२० ऑगस्ट २०१९

महत्वाचे प्रश्न आणि उत्तरे

डिजिटल मतदार साक्षरतेला प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या राज्याने ‘आय-हेल्प’ हा उपक्रम सुरू केला आहे? – आसाम

चीनच्या मत्त्वाकांक्षी ‘बेल्ट अँड रोड्स’ उपक्रमात सहभागी होण्याची घोषणा कोणत्या देशाने केली आहे? – इटली

फोनपेच्या सदिच्छादूत पदी कोणाची नेमणूक करण्यात आली आहे? – अमीर खान

सर्व प्रमुख कृषी आवश्यकतांसाठी उपाय पुरवण्यासाठी कोणत्या बँकेने ‘बडोदा किसान’ हे कृषी डिजिटल व्यासपीठ विकसित केले आहे? – बँक ऑफ बडोदा

नीती आयोगाच्या अटल इनोवेशन मिशनने कोणत्या कंपनिसोबत सामंजस्य केले आहे? – अॅडोब

‘आंतरराष्ट्रीय डिजिटल आरोग्य परिसंवाद’ कोणत्या शहरात पार पडला? – नवी दिल्ली

कोणता जिल्हा हा 5G कव्हरेज असलेला जगातील पहिला जिल्हा ठरला आहे? – शांघाई (चीन)

पहिल्यांदाच मतदान करणार्‍या मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी कोणत्या जिल्हा प्रशासनाने ‘संकल्प’ हे मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले आहे? – बोंगाईगाव (आसाम)

कोणत्या भारतीय क्रीडा संघटनेने असोचेमचा ‘उत्कृष्ट क्रीडा संघटना’ पुरस्कार जिंकला आहे? – नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडिया

नीती आयोगाच्या अहवालानुसार महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये पहिले स्थान प्राप्त करणारा ‘हैलाकांडी’ जिल्हा कोणत्या राज्यातील आहे? – आसाम

इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू एलिस्टर कुकला ब्रिटनच्या रानीकडून  कोणता सन्मान देण्यात आला आहे? – नाइटहूड

नवकल्पना आणि उद्योजकता महोत्सव (FINE) कोणत्या शहरात पार पडला? – गांधीनगर

शासकीय रुग्णालयात ‘ट्रांसकॅथीटर ऑर्टिक वाल्व्ह इम्प्लांटेशन’ (TAVI) सुरू करणारे तमिळनाडू हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.

चालू घडामोडी प्रश्नउत्तरे

१) ' मृत्युंजय ' या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण ?

o   विश्वास पाटील
o   आनंद यादव
o   रणजीत देसाई
o   शिवाजी सावंत ✅

२) ' ययाती ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   यशवंत कानेटकर
o   वि. स. खांडेकर ✅
o   व्यंकटेश माडगुळकर
o   आण्णाभाऊ साठे

३) ' फकीरा ' ही गाजलेली कादंबरी कोणाची ?

o   आण्णाभाऊ साठे ✅
o   बा. भ. बोरकर
o   गौरी देशपांडे
o   व्यंकटेश माडगुळकर

४) राज्यशासनाचा पुरस्कार मिळालेली ' पांगिरा ' ह्या कादंबरीचे लेखक कोण ?

o   लक्ष्मीकांत तांबोळी
o   प्रा. व. भा. बोधे
o   विश्वास महिपाती पाटील ✅
o   वा. म. जोशी

५) शंकरराव रामराव यांनी खालीलपैकी कोणती कादंबरी लिहिली ?

o   गावचा टिनोपाल गुरुजी ✅
o   चंद्रमुखी
o   ग्रंथकाली
o   मंजुघोषा

६) ' गोलपिठा ' या कादंबरीचे लेखक हे ........आहेत .

o   नामदेव ढसाळ ✅
o   दया पवार
o   जोगेंद्र कवाडे
o   आरती प्रभू

७) व्यंकटेश माडगुळकरांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   झाडाझडती
o   संभाजी
o   बनगरवाडी ✅
o   सात सक त्रेचाळीस

८) ' कोसला ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   श्री. ना, पेंडसे
o   भालचंद्र नेमाडे ✅
o   रा. रं. बोराडे
o   ग.ल. ठोकळ

९) मराठीतील सगळ्यात पहिली कादंबरी कोणती ?

o   मुक्तामाला
o   बळीबा पाटील
o   यमुना पर्यटन ✅
o   मोचनगड

१०) गौरी देशपांडे यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   एकेक पान गळावया ✅
o   स्फोट
o   कल्याणी
o   झाड

११) ' युगंधरा ' या कादंबरीच्या लेखिका कोण आहेत ?

o   गौरी देशपांडे
o   शैला बेल्ले
o   जोत्स्ना देवधर
o   सुमती क्षेत्रमाडे ✅

१२) ' शेकोटी ' कादंबरीचे लेखक कोण ?

o   डॉ. यशवंत पाटणे ✅
o   आशा कर्दळे
o   ह.ना.आपटे
o   व.ह. पिटके

१३) आप्पासाहेब यशवंत खोत यांनी कोणती कादंबरी लिहिली ?

o   वामन परत आला
o   जगबुडी
o   एक होता फेंगाड्या
o   गावपांढर ✅

१४) ' स्वप्नपंख ' या कादंबरीचे लेखक कोण ?

o   राजेंद्र मलोसे ✅
o   भाऊ पाध्ये
o   दादासाहेब मोरे
o   जयंत नारळीकर

१५) वि. वा. शिरवाडकर यांची खालीलपैकी कोणती कादंबरी आहे ?

o   कल्पनेच्या तीरावर ✅
o   गारंबीचा बापू
o   पांढरे ढग
o   वस्ती वाढते आहे

फडणवीस मंत्रिमंडळातील महत्त्वाचे निर्णय

1.खुल्या प्रवर्गातील अर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी अमृत संस्था स्थापण्यास मान्यता.

2.गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेची व्याप्ती वाढविण्याचा निर्णय.

3.मुंबई शहरासाठी इंटिलिजन्स ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रकल्प राबविण्यासह त्यासाठी लागणाऱ्या खर्चास मान्यता.

4.मराठवाडा वॉटरग्रीड अंतर्गत हायब्रीड ॲन्युईटी तत्त्वावर बीड जिल्ह्यातील 4800 कोटींच्या कामासाठी निविदा मागविणार.

5.कामठी येथील ड्रॅगन पॅलेस टेम्पल व परिसराच्या विकास आराखड्यास मान्यता.

6.साताऱ्याच्या जिहे कठापूर येथील गुरुवर्य कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजनेस द्वितीय सुधारित प्रशासकीय मान्यता.

7.राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानांतर्गत उपजीविकेसाठी कौशल्य संपादन व ज्ञान जागरुकता अभियान (संकल्प) प्रकल्प राज्यात राबविण्यास मान्यता.

8.साखर कारखाना सहवीजनिर्मिती प्रकल्पासाठी मूळ स्थापित क्षमतेत वाढ केल्यास नवीन क्षमतेसह ऊस खरेदी करात सूट.

9.पत्रकार क्लब ऑफ नागपूर या संस्थेस मौजा गौडा येथील जागा तेथील वास्तूसह विशेष बाब म्हणून भाडेपट्ट्याने देण्यात येणार.

10.सिंचन प्रकल्पांचे व्यवस्थापन व पाणीपट्टीच्या रकमेसंदर्भातील शासन निर्णयात सुधारणा.

11.ॲनिमल केअर सेंटर फाऊंडेशन मुंबई, मेसर्स पीपल फॉर ॲनिमल नवी दिल्ली आणि सिडको यांच्यामधील त्रिपक्षीय करारनाम्यावरील मुद्रांक शुल्क माफ.

12.मुद्रांक शुल्क अभय योजनेच्या राजपत्रामध्ये सुधारणा करण्याबाबत.

13.महाराष्ट्र राज्य सहकार अपिल न्यायालय व सहकार न्यायालय यांच्याकडे सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्थेची 255 पदे वर्ग करण्याचा निर्णय.

14.इमाव, विजाभज, विमाप्र विभागासाठी उपसचिव पदाच्या निर्मितीस मान्यता.

15.अकोला येथील श्री. नथमल गोयनका विधि महाविद्यालय आणि यवतमाळ येथील अमोलकचंद विधि महाविद्यालयातील प्राचार्य व ग्रंथपाल पदांना अनुदान.

16.नागपूरच्या भिवापूर येथील हिरा बाळाजी मागासवर्गीय सहकारी सूतगिरणीची शासन अर्थसहाय्यासाठी निवड.

17.तत्कालीन जळगाव नगरपालिकेने हुडको या वित्तीय संस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीबाबत.

18.नागरी क्षेत्रातील खासगी जमिनीवरील अतिक्रमण धारकांना पट्टेवाटप करण्यासाठी कार्यप्रणाली मंजूर.

19.रायगड जिल्ह्यातील मौजे डोणवत (ता. खालापूर) येथील 0.64 हेक्टर जमीन औद्योगिक कारणासाठी मे. केमट्रॉन सायन्स-लॅबोरेटरीज यांना देण्याबाबत.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते भुटानमध्ये मांगदेछू जलविद्युत प्रकल्पाचे उद्घाटन

​​

        मांगदेछू जलविद्युत प्रकल्प

🗣पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भुटानमध्ये उभारण्यात आलेल्या 10 हजार मेगावॉट क्षमतेच्या मांगदेछू जलविद्युत निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आले.

🗣4500 कोटी रूपयांचा हा जलविद्युत प्रकल्प मध्य भुटानच्या ट्रोंगासा झोंगखाग जिल्ह्यात मांगदेछू नदीवर बांधण्यात आला आहे. प्रारंभी 720 मेगावॉटच्या क्षमतेसह प्रकल्प चालवला जाणार आहे. 2020 सालापर्यंत प्रकल्पाची पूर्ण क्षमता प्राप्त करण्याची योजना आहे.

🗣मांगदेछू जलविद्युत प्रकल्प हा भुटान-भारत मैत्री प्रकल्प म्हणून ओळखला जात आहे. हा भुटानमधल्या मोठ्या प्रकल्पांपैकी एक आहे. हा प्रकल्प उभारण्यासाठी भारत सरकारकडून तांत्रिक आणि वित्तपुरवठा करण्यात येत आहे. बांधकाम खर्चाच्या 70 टक्के कर्जस्वरुपात तर 30 टक्के अनुदान अश्या स्वरुपात भारताकडून वित्तपुरवठा केला जात आहे.

🗣भुटान हा हिमालयाच्या पूर्व भागात असलेला बौद्ध साम्राज्य असलेला देश आहे. थिंपू हे या देशाचे राजधानी शहर आहे. भारतीय रुपया, भुटानी नगुल्ट्रम ही चलने देशात वापरली जातात. झोंगखा ही देशाची अधिकृत भाषा आहे.

शब्दसमूहाबद्दल एक शब्द


▪️ज्याला कधीही मृत्यू नाही असा - अमर

▪️ज्याला कधीही वाट येत नाही असे - अवीट

▪️मोफत अन्न मीळण्याचे ठिकाण - अन्नछत्र

▪️ज्याला कोणतीही उपमा देता येत नाही असे - अनुपम, अनुपमेय

▪️कोणाचा आधार नाही असा - अनाथ

महाराष्ट्राचे सुपुत्र मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर सेनापदक

✍शहीद मेजर कौस्तुभ राणे यांना सेनापदक दिलं जाणार आहे.

✍उत्तर काश्मीरच्या गुरेज सेक्टरमध्ये दहशतवाद्यांशी सामना करताना मेजर कौस्तुभ राणे यांना वीरमरण आलं.

✍त्यांच्या शौर्याचा गौरव मरणोत्तर सेना पदक देऊन केला जाणार आहे. गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यातच ही घटना घडली होती.

✍कौस्तुभ राणे यांना मागच्याच वर्षी नियंत्रण रेषेजवळ केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते शौर्यपदक देण्यात आले होते.

✍तसेच त्यांना मेजर हा हुद्दा देऊन लष्करात बढतीही देण्यात आली होती. मात्र गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात दहशतवाद्यांशी दोन हात करताना ते शहीद झाले.

✍मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातल्या वैभववाडी येथील सडुरे गावचे राणे कुटुंब १९९० मध्ये मीरा रोडच्या शीतलनगर येथील हिरल सागर या इमारतीत रहायला आले.

✍कौस्तुभचे शालेय शिक्षण मीरा रोडच्या होली क्रॉस शाळेत झाले.

✍लहानपणापासूनच अतिशय हुशार असलेल्या कौस्तुभने शालेय जीवनातच सैन्यात जायचे नक्की केले होते.

✍लष्करी शिक्षण पुण्यात पूर्ण केल्यानंतर २०१० मध्ये त्यांनी कम्बाईन डिफेन्स सर्व्हिस परीक्षा उत्तीर्ण केली आणि चेन्नई येथे अधिकारी प्रशिक्षण पूर्ण केले.

✍ऑक्टोबर २०११ मध्ये लेफ्टनंट या पदावर ते लष्करी सेवेत रुजू झाले. २०१३ मध्ये त्यांना कॅप्टन पदावर बढती मिळाली आणि २०१८ मध्ये मेजर पदावर कार्यरत होते.

✍मात्र दहशतवाद्यांशी दोन हात करताना त्यांना वीरमरण आले.

✍कौस्तुभ यांचे वडील खासगी कंपनीत नोकरीला होते, सध्या ते निवृत्त झाले आहेत. त्यांची आई निवृत्त शिक्षिका आहेत.

✍काश्मीरमध्ये बदली होण्याआधी ते कोलकाता येथे आपल्या पत्नीसह रहात होते.

✍मात्र काश्मीरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी आपली पत्नी आणि मुलाला आई वडिलांकडे मीरारोडला रहायला पाठवले होते.

✍एप्रिल २०१८ मध्येच त्यांनी कुटुंबाची भेट घेतली होती. मात्र त्यानंतर बातमी आली ती त्यांच्या जाण्याचीच. त्यांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांनाच अश्रू अनावर झाले होते. 

✍त्यांच्या शौर्याचा गौरव सेना पदक देऊन केला जाणार आहे.

महत्त्वाचे खटले आणि वर्ष:

🔸 शंकरी प्रसाद खटला- 1951

🔸 मद्रास राज्य वि चंपकम दोराईराजन खटला- 1951

🔸 बेरुबारी खटला- 1960

🔸 गोलकनाथ वि पंजाब राज्य- 1967

🔸 केशवानंद भारती वि केरळ राज्य - 1973

🔸 मेनका खटला- 1978

🔸 मिनर्वा मिल्स खटला- 1980

🔸 इंद्र सहानी खटला- 1992

🔸 किहोतो होलोहोन खटला- 1993

🔸 एस आर बोम्मई खटला- 1994

🔸 एल चंद्रकुमार खटला- 1997

🔸 आय आर कोइल्हो खटला- 2007

भारतरत्न'चे सन्मानार्थी

1. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन - भारताचे माजी राष्ट्रपती आणि शिक्षणतज्ञ

2. सी राजगोपालचारी - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि शेवटचे गव्हर्नर जनरल

3. डॉ. सीव्ही रमण - भौतिकशास्त्रज्ञ

4.  डॉ. भगवान दास - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

5. डॉ. एम विश्वेश्वरय्या - पहिले अभियंते

6. पं. जवाहरलाल नेहरु - भारताचे पहिले पंतप्रधान

7. गोविंद वल्लभ पंत - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि उत्तर प्रदेशाचे पहिले मुख्यमंत्री

8. डॉ. धोंडो केशव कर्वे - समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक

9. डॉ. बिधान चंद्र रॉय - पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री आणि वैद्यक

10. पुरुषोत्तम दास टंडन - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शिक्षणप्रसारक

11. डॉ. राजेंद्र प्रसाद - भारताचे पहिले राष्ट्रपती

12. डॉ. झाकिर हुसेन - भारताचे माजी राष्ट्रपती

13. डॉ. पांडुरंग वामन काणे - शिक्षणप्रसारक

14. लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे दुसरे पंतप्रधान

15. इंदिरा गांधी - भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान

16. वराहगिरी वेंकट गिरी - भारताचे माजी राष्ट्रपती

17. के. कामराज (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीत भाग

18. मदर तेरेसा - ख्रिश्चन मिशनरी समाजसुधारक, मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक

19. आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि समाजसुधारक

20. खान अब्दुल गफार खान - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते

21. एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) - चित्रपट अभिनेते आणि तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री

22. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर (मरणोत्तर) - भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, अर्थतज्ञ, राजकीय नेते

23. नेल्सन मंडेला - वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते

24. डॉ. राजीव गांधी (मरणोत्तर) - भारताचे सातवे पंतप्रधान

25. सरदार वल्लभभाई पटेल (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले गृहमंत्री

26. मोरारजी देसाई - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे पाचवे पंतप्रधान

27. मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते व भारताचे पहिले शिक्षणमंत्री

28. जे. आर. डी. टाटा - उद्योजक

29. सत्यजित रे - बंगाली चित्रपट दिग्दर्शक

30. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम - भारताचे 11 वे राष्ट्रपती

31. गुलझारीलाल नंदा - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी पंतप्रधान

32. अरुणा आसफ अली‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या

33. एम.एस. सुब्बुलक्ष्मी - कर्नाटक शैलीतील गायिका

34. चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् -  भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि भारताचे माजी कृषीमंत्री

35. जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते

36. रवी शंकर - प्रसिद्ध सितारवादक

37. अमर्त्य सेन - प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

38. गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) - भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील नेते आणि आसामचे माजी मुख्यमंत्री

39. लता मंगेशकर - पार्श्वगायिका

40. बिसमिल्ला खान - शहनाईवादक

41. भीमसेन जोशी - हिंदुस्थानी शास्त्रीय गायक

42. सी.एन.आर.राव - शास्त्रज्ञ

43. सचिन तेंडुलकर - क्रिकेटपटू

44. मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) - स्वातंत्र्य चळवळीत महत्त्वाचे योगदान देणारे, बनारस हिंदू विश्वविद्यापीठ व हिंदू महासभेचे संस्थापक, प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ

45. अटलबिहारी वाजपेयी - माजी पंतप्रधान

46. प्रणव मुखर्जी - माजी राष्ट्रपती

47. नानाजी देशमुख - सामाजिक कार्यकर्ते

48. भूपेन हजारिका - प्रसिद्ध गायक

निष्ठा योजना

👉मानव संसाधन विकास मंत्रालयाकडून जगभरातील सर्वात मोठी ऐतिहासिक योजना सुरु करण्यात येणार आहे.

👉या योजनेचे नाव ‘निष्ठा योजना’ असणार आहे.

👉निष्ठा म्हणजेच National Initiative on School Teachers Head Holistic Advancement (NISHTHA).

👉या योजने अंतर्गत ४२ लाख शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

👉यात सर्व राज्यातील शिक्षकांचा समावेश करण्यात येणार आहे.

👉२२ ऑगस्टला योजनेची सुरुवात होणार आहे.

👉मानव संसाधन विकास मंत्री रमेश पोखरियाल .

आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड निघोज




▪️अहमदनगर ला निसर्गाने खूप भर भरून दिलंय ह्याचाच एक उदाहरण निगोज चे रांजणखळगे अहमदनगरहून पुण्याकडे जाताना शिरूरच्या अलिकडेच उजवीकडे एक फ़ाटा जातो. अंदाजे ६५ कि.मि. आत गेल्यावर निघोज गाव लागते.

▪️ आशिया खंडातील सर्वात मोठे कुंड म्हणून या ठिकाणाची ख्याती आहे. कित्येक शतकापासून या कुंडामध्ये सतत पाणी असते. कितीही दुष्काळ पडला तरी पाण्याची पातळी कमी होत नाही.

▪️अतिशय सुंदर अशा कोरीव कामाप्रमाणे खडक या ठिकाणी पहावयास मिळतो. वर्षाच्या तिनही ऋतुमध्ये या ठिकाणी निसर्गाचे वेगवेगळे सौदर्य पहावयास मिळते. या गावात "श्री मळगंगा माउली"चे सुंदर संगमरवरी मंदिर आहे. संपूर्ण देवळावर संगमरवरात अप्रतीम कोरीव काम आहे रांजणखळगे गावापासून तीन कि.मी अंतरावर कुकडी नदीच्या पात्रात आहे.

▪️खळखळणार पाणी अती सुदंर धबधबे थोडयाशा ठिकाणी खडकावर उगवणारी हिरवळ मनाला प्रफुल्लीत करते. उन्हाळयात कुंडातील पाण्याचा गारवा बहरलेल्या हिरव्यागार वृक्षांची उणिवच भासू देत नाही एक रम्य परिसर व आकर्षक पर्यटन स्थळांचे केद्र म्हणूनही या ठिकाणाला विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.

▪️इंग्रजीत पॉट होल्स या नावाने ओळखले जाणारे हे रांजणखळगे अतिशय सुदंर व मनोवेधक असल्याने क्षणार्धात लक्ष वेधून घेतात.

▪️तिथे पोचल्यावर दिसणारा अभूतपूर्व नजारा नजरेत/कॅमेऱ्यात किती आणि कसा साठवू असं होऊन जातं. आणि निसर्गाच्या करामतीचा क्षणोक्षणी प्रत्यय यायला लागतो.

▪️सपाट पसरलेल्या काळ्या कभिन्न कातळांवरून सावधपणे चालायला लागत होतं. कारण याच कातळात शिल्पं कोरावीत तसे निसर्गनिर्मित रांजण खळगे कोरले गेले होते.मी हा चमत्कार डोळ्यात आणि कॅमेऱ्यात साठवण्याचा प्रयत्न करत होतो.

▪️नदीच्या पात्रात २०० मि. लांब आणि ६० मि. रुंद अश्या भागात अनेक रांजणखळग्यांनी चित्तवेधक शिल्पे तयार केली आहेत. काही रांजणखळगे खूप खोल आणि बरेच लांब होते. भूशास्त्रद्न्यांच्या मते वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाने रांजण खळग्यांची निर्मिती झाली आहे.

✅ कुकडी नदीच्या पात्रात कठीण आणि मृदू खडकाचे स्तर एका आड एक आहेत. पात्रात वेगाने वाहणाऱ्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर दगड गोटे वहात येतात. दगड गोटे आणि खडक यांच्यात होणाऱ्या घर्षणाने, मृदू खडक झिजून कठिण खडकाचा मधला भाग तसाच रहातो.


महाराष्ट्रात संरक्षण मंत्रालयाने चालवलेल्या संस्था

🔹नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलॉजी – पुणे

🔸नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेटरॉलॉजी – पुणे

🔹इन्स्टिट्यूट ऑफ नेव्हल मेडिसीन – मुंबई

🔸जसलोक रिसर्च सेंटर – मुंबई

🔹हाफकिन इन्स्टिट्यूट – मुंबई

🔸इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रॉडक्शन – मुंबई

🔹रिजनल कॅन्सर सेंटर – पुणे

🔸इंडियन ड्रग रिसर्च लॅबरोटरी – पुणे

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...