१७ ऑगस्ट २०१९

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना - रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार - "ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द एपोस्टल"जाहीर

👉भारत-रशिया द्विपक्षीय संबंध वाढवण्यात बजावलेल्या भूमिकेसाठी

👉रशियाचे अध्यक्ष - व्लादिमीर पुतीन यांनी पुरस्कार जाहीर केला आहे.

👉रशियाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार असून - १६९८ पासून दिला जातो.
👉संत अँड्रु यांच्या स्मरणार्थ दिला जातो
👉१९१७ मध्ये रशियन राज्यक्रांती नंतर बंद केला होता.
👉मात्र , १९९८ पासून पुरस्कार देणे पुन्हा

👉१९९८ मध्ये बोरिस येल्त्सिन यांनी सुरू केला

👉अॅमेझॉनचं जगातलं सर्वात मोठं संकुल हैदराबादेत👈


👉जगातली सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अॅमेझॉनचा जगातला सर्वात मोठा कॅम्पस भारतात उभारला जात आहे. हैदराबाद येथे कंपनीने यासाठी दहा एकर जागा विकसित केली आहे.

👉हैदराबादमधील नानक्रमगुडा येथे हा आयटी हब तयार होत आहे. येथील नवी इमारत १५ मजली आहे. तिचा एकूण विस्तार ३० लाख चौ. फूट जागेत पसरलेला आहे. यातील १० लाख चौ. फूट जागा तर केवळ पार्किंगसाठी देण्यात आली आहे.

👉सूत्रांच्या माहितीनुसार, ही इमारत जुलैच्या मध्यापासूनच कार्यान्वित झाली आहे, मात्र तिचं औपचारिक उद्घाटन अद्याप झालेलं नाही. या इमारतीची सध्याची क्षमता ७ हजार माणसांची आहे ती सप्टेंबर अखेरपर्यंत ९ हजार माणसांइतकी करण्यात येणार आहे. पुढील आठवड्यात तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या हस्ते या संकुलाचं उद्घाटन होणार आहे.

*चालू घडामोडी (17/08/2019)*

📕 *इस्रोच्या प्रमुखांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान*

◆ इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. सिवन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे तामिळनाडू सरकारने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. गुरूवारी त्यांना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.

◆ विज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

◆ के सिवन यांचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. त्यांनी तामिळनाडूतील एका सरकारी शाळेतून तामिळ भाषेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते शेतात आपल्या वडिलांचीही मदत करत असत. याच कारणामुळे त्यांना आपल्या घराजवळच असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला होता.

◆ त्यांनी गणित हा विषय घेऊन आपलं बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं. हलाकीच्या परिस्थितीमुळे लहानपणी त्यांना पायात कधीही चपला किंवा बूट घालता आले नव्हते. तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण धोतर घालूनच जात होतो, असंही त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. एमआयटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पँट परिधान केली होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अटल काव्यांजली - कवी संमेलन*

◆ अटल काव्यांजली - कवी संमेलन
◆ ठिकाण- नवी दिल्ली
◆ माजी PM- अटल बिहारी वाजपेयी प्रथम पुण्यतिथी निमित्त 16 ऑगस्ट 2019 रोजी.

◆ अटलबिहारी वाजपेयी (जन्म: २५ डिसेंबर १९२४; मृत्यू : १६ आॅगस्ट २०१८) हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते.

● अटल बिहारी वाजपेयी:
---------------------------------------------------
● राजकीय कारकीर्द

◆- भारत छोडो आंदोलन (1942) 23 दिवसांचा करावास
◆- 1968 मध्ये जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
◆- 1977 भारताचे परराष्ट्रमंत्री
◆- 1977 संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदीतून भाषण करणारे पहिले व्यक्ती
--------------------------------------------
● पुरस्कार

◆- 1992 पद्म विभूषण
◆- 1994 Outstanding Parliamentarian Award
◆- 2015 Bangladesh Liberation War Honour
◆- 2015 भारतरत्न
--------------------------------------------------
● उल्लेखनीय कामगिरी

◆- मे 1998 पोखरण (राजस्थान) अणू चाचणी
◆- 1998-99 Lahore Summit, दिल्ली लाहोर बस सेवा सुरू केली
◆- जून 1999 कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अतनू चक्रवर्ती रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक*

◆ केंद्र सरकारने भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव पदावर असलेले अतनू चक्रवर्ती यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक केली आहे. चक्रवर्ती यांची ही नियुक्ती सुभाष चंद्र गर्ग यांच्या जागेवर करण्यात आली

◆ अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जस्टिस एसएन शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विद्यमान न्यायमूर्तींची सीबीआय चौकशी होणार आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाला फायदा होईल असे आदेश दिल्याचा जस्टिस शुक्ला यांच्यावर आरोप आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

महागाई घटणे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायकच

ग्राहक किमतीवर आधारित चलनवाढीचा दर (महागाई) जूनच्या ३.१८ टक्क्यांवरून जुलैमध्ये ३.१५ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या चार टक्क्यांच्या महागाई दरापेक्षा हा बराच कमी आहे. साधारणत: एका दशकापूर्वी महागाईचा दर दोन आकड्यांमध्ये होता. मात्र, आता तो जवळपास तीन टक्क्यांच्या आसपास आला आहे. महागाईचा दर कमी होणे अर्थात महागाई घटणे सर्वसामान्य ग्राहकांसाठी जमेची बाजू आहे. कारण, त्यामुळे दैनंदिन जीवनातील गोष्टींसाठी खर्च कमी करावा लागतो. मात्र, अर्थव्यवस्थेचा विचार करता महागाईच्या दरात घट होणे चांगले नाही.

कमी महागाई = कमी उत्पन्न

महागाईचा दर घटल्यास खाद्यपदार्थांच्या किमतीही कमी होतात. किरकोळ महागाई दरामध्ये खाद्यपदार्थांची ५५ टक्के हिस्सेदारी आहे. ही ग्राहकांसाठी खूशखबर आहे. मात्र, ग्रामीण भागावर त्याचे वाईट परिणाम होताना दिसून येतात. यामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते. महागाईचा दर कमी झाल्यास सामान्यत: संबंधितांच्या वेतनवाढीलाही मर्यादा पडतात.

कमी उत्पन्न = खर्चांमध्ये मोठी कपात

व्यक्तीच्या उत्पन्नवाढीवर मर्यादा आल्या किंवा ते सुस्त झाल्यास व्याजदरांमध्ये घट होते, व्यक्ती निवृत्तीसाठी अधिक बचत करण्यासाठी तयार होतात आणि गरजेच्या खर्चातही कपात करण्याची वेळ ओढवते. शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या उत्पादनाचीही कमी किंमत मिळते. मात्र, त्यांचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी नागवला जातो. त्यामुळे कर्जे

फेडणे अवघड होऊन बसते. त्यामुळे शेतकरी किंवा ग्रामीण भागातील व्यक्तींना आपोआपच खर्चांमध्ये कपात करण्याची वेळ येते.

अवघड परिस्थिती = कमी मागणी

ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मागणी कमी असल्याने वस्तू आणि सेवांवरही त्याचा प्रभाव पडतो. मागणी कमी असल्याने कंपन्या वस्तूंच्या किमतीत वाढ करू शकत नाहीत. याचाच अर्थ असा की कंपन्या अधिक मजूरी देऊ शकत नाहीत. त्यामुळे उत्पन्नातही घट होते. सध्या देशातील वाहन उद्योगात हेच होत आहे. मागणी कमी असल्याने केवळ ग्राहकांची क्रयशक्तीच कमी न होता गुंतवणूक आणि रोजगारांच्या संधींवरही त्याचा विपरित परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्र यांनी गेल्याच महिन्यात एक ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, 'बऱ्याचदा महागाई कमी असणे चांगले असते. मात्र, सातत्याने रक्तदाब घटणे तब्येतीच्या दृष्टीने फारशी चांगली बाब नसते. बऱ्याचदा महागाई वाढत असेल, तर गुंतवणुकीचे संकेत मिळतात. कमी व्याज दर आणि मागणीत वाढ करण्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.' याचाच अर्थ असा की महागाईचा दर योग्य असणे आवश्यक आहे... जो ग्राहकांना अडचणीत आणणार नाही आणि अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा असावा.

● राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार 2019

बजरंग पुनिया, दीपा मलिक यांना 'खेल रत्न', तर रवींद्र जडेजाला अर्जुन पुरस्कार. आशियाई व राष्ट्रकुल स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता कुस्तीपटू बजरंग पुनिया आणि पॅरा अॅथलिट दीपा मलिक यांना यंदाचा राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यांच्यासह क्रिकेटपटू रवींद्र जडेजा आणि पूनम यादव यांना अर्जुन पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. निवड समितीनं दोन दिवसांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला.

राजीव गांधी खेल रत्न -
बजरंग पुनिया ( कुस्ती) व दीपा मलिक ( पॅरा अॅथलिट)

द्रोणाचार्य पुरस्कार -
विमल कुमार ( बॅडमिंटन), संदीप गुप्ता ( टेबल टेनिस), मोहिंदर सिंग ढिल्लोन ( अॅथलिट)

जीवनगौरव पुरस्कार -
मेर्झबान पटेल ( हॉकी), रंबीर सिंग खोक्कर ( कबड्डी), संजय भरद्वाज ( क्रिकेट)

अर्जुन पुरस्कार
तजिंदरपाल सिंग तूर ( अॅथलिट), मोहम्मद अनास याहीया ( अॅथलिट), एस भास्करन ( बॉडीबिल्डींग), सोनिया लाथेर ( बॉक्सिंग), रवींद्र जडेजा ( क्रिकेट), चिंग्लेनसाना सिंग कंगुजान ( हॉकी), अजय ठाकूर ( कबड्डी), गौरव सिंग गिल ( मोटर स्पोर्ट्स), प्रमोद भगत ( पॅरा स्पोर्ट्स बॅडमिंटन), अंजुम मुदगील ( शूटींग), हरमित राजुल देसाई ( टेबल टेनिस), पूजा धांडा ( कुस्ती), फॉदा मिर्झा ( इक्वेस्टेरियन), गुरप्रीत सिंग संधू ( फुटबॉल), पूनम यादव ( क्रिकेट), स्वप्ना बर्मन ( अॅथलिट), सुंदर सिंग गुर्जर ( पॅरा अॅथलिट), बी साई प्रणित ( बॅडमिंटन), सिमरन सिंग शेरगिल ( पोलो)

ध्यानचंद पुरस्कार -
मॅन्युएल फ्रेडीक्स ( हॉकी), अरुप बसाक ( टेबल टेनिस), मनोज कुमार ( कुस्ती), नितीन किर्तने ( टेनिस), सी. लाल्रेमसंगा ( तिरंदाजी)

*चालू घडामोडी (17/08/2019)*

📕 *इस्रोच्या प्रमुखांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान*

◆ इस्रोचे प्रमुख के. सिवन यांचा ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने सन्मान करण्यात आला. सिवन यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानामुळे तामिळनाडू सरकारने हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. गुरूवारी त्यांना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात आले.

◆ विज्ञान क्षेत्रातील प्रगती, तसेच मानवी आणि विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी कार्यरत असणाऱ्या व्यक्तींना ‘डॉ. एपीजे अब्दुल कलाम पुरस्कारा’ने गौरवण्यात येते. तामिळनाडू सरकारच्यावतीने तामिळनाडूच्या रहिवासी असणाऱ्या व्यक्तींनाच हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. सुवर्ण पदक आणि पाच लाख रूपये रोख असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

◆ के सिवन यांचे बालपण अतिशय खडतर परिस्थितीत गेलं. त्यांनी तामिळनाडूतील एका सरकारी शाळेतून तामिळ भाषेतून आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण घेताना ते शेतात आपल्या वडिलांचीही मदत करत असत. याच कारणामुळे त्यांना आपल्या घराजवळच असलेल्या महाविद्यालयात प्रवेश घ्यावा लागला होता.

◆ त्यांनी गणित हा विषय घेऊन आपलं बीएससीचं शिक्षण पूर्ण केलं. हलाकीच्या परिस्थितीमुळे लहानपणी त्यांना पायात कधीही चपला किंवा बूट घालता आले नव्हते. तसेच महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण होईपर्यंत आपण धोतर घालूनच जात होतो, असंही त्यांनी यापूर्वी सांगितलं होतं. एमआयटीमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदा पँट परिधान केली होती.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अटल काव्यांजली - कवी संमेलन*

◆ अटल काव्यांजली - कवी संमेलन
◆ ठिकाण- नवी दिल्ली
◆ माजी PM- अटल बिहारी वाजपेयी प्रथम पुण्यतिथी निमित्त 16 ऑगस्ट 2019 रोजी.

◆ अटलबिहारी वाजपेयी (जन्म: २५ डिसेंबर १९२४; मृत्यू : १६ आॅगस्ट २०१८) हे माजी भारतीय पंतप्रधान आणि एक हिंदी कवी होते.

● अटल बिहारी वाजपेयी:
---------------------------------------------------
● राजकीय कारकीर्द

◆- भारत छोडो आंदोलन (1942) 23 दिवसांचा करावास
◆- 1968 मध्ये जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष
◆- 1977 भारताचे परराष्ट्रमंत्री
◆- 1977 संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत हिंदीतून भाषण करणारे पहिले व्यक्ती
--------------------------------------------
● पुरस्कार

◆- 1992 पद्म विभूषण
◆- 1994 Outstanding Parliamentarian Award
◆- 2015 Bangladesh Liberation War Honour
◆- 2015 भारतरत्न
--------------------------------------------------
● उल्लेखनीय कामगिरी

◆- मे 1998 पोखरण (राजस्थान) अणू चाचणी
◆- 1998-99 Lahore Summit, दिल्ली लाहोर बस सेवा सुरू केली
◆- जून 1999 कारगिल युद्ध, ऑपरेशन विजय
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *अतनू चक्रवर्ती रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक*

◆ केंद्र सरकारने भारत सरकारच्या अर्थ मंत्रालयातल्या आर्थिक व्यवहार विभागात सचिव पदावर असलेले अतनू चक्रवर्ती यांची भारतीय रिझर्व्ह बँकेच्या केंद्रीय संचालक मंडळावर संचालकपदी नेमणूक केली आहे. चक्रवर्ती यांची ही नियुक्ती सुभाष चंद्र गर्ग यांच्या जागेवर करण्यात आली

◆ अलाहाबाद हायकोर्टाचे न्यायमूर्ती एस. एन. शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहे. सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी जस्टिस एसएन शुक्ला (Justice Narayan Shukla) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे पहिल्यांदाच विद्यमान न्यायमूर्तींची सीबीआय चौकशी होणार आहे. एका वैद्यकीय महाविद्यालयाला फायदा होईल असे आदेश दिल्याचा जस्टिस शुक्ला यांच्यावर आरोप आहे.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

महागाई घटणे अर्थव्यवस्थेसाठी धोकादायकच

ग्राहक किमतीवर आधारित चलनवाढीचा दर (महागाई) जूनच्या ३.१८ टक्क्यांवरून जुलैमध्ये ३.१५ टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या चार टक्क्यांच्या महागाई दरापेक्षा हा बराच कमी आहे. साधारणत: एका दशकापूर्वी महागाईचा दर दोन आकड्यांमध्ये होता. मात्र, आता तो जवळपास तीन टक्क्यांच्या आसपास आला आहे. महागाईचा दर कमी होणे अर्थात महागाई घटणे सर्वसामान्य ग्राहकांसाठी जमेची बाजू आहे. कारण, त्यामुळे दैनंदिन जीवनातील गोष्टींसाठी खर्च कमी करावा लागतो. मात्र, अर्थव्यवस्थेचा विचार करता महागाईच्या दरात घट होणे चांगले नाही.

कमी महागाई = कमी उत्पन्न

महागाईचा दर घटल्यास खाद्यपदार्थांच्या किमतीही कमी होतात. किरकोळ महागाई दरामध्ये खाद्यपदार्थांची ५५ टक्के हिस्सेदारी आहे. ही ग्राहकांसाठी खूशखबर आहे. मात्र, ग्रामीण भागावर त्याचे वाईट परिणाम होताना दिसून येतात. यामुळेच शेतकऱ्यांचे उत्पन्न घटते. महागाईचा दर कमी झाल्यास सामान्यत: संबंधितांच्या वेतनवाढीलाही मर्यादा पडतात.

कमी उत्पन्न = खर्चांमध्ये मोठी कपात

व्यक्तीच्या उत्पन्नवाढीवर मर्यादा आल्या किंवा ते सुस्त झाल्यास व्याजदरांमध्ये घट होते, व्यक्ती निवृत्तीसाठी अधिक बचत करण्यासाठी तयार होतात आणि गरजेच्या खर्चातही कपात करण्याची वेळ ओढवते. शेतकऱ्यांना त्यांनी पिकवलेल्या उत्पादनाचीही कमी किंमत मिळते. मात्र, त्यांचा उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी नागवला जातो. त्यामुळे कर्जे

फेडणे अवघड होऊन बसते. त्यामुळे शेतकरी किंवा ग्रामीण भागातील व्यक्तींना आपोआपच खर्चांमध्ये कपात करण्याची वेळ येते.

अवघड परिस्थिती = कमी मागणी

ग्रामीण आणि शहरी भागामध्ये मागणी कमी असल्याने वस्तू आणि सेवांवरही त्याचा प्रभाव पडतो. मागणी कमी असल्याने कंपन्या वस्तूंच्या किमतीत वाढ करू शकत नाहीत. याचाच अर्थ असा की कंपन्या अधिक मजूरी देऊ शकत नाहीत. त्यामुळे उत्पन्नातही घट होते. सध्या देशातील वाहन उद्योगात हेच होत आहे. मागणी कमी असल्याने केवळ ग्राहकांची क्रयशक्तीच कमी न होता गुंतवणूक आणि रोजगारांच्या संधींवरही त्याचा विपरित परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर उद्योगपती आनंद महिंद्र यांनी गेल्याच महिन्यात एक ट्विट केले होते. त्यात म्हटले होते की, 'बऱ्याचदा महागाई कमी असणे चांगले असते. मात्र, सातत्याने रक्तदाब घटणे तब्येतीच्या दृष्टीने फारशी चांगली बाब नसते. बऱ्याचदा महागाई वाढत असेल, तर गुंतवणुकीचे संकेत मिळतात. कमी व्याज दर आणि मागणीत वाढ करण्याच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न केले जातात.' याचाच अर्थ असा की महागाईचा दर योग्य असणे आवश्यक आहे... जो ग्राहकांना अडचणीत आणणार नाही आणि अर्थव्यवस्थेलाही चालना देणारा असावा.

GST संकलनात हे राज्य ठरले अव्वल


▪️2019-20 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या 4 महिन्यात बिहार, उत्तर प्रदेश, ओडिशा आणि मध्यप्रदेश राज्यात सर्वाधिक जीएसटी संकलन झाले आहे.

▪️आर्थिक वर्षाच्या चार महिन्यात जीएसटी संकलन 9 टक्क्यांनी वाढला असून तो साडे तीन लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचल आहे.

▪️ वस्तू आणि सेवा कर संकलनात राजधानी दिल्ली आणि पश्चिम बंगाल ही दोन राज्ये मागे पडली आहेत.

▪️ज्याठिकाणी वस्तू आणि सेवांचा उपभोग वाढेल त्या राज्यात कर संकलन जास्त होईल, असा अंदाज अर्थतज्ञांनी व्यक्त केला आहे.

💰 GST संकलन
▪ ओडिसा : 20.8
▪ उत्तराखंड : 19.7
▪ बिहार : 17.8
▪ मध्य प्रदेश : 14.6
▪ आसाम : 14.1
▪ उत्तर प्रदेश : 12
▪ पश्चिम बंगाल : 6.4

❇️ केंद्र सरकारने काश्मीरमधील कलम 370 हटवल्यापासून बिथरलेल्या पाकिस्तान निषेध व्यक्त करत भारताशी व्यापारी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला.


▪️ त्यानंतर भारताने देखील पाकिस्तानला एका पाठोपाठ एक धक्के देण्यास सुरुवात केली आहे.

▪️अशातच आता भारताने जोधपूरपासून मुनाबावमध्ये चालणारी साप्ताहिक थार लिंक एक्सप्रेस रेल्वे सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

▪️ याआधी भारताने दिल्लीहून लाहोरला जाणारी 'सदा-ए-सरहद' बस सेवा देखील बंद केली होती.

भारत-पाकिस्तान या दोन देशात ही एक्स्प्रेस सुरू होती. 18 फेब्रुवारी 2006 पासून ही गाडी सरू होती. जोधपूरच्या भगतच्या कोठीहून कराची दरम्यान ही रेल्वे सुरू होती.

❇️ तिसरे अपत्य असणाऱ्या कर्मचाऱ्यांना करणार बडतर्फ

▪️लोकसंख्येवर नियंत्रण आणण्यासाठी शासकीय सेवेत असणाऱ्या अ,ब,क,ड संवर्गातील कर्मचाऱ्यांना २८ मार्च २००५ नंतर तिसरा अपत्य झाल्यास त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा नियम आहे.

▪️सन २००५ नंतर तिसरे अपत्य असलेले शेकडो कर्मचारी जिल्हा परिषद अंतर्गत सेवा देत आहेत. त्या कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्यासाठी जिल्हा परिषदेने आता कडक पाऊल उचलले आहे.

▪️या नियमाची पहिली विकेट गेली आहे.
लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र शासकीय नोकरीवर लागतांना द्यावे लागते.

▪️नोकरीत लागतांना शपथपत्रात दोनच अपत्य असल्याचे प्रमाणपत्र द्यावे लागते.

▪️ जिल्हा परिषद अधिकारी, कर्मचाऱ्यांना दोन पेक्षा जास्त अपत्य असल्यास त्यांना सेवेतून बडतर्फ करण्यात येणार आहे.

🔸भारतीय क्रिकेट संघाचे आजवरचे प्रशिक्षक🔸

🌺🌺कुस्तीपटू बजरंग पुनियाला 'खेलरत्न पुरस्कार'?🌺🌺

🔰भारताचा स्टार कुस्तीपटू बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार क्रीडा क्षेत्रात दिला जाणारा भारतातील सर्वोच्च पुरस्कार आहे. कुस्तीत लागोपाठ चांगले प्रदर्शन करणाऱ्या बजरंग पुनियाला यावर्षीचा राजीव गांधी खेळरत्न पुरस्कार मिळावा यासाठी भारतीय कुस्ती महासंघाकडून या प्रतिष्ठीत पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.

🔰बजरंग पुनियासोबतच महिला कुस्तीपटू विनेश फोगाटच्या नावाची शिफारस सुद्धा करण्यात आली आहे. पुनियाने नुकतीच तबिलिसी ग्रां. प्री मध्ये सुवर्ण पदक पटकावले होते. यावेळी त्याने इराणच्या पेइमान बिबयानीचा पराभव करून ६५ किलो गटात सुवर्ण पदक पटकावले होते. भारतातील अव्वल कुस्तीपटू बजरंगने चीनमध्ये आयोजित आशियाई चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवून आशियात आपला दबदबा कायम ठेवण्यात यश मिळवले होते. बजरंगने गेल्यावर्षी आशियाई खेळात तसेच राष्ट्रकुल स्पर्धेत सुद्धा सुवर्ण पदक पटकावले होते. १२ सदस्यीय निवड समितीने पुनियाच्या नावाला पसंती दर्शवली आहे. या समितीतीत सर्व सदस्यांनी एकमताने पुनियाच्या नावावर शिक्कामोर्तब केले. या समितीत बायचूंग भूतिया, मेरी कोम यासारखी क्रीडा क्षेत्रातील नावे आहेत.

🔰१२ सदस्यीय निवड समिती खेलरत्न पुरस्कारासाठी आणखी एका आघाडीच्या क्रीडापटूचे नाव सूचवू शकते. दरम्यान, गेल्यावर्षी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि महिला वेटलिफ्टर मीराबाई चानू या दोघांना हा पुरस्कार मिळाला होता.

मदनलाल धिंग्रा


जन्म : १८ सप्टेंबर १८८३

(अमृतसर, पंजाब, ब्रिटिश भारत)

फाशी : १७ ऑगस्ट १९०९

(पेन्टोनव्हिल तुरुंग, लंडन, इंग्लंड)

चळवळ : भारतीय स्वातंत्र्यलढा
संघटना : अभिनव भारत,
                होमरूल लीग
धर्म : हिंदू
प्रभाव : विनायक दामोदर सावरकर

                  मदनलाल धिंग्रा  हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. इंग्लंडमध्ये शिकत असताना त्यांनी सर विलियम हट कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केली. या घटनेचा २०व्या शतकातील भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिल्या क्रांतीकारी घटनांपैकी एक म्हणून उल्लेख केला जातो.

🕺 सुरुवातीचे जीवन
            त्यांचा जन्म अमृतसर येथे उच्च मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील एक ख्यातनाम डॉक्टर होते आणि बंधू बॅरिस्टर होते. मदनलालांचे शिक्षण अमृतसरला झाले. ते पंजाब विद्यापीठातून बी. ए. झाले व १९०६ मध्ये उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला गेले. तत्पूर्वी विद्यार्थिदशेतच त्यांचा विवाह झाला. इंग्लंडमध्ये त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकीचा अभ्यास केला. तेथील वास्तव्यात त्यांचा स्वातंत्र्यवीर सावरकर, श्यामजी कृष्णवर्मा, हरदयाळ शर्मा वगैरे क्रांतिकारकांशी स्नेह जमला.

👬 सावरकरांशी संबंध
           मदनलाल धिंग्रा हे उच्च शिक्षणासाठी लंडन येथे राहत होते. सावरकर जेव्हा तिथे होते तेव्हा त्यांना एका भोजनप्रसंगी वर्णद्वेषाचा अनुभव आला. त्यांना वेगळ्या टेबलावर बसण्यास सांगितले. जाज्वल्य देशाभिमान आणि अत्यंत स्वाभिमानी सावरकरांना ही गोष्ट सहन झाली नाही आणि ते तिथून बाहेर पडले. त्या वेळी मदनलाल आणि त्यांचे एक मित्र तिथे उपस्थित होते. मदनलालांनी सावरकरांना समजवण्याचा प्रयत्न केला की ही अशी वागणूक त्यांना अंगवळणी करून घ्यायला हवी. मदनलाल आणि सावरकर यांची ही पहिली भेट!!! मदनलाल तसे श्रीमंत घराण्यातले होते. त्यांच्यात देशभक्तीची भावना निर्माण झाली ते सावरकरांच्या विचारांमुळे. हा प्रभाव इतका प्रचंड होता की पुढे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते कर्झन वायलीचा खून करण्यास तयार झाले.

🔫 कर्झन वायलीचा खून
                   ते होमरूल लीग व सावरकरांच्या अभिनव भारत या संस्थांचे सभासद झाले. त्यांच्या भावनाप्रधान मनावर खुदिराम बोस व कन्हैयालाल या क्रांतिवीरांच्या बलिदानाचा फार मोठा परिणाम झाला. त्यांनी सशस्त्र क्रांतिवीरास साजेसे शिक्षण घेतले. पुढे त्यांनी भारताच्या मंत्र्याचा स्वीय सहाय्यक कर्नल विल्यम कर्झन वायली याच्या खुनाचा कट केला. त्यांचा पहिला बेत फसला. पुढे १ जुलै १९०९ रोजी इंपीरियल इन्स्टिट्यूटच्या जहांगीर हाऊसमध्ये इंडियन नॅशनल असोसिएशनच्या सभेच्या वेळी त्यांनी कर्झन वायली यावर गोळ्या झाडल्या; त्या वेळी कोवास लालाकाका हाही मध्ये आला. दोघेही मरण पावले. कर्झन वायली खरेतर मदनलाल यांच्या वडिलांचा स्नेही होता. या खुनाबद्दल मदनलाल यांना फाशीची शिक्षा देण्यात आली. पेन्टोनव्हिल (लंडन) तुरुंगात ते ‘भारत माता की जय’च्या उद्‌घोषात फाशी गेले.

🕯 शेवटचे वक्तव्य
           फाशीवर जाण्यापूर्वीच्या शेवटच्या वक्तव्यात धिंग्रानी असे म्हटले आहे "आत्म बलिदान कसे करावे ही एकच शिकवण सध्या हिंदुस्थानात देण्यायोग्य आहे.ही शिकवण देण्याचा एकच मार्ग म्हणजे स्वत:चे बलिदान करून मोकळे होणे होय. या जाणिवेने प्रेरित होऊन मी प्राणार्पण करत आहे व माझ्या हौतात्म्याचा मला अभिमान वाटत आहे.याच भारतभूचे संतान म्हणून मला पुनर्जन्म प्राप्त होवो व याच पवित्र कार्यात माझा देह पुन्हा पडो इतकीच ईश्वरचरणी माझी प्रार्थना आहे.भारतीय स्वातंत्र्याचा पक्ष विजयी होऊन, मानवजातीचे कल्याण व ईश्वराचे वैभव यांचा पुरस्कार करणारा स्वतंत्र भारतवर्ष जगात आत्मतेजाने तळपू लागेपर्यंत माझ्या जन्ममृत्यूचे हे चक्र असेच चालू राहावे अशी माझी परमेश्वराला प्रार्थना आहे."

💎 नाटक
            मदनलाल धिंग्रा आणि सावरकर यांच्या जीवनावर मराठीत 'चॅलेंज' नावाचे नाटक आले आहे. पहिल्या दहा प्रयोगांना मोफत किंवा 'नाटक पाहा आणि आवडेल तेवढे पैसे द्या' अशी सवलत आहे. नाटकाचे लेखक-दिग्दर्शक-वेशभूषा : दिग्पाल लांजेकर; सादरकर्त्या : मुक्ता बर्वे.

          🇮🇳 जयहिंद 🇮🇳

🙏 स्वातंत्र्य वेदीवर आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या सर्व ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांना विनम्र अभिवादन 🙏
                

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...