेष न्यायालयात चालविण्याची तरतूद केली.

* या न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर कोणत्याही कोर्टात अपील करता येत नाही.

* कोणत्याही व्यक्तीला केवळ संशयावरून देखिल अटक करून त्याच्यावरती राजद्रोहाचा आरोप लावला गेला होता.

* ब्रिटीश पोलिस कोणत्याही व्यक्तीला वारंटशिवाय देखील अटक करू शकत होते.

* कोणत्याही व्यक्तीची किंवा त्याच्या घराची ब्रिटीश पोलिस केव्हाही झडती घेत होते.

* थोडक्यात रौलट नावाच्या अधिकाराच्या अहवालानुसार ब्रिटीश शासनाने तयार केलेले कायदे हे व्यक्तीस्वातंत्र्याची पायमल्ली करणारे कायदे होते.

 

भारताकडून सर्वाधिक 'एसओ२' उत्सर्जन

👉कोळसा जाळून सल्फर डायऑक्साइडचे (एसओ२) उत्सर्जन करणारा भारत हा जगातील सर्वांत मोठा देश असल्याचा दावा 'ग्रीनपीस' या स्वयंसेवी संस्थेने 'नासा'च्या पाहणीचा हवाला देऊन केला आहे.

👉'नासा'ने ही पाहणी केली असून, त्यासाठी ओझोन मॉनिटरिंग इन्स्ट्रुमेंट (ओएमआय)चा वापर करण्यात आला.

👉त्यात 'एसओ२'चे सर्वाधिक उत्सर्जन करणारी जगातील प्रमुख ठिकाणांची पाहणी करण्यात आली.

👉 त्यापैकी भारत हा सर्वाधिक १५ टक्के 'एसओ२'चे उत्सर्जन करत असल्याचे म्हटले असल्याचे 'ग्रीनपीस'ने म्हटले आहे.

👉भारतात मध्य प्रदेशातील सिंगरौली, तमिळनाडूतील नेवेली आणि चेन्नई, ओडिशातील तल्चेर आणि झारसुगुडा, छत्तीसगडमधील कोरबा, गुजरातेतील कच्छ, तेलंगणातील रामागुंडम आणि महाराष्ट्रातील चंद्रपूर आणि कोराडी येथे सर्वाधिक उत्सर्जन होत असल्याचे या पाहणीत आढळले.

👉हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी भारतातील बहुतेक प्रकल्पांमध्ये तंत्रज्ञानाचा अभाव असल्याचेही या पाहणीच्या विश्लेषणात आढळले.

👉जगातील सर्वाधिक 'एसओ२'चे उत्सर्जन रशियातील नोरिल्सक स्मेल्टर कॉम्प्लेक्स येथे होते.

👉त्या पाठोपाठ दक्षिण आफ्रिकेतील क्रील आणि इराणमधील झाग्रोझ या ठिकाणांचा समावेश आहे.

👉मात्र 'एसओ२'चे उत्सर्जन करणारी अधिक ठिकाणे भारतात असल्याने भारत जगात पहिल्या क्रमांकावर आहे.

ISRO चे बंगळुरूमध्ये एसएसएएम (SSAM) केंद्र.


● भारतीय अवकाश संशोधन संघटनेने (इस्रो) नुकतीच कर्नाटकच्या बेंगळुरूमध्ये पिन्या(Peenya) येथे एसएसएएम SSAM (Space Situational Awareness Control Centre) (अंतराळ परिस्थिती जागरूकता नियंत्रण केंद्र) पायाभरणी केली.

◆ उद्देश : अंतराळात पसरलेल्या कचऱ्यापासून भारतीय उपग्रहांचे संरक्षण करणे आहे.

SSAM (Space Situational Awareness Control Centre)

● हे केंद्र भारतीय उपग्रहांना निष्क्रीय उपग्रहांपासून संरक्षण देण्यासाठी खूप प्रभावी ठरेल,तसेच यातून हवामानाविषयी माहिती सुद्धा दिली जाईल.

● हे केंद्र निष्क्रिय उपग्रहांविषयी डेटा संकलित करेल. यामुळे अवकाशात पसरलेला कचरा काढून टाकण्यास मदत मिळेल.

● सध्या इस्रोकडे जवळपास 50 उपग्रह कार्यरत आहेत, हे उपग्रह संप्रेषण, नेव्हिगेशन आणि निगराणीसाठी वापरले जातात.

● याआधी इस्रो, अवकाशात पसरलेल्या कचऱ्याशी संबंधित माहिती व देखरेखीसाठी उत्तर अमेरिका एरोस्पेस डिफेन्स कमांड (NORAD) वर अवलंबून होते.

भारतीय अंतराळ संशोधन संस्था

● 1962 ला (Indian National Committee for Space Research (INCOSPAR))भारतीय राष्ट्रीय अंतराळ संशोधन समितीची स्थापना अणूऊर्जा विभागातंर्गत केली.

● 1969 मध्ये INCOSPAR चे रूपांतर ISRO मध्ये केले गेले.

● 1972 मध्ये भारत सरकारने 'अंतराळ आयोग' आणि 'अंतराळ विभाग' तयार केला व इस्रो हे अंतरिक्ष विभागाच्या(DOS) नियंत्रणाखाली आले.

● इस्रोची व्यावसायिक शाखा: अँट्रिक्स.

● भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचा (इस्रो) व्यावसायिक विभाग असलेल्या 'अँट्रिक्स कॉर्पोरेशन'ने मागील तीन वर्षांत 239 उपग्रह प्रक्षेपित केले आणि यातून सुमारे 6289 कोटी रुपयांचा महसूल मिळाला.

● सरकारने ६ मार्चला अंतराळ विभागाच्या (डीओएस) प्रशासकीय नियंत्रणाखाली न्यूस्पेस इंडिया लिमिटेड (NSIL) या कंपनीची स्थापना केली आहे.याद्वारे 'इस्रो'ची केंद्र आणि अंतराळ विभागाच्या शाखांतील संशोधन आणि विकासाला व्यावसायिकदृष्ट्या चालना देण्यात येणार आहे.

● इसरो चेअरमन: के सिवन.(15 जानेवारी 2018 पासून)

स्रोत: THE HINDU, ISRO OFFICIAL WEBSITE, महाराष्ट्र टाइम्स.

राष्ट्रीय क्रीडा पुरस्कारांची घोषणा – मर्झबान पटेल यांना द्रोणाचार्य तर नितीन किर्तने यांना ध्यानचंद पुरस्कार


महाराष्ट्रातील मर्झबान पटेल यांना हॉकीतील योगदानासाठी द्रोणाचार्य जीवनगौरव तर नितीन किर्तने यांना टेनिस मधील योगदानासाठी ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्या वतीने आज राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार २०१९ ची घोषणा करण्यात आली.

यंदाचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा ॲथलेटिक खेळाडू दीपा मलिक या दोघांना जाहीर झाला आहे. तर द्रोणाचार्य पुरस्कारासाठी तीन प्रशिक्षकांची निवड करण्यात आली आहे.

अर्जुन पुरस्कारासाठी १९ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. तर तीन ज्येष्ठ खेळाडूंना ध्यानचंद पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे. दोन संस्थांना राष्ट्रीय खेल प्रोत्साहन पुरस्कार जाहीर झाले आहेत .

तर चंदीगडच्या पंजाब विद्यापीठाला ‘मौलाना अबूल कलाम आझाद चषक’ जाहीर झाला आहे.

गेल्या चार दशकांपासून गरीब मुलांना हॉकीचे नि:शुल्क प्रशिक्षण देताहेत मर्झबान पटेल

हॉकी प्रशिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर मुर्झबान पटेल हे गेल्या चार दशकांपासून मुंबईत गोरगरीब मुलांना हॉकीचे मोफत प्रशिक्षण देत आहेत. युवराज वाल्मीकी, ॲड्रीन डिसुजा, देवेंद्र वल्मिकी , गॅवीन फरेरा आदी ऑलिम्पिक हॉकी खेळाडू मर्झबान पटेल यांच्या तालमीत घडले आहेत. मर्झबान पटेल यांनी हॉकी प्रशिक्षक म्हणून दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाची दखल घेऊन त्यांना द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे .

नितीन किर्तने यांच्या टेनिस खेळातील योगदानाची दखल

मुंबईतील नितीन किर्तने यांनी वयाच्या 5 व्या वर्षापासूनच टेनिस खेळायला सुरुवात केली. त्यांनी देश-विदेशातील मानाच्या स्पर्धांमध्ये सहभाग घेत देशाचे प्रतिनिधीत्व केले. डावखुरे खेळाडू असणारे किर्तने यांनी एकेरी आणि दुहेरी टेनिस स्पर्धेत सहभाग घेवून उत्तम रँकींग मिळविली आहे. टेनिसमधील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ध्यानचंद पुरस्कार जाहीर झाला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये पदक मिळवणाऱ्या खेळाडूंना प्रशिक्षण देणाऱ्या विविध क्रीडा क्षेत्रातल्या प्रशिक्षकांची द्रोणाचार्य पुरस्कारासाठी निवड केली जाते.

क्रीडा क्षेत्रात मोठं योगदान देणाऱ्यांना ध्यानचंद पुरस्काराने गौरविण्यात येते

ईडी म्हणजे नेमके काय ?

◼️ ईडी म्हणजे Enforcement Directorate च संक्षिप्त रूप ज्याला मराठी मध्ये अंमलबजावणी संचालनालय म्हटलं जातं.

◼️ कायद्याचं उत्तम जाण असणारे निडर कार्यक्षम सनदी अधिकारी ईडी मध्ये नियुक्त केले जातात.

◼️भारतामध्ये आर्थिक कायद्यांची अंमलबजावणी करणारी तसेच आर्थिक गुन्ह्यांचा मुकाबला करणारी यंत्रणा आहे. ही अर्थ मंत्रालयातील राजस्व विभागाचा एक भाग आहे. यात भारतीय महसूल सेवेतील अधिकारी काम करतात.

◼️परकीय विनिमय व्यवस्थापन कायद्यातील तरतुदींचा तपास करण्यासाठी भारत सरकारने १ जून २००० रोजी याची स्थापना केली.

◼️पण त्यापूर्वी अंमलबजावणी संचालनालयाची स्थापना १ मे १९५६ रोजी करण्यात आली. भारतात आर्थिक गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी या संस्थेची स्थापना करण्यात आली.

◼️ ही देशात आर्थिक कायद्याचं व्यवस्थापन करणारी संस्था आहे. अंमलबजावणी संचालनालय ही संस्था अर्थ मंत्रालयाच्या महसूल विभागाअंतर्गत येते.

◼️भारत सरकारच्या १९४७ च्या कायद्याअंतर्गत ईडीची स्थापना करण्यात आली होती. १९५६ ला स्थापनेच्या वेळी ईडीला ईयू (एनफोर्समेंट यूनिट) म्हणून ओळखलं जायचं. पण १९५७ ला त्याचं नाव बदलून ईडी (एनफोर्समेंट डायरेक्टरेट) असं करण्यात आलं.

◼️ही एक इकोनॉमिक्स इंटेलिजन्स एजन्सी आहे. देशातील हवाला, मनी लाँड्रिंग, भ्रष्टाचार यांसारख्या गोष्टींवर ईडी नजर ठेवते. तिचा मुख्य उद्देश भारत सरकारच्या दोन प्रमुख कायद्यांची अंमलबजावणी करणे आहे. हे दोन कायदे आहेत "परकीय विनिमय व्यवस्थापन अधिनियम १९९९" व "अवैध मुद्रा रूपांतरण प्रतिबंध, २००२".

◼️सर्वप्रथम फेरा (Foreign Exchange Regulation Act) १९४७ च्या कायद्यानुसार ईडीची स्थापना झाली. त्यानंतर या कायद्यात बदल करून फेरा १९७३ आला. आर्थिक उदारीकरणाच्या प्रक्रियेमुळे फेरा १९७३ च्या नियामक कायद्यात थोडाफार बदल करण्यात आला. त्याच्या जागी १ जून २००० ला फेमा (FEMA) १९९९ हा कायदा लागू करण्यात आला.

◼️विदेशी संपत्ती नियमन कायदा (पीएमएलए २००२) (Prevention of Money Laundering Act 2002) हा नवा कायदा लागू करून अंमलबजावणी संचालनालयाकडे जबाबदारी देण्यात आली.

🔳ईडी चे कार्यालय व केंद्र🔳

◼️नवी दिल्ली इथं अंमलबजावणी संचालनालयाचं मुख्यालय आहे. इथं संचालक कार्यरत असतात. त्या शिवाय मुंबई, चेन्नई, चंदीगढ आणि कोलकाता आणि दिल्ली याठिकाणी विभागीय कार्यालय आहेत. इथं विशेष संचालक काम पाहतात. यांच्या खाली अहमदाबाद, बंगळुरू, चंदीगढ, चेन्नई, कोच्ची, दिल्ली, पणजी, गुवाहाटी, हैदराबाद, जयपूर, जालंधर, कोलकाता, लखनऊ, मुंबई, पटना आणि श्रीनगर या शहरांत क्षेत्रीय कार्यालय आहेत. याठिकाणी संयुक्त संचालक काम पाहतात.

◼️उपक्षेत्रीय कार्यालय भुवनेश्वर, कोझिकोडे, इंदूर, मदुरै, नागपूर, इलाहाबाद, रायपूर, देहरादून, रांची, सुरत, शिमला, विशाखापट्टणम आणि जम्मू इथं उपक्षेत्रीय कार्यालय आहेत. इथं उप संचालक कार्यरत असतात. सध्या संजयकुमार मिश्रा अंमलबजावणी संचालक म्हणून काम पाहत आहेत.

🔘 ईडीचे कार्य 🔘

◼️१९९९ च्या फेमा उल्लंघनाशी संबंधित माहिती संकलित करणे, विकसित करणे आणि प्रचार करणे. केंद्रीय व राज्य गुप्तहेर संस्था, तक्रारी इ. सारख्या विविध स्त्रोतांकडून गुप्त पध्दतीने कोणती गुंतवणूक केली गेली आहे का ते तपासणे.

◼️फेमाच्या संशयास्पद उल्लंघनाच्या तरतुदींचे परीक्षण करणे, जसे की "हवाला" परकीय चलन रॅकेटिंग, निर्यात प्रक्रिया पूर्ण न करणे, परकीय चलन परत न करणे किंवा अंतर्गत इतर प्रकारच्या उल्लंघनांचे प्रकार तपासणे.


पंतप्रधान नरेंद्र मोदी इस्रोत जाणार

✍7 सप्टेंबरला चांद्रयान-2 चंद्राच्या दक्षिण भागात उतरणार आहे. हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 7 सप्टेंबरला 'इस्रो'मध्ये जाणार आहेत.

✍चांद्रयान 2 ला तीन भागात विभागण्यात आलं आहे. पहिला भाग ऑर्बिटर आहे, जो चंद्राच्या कक्षेत राहिल.

✍दुसरा भाग लॅण्डर ज्याचं नाव आहे विक्रम, ते चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल. तर तिसरा भाग आहे प्रग्यान जो रोव्हर असून तो चंद्राच्या पृष्ठभागावर फिरत राहिल.

Types of oils: (तेलांचे प्रकार)

1. Sunflower Oil (सूर्यफूल तेल)

2. Coconut Oil (खोबरेल तेल)

3. Groundnut Oil (शेंगदाणा तेल)

4. Mustard Oil (मोहरीचे तेल)

5. Canola Oil (कॅनोला तेल)

6. Olive Oil (ऑलिव्ह तेल)

7. Extra Virgin Olive Oil (अतिरिक्त शुद्ध ऑलिव्ह तेल)

8. Rice Bran Oil (राईस ब्रान ऑइल)

9. Sesame Oil (तिळाचे तेल)

10. Grapeseed Oil (द्राक्ष बियाणे तेल)

11. Palm Oil (पाम तेल)

12. Avocado Oil (एव्होकॅडो तेल)

13. Cottonseed Oil (सरकीचे तेल)

14. Hemp Oil (ताग,अंबाडी इ.चे तेल)

15. Walnut Oil (अक्रोडाचे तेल)

17 वी लोकसभा निवडणूक 2019

- 543 मतदार संघात 7 टप्प्यात ही निवडणूक पार पडली.
- 24 मे 2019 रोजी निकाल जाहिर झाला.

● देशातील प्रमुख पक्ष आणि त्यांना मिळालेल्या जागा

- तृणमूल काँग्रेस 22
- बहुजन समाज पक्ष 10
- भारतीय जनता पक्ष 303
- बिजू जनता दल 12
- द्रविड मुन्नेत्र कळघम 23
- काँग्रेस पक्ष 52
- जनता दल (U) 16
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 05
- शिवसेना 18
- युवाजन श्रमिक रयथु काँग्रेस पक्ष 22

● महाराष्ट्र

- महाराष्ट्रात 48 जागांसाठी 4 टप्प्यात मतदान झाले.
[पक्षाचे नाव- जिंकलेल्या जागा- मतांची टक्केवारी]
- भारतीय जनता पक्ष 23 (27.59%)
- काँग्रेस पक्ष 1 (16.27%)
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष 4 (15.52%)
- शिवसेना 18 (23.29%)
- AIMIM 1 (0.72%)
- Independent 1

अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राज्यात अमृत संस्थेची स्थापना

◼️खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत (AMRUT- Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) ही संस्था स्थापन करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.

◼️राज्यातील बार्टी, सारथी आणि महाज्योतीच्या धर्तीवर या स्वायत्त संस्थेची निर्मिती होणार असून त्यात या समाज समुहातील तरुणांच्या विकासासाठी विशेष कार्य केले जाणार आहे.

◼️मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने विविध घटकांच्या विकासासाठी यापूर्वी सारथी आणि महाज्योती संस्थेची स्थापना केली आहे. केंद्र सरकारने खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना 10 टक्के आरक्षण लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या कल्याणासाठी निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करणे आवश्यक होते. या समाजघटकातील विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश आणि शासकीय नोकऱ्यांमध्ये आरक्षण प्राप्त होत आहे. मात्र, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षणही मिळणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर बार्टी, सारथी आणि महाज्योती संस्थांच्या धर्तीवर अमृत संस्था स्थापन करण्याचा आज निर्णय घेण्यात आला आहे.

◼️अनुसूचित जातीतील तरुणांसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने बार्टी तर सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील मराठा समाजासाठी छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने सारथी ही संस्था स्थापन करण्यात आली आहे.

◼️त्याप्रमाणेच बहुजन, दुर्लक्षित आणि वंचित घटकांसाठी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या नावाने ‘महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था (महाज्योती) ही स्वायत्त संस्था स्थापन करण्यात आली आहे.

◼️आता खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांमधील तरुणांच्या सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्था काम करणार आहे. संस्थेची स्थापना व कार्यान्वयानासाठी वेळोवेळी आवश्यकतेनुसार निर्णय घेण्याचे अधिकार या विभागाच्या मंत्र्यांना देण्यात आले आहेत.

◼️या संस्थेच्या माध्यमातून अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील तरुणांना उद्योग, व्यवसाय, नोकरी, रोजगार, उच्च शिक्षण, परदेशात उच्च शिक्षण, व्यक्तिमत्त्व विकासासह सर्वांगीण विकासासाठी अमृत संस्था प्राधान्याने काम करणार आहे. तसेच कौशल्य विकास, स्पर्धा परीक्षा आणि एमफील-पीएचडी अभ्यासक्रमांसाठीही प्रशिक्षण देण्याचा उपक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे महिलांचे सक्षमीकरण करण्यासह संबंधितांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

मगरीविषयी बरेच काही ‼️



▪️नुकत्याच आलेल्या पुरात पाण्यातील अनेक मगरी रस्त्यावर आल्याचे पाहायला मिळाले. मगर या प्राण्याविषयी आपल्याला फारशी माहिती नसते. पण हा प्राणी नक्कीच काही जाणून घेण्याच्या योग्यतेचा आहे. मगरीचा कराल जबडा पाहतापाहता मोठे प्राणी किती शिताफीने गिळतो हे आपण कदाचित पहिले असेल.

💁‍♂ मगरीला २४ दात असतात पण तरीही ती भक्ष्य गिळणे अधिक पसंत करते.

▪️मगर हा कुठल्याची पाण्यात किंवा जमिनीवर राहू शकणारा प्राणी आहे आणि विशेष म्हणजे ही प्रजाती पृथ्वीवर डायनासोर होते तेव्हापासून म्हणजे २४० दशलक्ष वर्षापासून अस्तित्वात असावी असे संशोधकांचे म्हणणे आहे.

💁‍♂मगरीचे नक्राश्रू अशी मराठीत एक म्हण आहे. याचा अर्थ खोटे रडणे असा आहे.

▪️मगर भक्ष्य गिळते तेव्हा तिच्या डोळ्यातून अश्रू येतात त्यावरून ही म्हण आली असावी. पण त्यामागचे कारण असे की भक्ष्य गिळताना ती खूप मोठ्या प्रमाणावर हवा गिळते. या हवेच्या दाबामुळे अश्रू निर्माण करणारे लचरीमल ग्रंथी कार्यान्वित होतात आणि मगरीच्या डोळ्यात अश्रू येतात.


▪️जगभरात मगरीच्या अनेक प्रजाती आहेत. सर्वात लहान मगर ५ फुट लांब आणि ३२ किलो वजनाची आहे तर सर्वात मोठी ७ फुट लांब आणि १२०० किलो वजनाची आहे.

▪️अन्न भक्षण केल्यावर ते पचविण्यासाठी मगर छोटे दगड खाते. ती फळे, भाज्या खात नाही. लांब शेपटीमुळे ती पाण्यात ताशी २५ किमी वेगाने पोहू शकते.

▪️ स्तनधारी आणि सरपटणारे अश्या दोन्ही प्राण्याचे गुण मगरीत आढळतात. जमिनीवर असताना तिचे हृदय सस्तन प्राण्यासारखे काम करते तर पाण्यात असताना सरपटणारया प्राण्याप्रमाणे काम करते.

✅ मगरीची ९९ टक्के पिल्ले पहिल्या वर्षातच मोठे मासे फस्त करतात.

▪️मगर एकावेळी १० ते ६० अंडी घालते. ही अंडी घरट्यात किंवा बिळात घातली जातात आणि तेथले तापमान किती असेल त्यावर पिलाचे लिंग ठरते.

▪️आज जगभर मगरी संकटात आहेत कारण त्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते आहे. मगरीच्या कातड्यापासून बनविलेल्या वस्तू श्रीमंत लोकांसाठी स्टेट्स सिम्बॉल बनल्या असल्याने मगरी मोठ्या प्रमाणावर मारल्या जात आहेत.



आता भारतीय पोस्ट सुरू करणार ‘ही’ नवी सेवा

✍देशात ऑनलाइन खरेदीला मिळणारी पसंती पाहता आता भारतीय पोस्टानेही ई ट्रेडिंग ट्रेडिंग सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या कंपन्यांना आता भारतीय पोस्टही टक्कर देण्याच्या तयारीत आहे. सरकारच्या या इ कॉमर्स प्लॅटफॉर्मवर विक्रेत्यांची संख्या ही फ्लिपकार्टवर असलेल्या विक्रेत्यांपेक्षाही दुप्पट आहे. दरम्यान, पोस्टाने विक्रेत्यांना आपल्याशी जोडण्याच्या कामाला सुरूवातही केली आहे.

✍भारतीय पोस्ट अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टप्रमाणेच आपल्या ई कॉमर्स पोर्टलवरून एसी, फ्रिज, टिव्हीपासून मोठ्यात मोठे ते छोट्यात छोटे सामान विक्रीसाठी उपलब्ध करून देणार आहे. ई कॉमर्स कंपन्यांना टक्कर देण्यासाठी प्लॅटफॉर्म तयार करण्यासाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य ठेवले होते. 2016 मध्ये ई-मार्केटप्लेस (Government e-Marketplace) या नावाने ते लॉन्च करण्यात आले होते.

✍सध्या या पोर्टलसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पोर्टवरून खरेदी केलेली वस्तू देशाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात पोहोचवली जाणार असल्याची माहिती पोस्टातील एका अधिकाऱ्याने दिली. तसेच हे सामान पोस्टमॅनच संबंधित व्यक्तींपर्यंत पोहोचवणार आहेत. सध्या अंबालामध्ये पायलट प्रोजेक्ट म्हणून ही सेवा सुरू करण्यात आली आहे. त्यानंतर अन्य ठिकाणीही सेवा टप्प्याटप्प्याने सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

✍दरम्यान, सरकारने सुरू केलेली ही सेवा असल्याने यामध्ये फसवणुकीचे प्रकार होण्याची शक्यता नाकारण्यात येत आहे. तसेच सामान ग्राहकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही पोस्टाचीच असणार आहे. वस्तू विकत घेताना ऑनलाइन किंवा ऑफलाइन दोन्ही प्रकारे पैसे भरता येणार आहेत.

वन नेशन-वन रेशनकार्ड’ योजनेस प्रारंभ


✍नरेंद्र मोदी सरकार देशात आता ‘वन नेशन-वन रेशनकार्ड’ योजना लागू करणार आहे. या योजनेमुळे कुठलाही शिधापत्रकारक देशातील कुठल्याही सार्वजनिक वितरण व्यवस्था केंद्रातून धान्य खरेदी करू शकणार आहे. या योजनेची 1 ऑगस्टपासून महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगणा आणि गुजरात या 4 राज्यांमध्ये प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे. 1 जुलै 2020 पर्यंत देशभरात एक शिधापत्र लागू व्हावे, असे सरकारचे लक्ष्य आहे.

✍अन्य राज्यांमध्ये रोजगारासाठी गेलेल्या लोकांना या योजनेचा सर्वाधिक लाभ होणार असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. संबंधित योजना लागू करण्यासाठी ग्राहक विषयक केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी खाद्यसचिव तसेच राज्यांच्या प्रतिनिधींसोबत गुरुवारी बैठक घेतली आहे.

✍30 जून 2020 पर्यंत वन नेशन-वन रेशनकार्ड देशभरात लागू होणार आहे. 85 टक्के आधारकार्ड पॉइंट ऑफ सेल (पीओएस) यंत्राशी संलग्न झाले ओत. 22 राज्यांमध्ये 100 टक्के पीओएस यंत्रांचा वापर सुरू झाल्याचे पासवान यांनी सांगितले आहे.

🔴भ्रष्टाचाराला आळा बसणार:-

✍योजनेमुळे सर्वसामान्यांना मोठा लाभ होणार आहे. यांतर्गत सर्वसामान्य आता कुठल्याही पीडीएस केंद्रावर अवलंबून राहणार नाहीत. दुकान मालकांवरील अवलंबित्व घटणार असून भ्रष्टाचाराला आळा बसणार आहे.

✍रोजगाराच्या संधीसाठी अन्य राज्यांमध्ये राहत असलेल्या लोकांना याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याचे पासवान म्हणाले.

🔴आयएमपीडीएस:-

✍इंटीग्रेटेड मॅनेजमेंट ऑफ पीडीएस (आयएमपीडीएस) अंतर्गत अनेक राज्यांमध्ये अन्नधान्य तसेच सार्वजनिक वितरणांतर्गत लाभार्थी कुठल्याही जिल्ह्य़ातून धान्यखरेदी करू शकतो.

✍या राज्यांमध्ये आंध्रप्रदेश, गुजरात, हरियाणा, झारखंड, कर्नाटक, केरळ, महाराष्ट्र, राजस्थान, तेलंगणा आणि त्रिपुरा यांचा समावेश असल्याचे ग्राहक विषयक मंत्रालयाकडून सांगण्यात आले.

🔴सकारात्मक प्रतिसाद:-

✍वर्षाच्या आत देशभरात ही योजना लागू करण्याचे लक्ष्य बाळगण्यात आले आहे. योजनेला मूर्त रुप देण्याकरता पीडीएस केंद्रांवर पीओएस यंत्रांची गरज आहे.

✍सद्यकाळात आंध्रप्रदेश, हरियाणा समवेत अनेक राज्यांमध्ये 100 टक्के पीडीएस केंद्रांवर पीओएस यंत्रे उपलब्ध झाली आहेत. केंद्राच्या पुढाकाराला राज्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याने योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीची शक्यता वाढली आहे.

Latest post

ठळक बातम्या.१३ मार्च २०२५.

१. डॉ. अम्ब्रीश मिथल  -डॉ. अंबरीश मिथल यांना २०२५ च्या कमिटी ऑफ सायंटिफिक अॅडव्हायझर्स (CSA) मेडल ऑफ अचिव्हमेंटने सन्मानित करण्यात आले. २. म...