०९ ऑगस्ट २०१९

🌹🌳🌴मोदी सरकारकडून ३००० ची ‘किसान’ पेंशन योजना आज पासून सुरू🌴🌳🌹

👉केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर दिल्लीतून याची सुरुवात करणार आहेत.

👉या योजनेचा फायदा देशातील ५ कोटी शेतकऱ्यांना होणार आहे.

👉स्वातंत्र्यानंतरची ही पहिलीच वेळ आहे जेव्हा शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी योजना सुरू केली जाईल.

👉देशभरातील अल्पभूधारक शेतकरी (एसएमएफ) साठी एक ऐच्छिक आणि योगदान देणारी पेन्शन योजना आहे.

👉या योजनेसाठी १८ ते ४० वर्षांपर्यंतचे शेतकरी अर्ज करू शकतील.

👉योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ५० रुपयांपासून १००, १५० रुपयांपर्यंत रोख रक्कम दरमहिन्याला भरावी लागेल.

👉तसंच स्किममध्ये गुंतवणुक करणाऱ्या शेतकऱ्यांना ६० वर्षाचे झाल्यानंतर दरमहिन्याला ३००० रुपये पेंशन म्हणून मिळणार.

👉पेंशन योजनेत नाव असलेल्या शेतकऱ्यांचा मृत्य़ू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला ५० टक्के रक्कम देण्यात येईल. म्हणजे १५०० रुपये मिळतील. तसंच ही योजना जीवन विमा निगम यांच्यातर्फे चालवली जाणार आहे.

👉या योजनेसाठी नोंदणी करण्यासाठी:-
१. आधार कार्ड,
२. जमिनीचा सात-बारा,
३. बँक पासबुक,
४. राशन कार्ड,
५. २ फोटो

अशा कागदपत्रांची गरज असणार आहे.

👉या योजने अंतर्गत १२ कोटी शेतकऱ्यांना याचा फायदा करून देणे हा उद्देश आहे.

👉तसंच किसान पेंशन योजनेता लाभ घेण्यासाठी आपण किसान कॉल सेंटरच्या १८००-१८०-१५५१ या नंबरवर फोन करून माहिती घेऊ शकता. तसंच सामान्य सेवा केंद्र आणि राज्याचे कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क करू शकता.

📚 *चालू घडामोडी (09/08/2019)*📚

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *लिंगाधारित अर्थसंकल्प [Gender Budget]

- या संकल्पनेचा उद्य 90 च्या दशकात झाला.
- जागतिक महिला परिषद 1995 नंतर "युनिफेम"तर्फे 1996 मध्ये द. आफ्रिका, पूर्व आफ्रिका, दक्षिण पूर्व आशिया, मध्य अमेरिका या भागात या संकल्पनेवर काम सुरू झाले.
- ही संकल्पना सर्वप्रथम ऑस्ट्रेलियात स्विकारण्यात आली.
---------------------------------------------------
● नक्की संकल्पना काय ?

- जेंडर बजेट म्हणजे महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प नव्हे, तर अर्थसंकल्पातील विविध प्रस्तावांचे महिलाकेंद्रित विश्लेषण होय.
- थोडक्यात स्त्रियांच्या स्थितीत सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी केलेल्या वित्तीय सुधारणांचे अंतिम परिणाम मोजणे म्हणजे जेंडर बजेट.
---------------------------------------------------
● भारतात सुरूवात

- सर्वप्रथम 2001 मध्ये या संकल्पनेवर विचार होवू लागला.
- तत्कालीन केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या 2000-2001 च्या अर्थसंकल्पीय भाषणात पहिल्यांदा जेंडर बजेटचा उल्लेख झाला.
- 2004 मध्ये केंद्र सरकारने ही संकल्पना स्विकारली तर 2005 पासून त्यावरचे परिशिष्ट हा बजेटचा भाग बनले.
- ओरिसा, उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, अरुणाचल प्रदेश, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, बिहार, केरळ, इ. राज्यांनी या संकल्पनेची अंमलबजावणी केली.
---------------------------------------------------
● महाराष्ट्रात सुरूवात

- राज्यात 2013 मध्ये जेंडर बजेट ही संकल्पना स्विकारण्यात आली.
- 1994, 2001 आणि 2014 अशी तीन महिला धोरणे महाराष्ट्र सरकारने तयार केली आहेत.
- 1992 पासून राज्यात नागरी स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये महिला व बालकल्याण समिती स्थापने बंधनकारक करण्यात आले आहे.
- महापालिकेच्या एकूण बजेटपैकी 5% रक्कम जेंडर बजेटसाठी राखून ठेवण्याचे बंधनकारक आहे.
---------------------------------------------------
● जेंडर बजेटची उद्दिष्टे

- महिलांच्या सामाजिक समानतेसाठीच्या प्रमुख गरजा ओळखून त्यांची क्रमवारी लावून, त्यासाठी सुयोग्य आर्थिक तरतूद करणे.
- सामाजिक योजना आणि आर्थिक तरतुदी यांची सांगड घालणे.
- विशेष सामाजिक योजनांवरील खर्चावर नियंत्रण ठेवणे.
-------------------------------------------------
● अर्थसंकल्पाची कार्यपद्धती

- लिंगाधारित अर्थसंकल्पासाठी स्वतंत्र आदेश जारी करणे.
- जेंडर बजेट सेल स्थापन करणे.
- जेंडर बजेट अहवाल प्रसिद्ध करणे.
-------------------------------------------------
● जेंडर बजेटसाठी प्रशिक्षण

Vaikunth Mehta National Institute of Cooperative Management [VAMNICOM] Pune या संस्थेच्या Centre for Gender Studies मार्फत जेंडर बजेट संबंधी मार्गदर्शन, जागरूकता आणि प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

📕 *आज प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न*

●माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (8 ऑगस्ट 2019 गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार 'भारत रत्न' देण्यात आला.,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल केला.

● राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

● या पुरस्कारासाठी दि. 25 जानेवारी 2019  या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

प्रणव मुखर्जी

● प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.

● मुखर्जी हे भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंधित आहेत.

● ते 1982 मध्ये वयाच्या 47 व्या वर्षी भारताचे सर्वात तरुण अर्थमंत्री झाले होते. त्यानंतर त्यांनी भारताचे अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री म्हणून काम केले.

● पंतप्रधानां व्यतिरिक्त ,आठ वर्षे लोकसभेचे सभागृह नेते राहिलेले ते एकमेव व्यक्ती.

● भारतरत्न पुरस्कार मिळविणारे सहावे राष्ट्रपती आहेत. याआधी राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, सर्वपल्ली राधाकृष्णन, झाकीर हुसेन,व्हीव्ही गिरी आणि डॉ ए पी जे अब्दुल कलाम यांना हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळाला आहे.

● पद्मविभूषण:2008

● त्यांनी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले.

नानाजी देशमुख

● हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे 11 ऑक्टोबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला.

● नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी काम केले.

● नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते होते.

● राज्यसभेचे सदस्यही होते.

● 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले

🌺🌺 प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख यांना भारतरत्न 🌺🌺

🔰माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आज (8 ऑगस्ट 2019 गुरूवार) देशाचा सर्वोच्च नागरिक सन्मान पुरस्कार 'भारत रत्न' देण्यात आला.,
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि जनसंघाचे नेते नानाजी देशमुख आणि ज्येष्ठ संगीतकार भूपेन हजारिका यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार बहाल केला.

🔰 राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

🔰 या पुरस्कारासाठी दि. 25 जानेवारी 2019  या तिघांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती.

🔴प्रणव मुखर्जी

🔰 प्रणव मुखर्जी यांचा जन्म 11 डिसेंबर 1935 रोजी पश्चिम बंगालमध्ये झाला.

🔰 ते भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसशी संबंधित आहेत.
त्यांनी भारताचे अर्थमंत्री,परराष्ट्रमंत्री तसेच संरक्षणमंत्री म्हणून काम केले.

🔰 भारतीय राजकारणामधील अमूल्य सेवेसाठी त्यांना भारत सरकारने इ.स. 2008 साली पद्मविभूषण पुरस्कार दिला. 

🔰 त्यांनी 25 जुलै 2012 ते 25 जुलै 2017 पर्यंत भारताचे 13 वे राष्ट्रपती म्हणून काम केले.

🔴नानाजी देशमुख

🔰 हिंगोली जिल्ह्य़ातील कडोली येथे 11 ऑक्टोबर 1916 रोजी त्यांचा जन्म झाला.

🔰 नानाजी देशमुख हे सामाजिक कार्यकर्ते होते. तसेच शिक्षण, आरोग्य आणि ग्रामीण स्वावलंबन या क्षेत्रात त्यांनी काम केले.

🔰 नानाजी देशमुख हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते होते.

🔰 राज्यसभेचे सदस्यही होते.

🔰 1999 मध्ये त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले

🔰 त्यांनी आणीबाणीत उजव्या आणि डाव्या पक्षांना समान राजकीय कार्यक्रम देण्यात आणि इंदिरा गांधींविरोधात संघटित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

🔰 जनता सरकारचा प्रयोग अपयशी ठरल्यानंतर मात्र राजकारणातून बाहेर पडून त्यांनी ग्रामीण भारत स्वयंपूर्ण व्हावा, यासाठी स्वत:ला झोकून दिले.

🔰 चित्रकूट येथे त्यांनी भारतीय संस्कृती आणि शिक्षण या बाबतीत मोठे कार्य केले होते.

🔰 27 फेब्रुवारी 2010 रोजी वयाच्या 95 व्या वर्षी त्यांचे निधन झाले.

🔴भूपेन हजारिका

🔰 त्यांचा जन्म 8 सप्टेंबर 1926 रोजी आसामच्या साडिया येथे झाला.

🔰 भूपेन हजारिका यांनी आसामात चित्रपट संगीतकार, गायक, गीतकार आणि दिग्दर्शक म्हणून कार्य केले.

🔰 आसामीबरोबरच हिंदी आणि बंगाली चित्रपटांनाही त्यांनी संगीत दिले होते.

🔰 चित्रपट सृष्टीतील सर्वोच्च अशा ‘दादासाहेब फाळके पुरस्कारा’ने तसेच पद्म किताबानेही त्यांचा गौरव झाला होता.

🔰 ‘इप्टा’पासून कलाजीवनाचा प्रारंभ केलेले हजारिका अनेक सामाजिक आंदोलनातही सहभागी होते.

🔰 2004 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपा कडून गुवाहाटीत उभे राहिले परंतु निवडून येऊ शकले नाही.

🔰 5 नोव्हेंबर 2011 रोजी वयाच्या ८५ व्या वर्षी त्यांचे मुंबईत निधन झाले.

🍀भारत रत्न पुरस्कार

🔰 सुरुवात: 1954

🔰 राष्ट्रपतींना भारतरत्न पुरस्कारची  शिफारस पंतप्रधान करतात.

🔰 पुरस्काराच्या एक बाजूला पिंपळाच्या पानावर सूर्याची प्रतिमा व देवनागरीत कोरलेला भारतरत्‍न हा शब्द तर एक बाजूला भारताचे राजचिन्ह असते.

🔰 हा पुरस्कार रोख स्वरूपात देत नाहीत..'हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.

🔰 भारतरत्न पुरस्काराने आजवर 48 जणांना सन्मानित करण्यात आले आहे.

🔰 यापूर्वी 2015 मध्ये माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पंडित मदन मोहन मालवीय यांना मरणोत्तर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.

🔰 आत्तापर्यंत हजारिका आणि देशमुख यांच्यासह 14 जणांना मरणोत्तर भारतरत्नने गौरविण्यात आले आहे.

🔰 सुरुवातीला भारतरत्न मरणोत्तर देण्याची तरतूद नव्हती. मात्र, त्यानंतर 1955 पासून मरणोत्तरही या सन्मानाने सन्मानित केले जाऊ लागले.

🔰 सेवा, कला, साहित्य, विज्ञान व विश्वशांती, मानव विकास, कारखानदारी इत्यादी क्षेत्रांतील लोकांना, सनदी सेवा बजावलेल्या व्यक्तींना व अन्य अतुलनीय कामगिरी बजावणाऱ्यांना, हा पुरस्कार देतात.

🔰 2014 मध्ये वरील क्षेत्रांबरोबरच क्रीडा क्षेत्रातही उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना या पुरस्कारात स्थान देण्यात आले

🔰 प्रथम पुरस्कारविजेते(1954):
1) सर्वपल्ली राधाकृष्णन
2) चक्रवर्ती राजगोपालचारी
3) डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण

​​🇮🇳फोर्ब्जच्या यादीतही पी.व्ही.सिंधूची बाजी🇮🇳

🅾' फोर्ब्ज'ने नुकतीच सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील महिला खेळाडूंची यादी प्रसिद्ध केली.

🅾 त्यात स्टार बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू तेराव्या स्थानी आहे.

🅾 या यादीत स्थान मिळवणारी ती एकमेव भारतीय महिला खेळाडू ठरली आहे.

🅾सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगातील १५ महिला खेळाडूंची यादी फोर्ब्जनं प्रसिद्ध केली आहे.

🅾 त्यात अमेरिकेची दिग्गज टेनिस स्टार सेरेना विल्यम्स अव्वल स्थानी आहे. फोर्ब्जनं २०१९ या वर्षासाठी जाहीर केलेल्या यादीनुसार, सिंधूची कमाई ५५ लाख डॉलर (जवळपास ३८ कोटी ८६ लाख ८७ हजार रुपये) इतकी आहे.

🅾 सेरेना ही पहिल्या स्थानी आहे. तिची कमाई २९.२ दशलक्ष डॉलर आहे.

🅾  दुसऱ्या स्थानी जपानची नाओमी ओसाका आहे. ओसाकाची एकूण कमाई २४.३ दशलक्ष अमेरिकी डॉलर आहे.

🅾एंजेलिक कर्बर तिसऱ्या स्थानी असून, तिची कमाई ११.८ दशलक्ष अमेरिकी डॉलर इतकी आहे.

✅✅एका ओळीत सारांश,9 ऑगस्ट 2019✅✅

🌹🌳🌴दिनविशेष🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट रोजी भारताने या दिनाचा 77 वा वर्धापन दिन साजरा केला - ऑगस्ट क्रांती दिन.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉RBIचा नवा रेपो दर - 5.40%.

👉RBIचा नवा रिव्हर्स रेपो दर - 5.15%.

👉RBIचा नवा बँक दर - 5.65%.

👉RBIचा नवा मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी (MSF) दर - 5.65%.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉8 ऑगस्ट रोजी राष्ट्रीय सौर ऊर्जा संस्था (NISE) आणि या जागतिक संघटनेच्या दरम्यान कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यासंदर्भात करार झाला - संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संस्था (UNIDO).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉“भारतरत्न” हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार मिळालेले भारताचे तेरावे राष्ट्रपती - प्रणव मुखर्जी.

👉7 ऑगस्ट रोजी निधन झालेले ज्येष्ठ दिग्दर्शक आणि अभिनेता - जे. ओम प्रकाश.

🌹🌳🌴क्रिडा🌴🌳🌹

👉‘फोर्ब्ज’च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या जगभरातल्या महिला खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवणारी एकमेव भारतीय महिला खेळाडू - बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू(55 लाख डॉलरसह तेराव्या स्थानी).

👉‘फोर्ब्ज’च्या सर्वाधिक कमाई करणार्‍या जगभरातल्या महिला खेळाडूंच्या यादीत प्रथम स्थान - टेनिसपटूसेरेना विल्यम्स (अमेरीका).

👉24 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या काळात होणार्‍या ‘AASF एशियन एज ग्रुप चँपियनशिप 2019’ या स्पर्धेचे ठिकाण - बेंगळुरू (कर्नाटक).

👉दोन समांतर संस्थांची निवड करून दिशानिर्देशांचे उल्लंघन केल्याबद्दल 8 ऑगस्ट रोजी या जागतिक संस्थेनी भारतीय तिरंदाजी संघाची (AAI) सदस्यता निलंबित केली – वर्ल्ड आर्चरी.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉महाराष्ट्रासाठी असलेल्या मुख्य निवडणूक अध‍िकारी कार्यालयाऐवजी हा स्वतंत्र विभाग निर्माण करण्यास आणि त्यासाठी नवीन 128 पदे निर्माण करण्यास 7 ऑगस्टला झालेल्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली - राज्य निवडणूक विभाग.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉ब्रिटनच्या या विद्यापीठातल्या वैज्ञानिकांनी जगातले जाडीने सर्वात पातळ (0.47 नॅनोमीटर) सोने (2-डी पदार्थ) तयार केले आहे जे मानवी बोटाच्या नखापेक्षा दहा लक्ष पटीने कमी जाडीचे किंवा फक्त दोन अणूच्या जाडीचे आहे – लीड्स विद्यापीठ.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉ज्या दराने बँकांना RBIकडून कर्ज दिले जाते - रेपो दर.

👉विविध बँकांच्या RBIमध्ये जमा असलेल्या पैश्यावर बँकांना मिळणारा व्याज दर - रिव्हर्स रेपो दर.

👉भारतीय जलतरण महासंघ (SFI) याचे स्थापना वर्ष – सन 1948.

👉अखिल भारतीय काँग्रेस परिषदेच्या मुंबई अधिवेशनात 'भारत छोडो' हा ठराव संमत झाला तो दिवस - 8 ऑगस्ट 1942.

👉संयुक्त राष्ट्रसंघ औद्योगिक विकास संस्था (UNIDO) – स्थापना वर्ष: 1966 (17 नोव्हेंबर); मुख्यालय: व्हिएन्ना, ऑस्ट्रिया.

👉आशिया जलतरण महासंघ (AASF) – स्थापना वर्ष: 1978; मुख्यालय: मस्कट, ओमान.

Latest post

ठळक बातम्या.१५ एप्रिल २०२५.

१. भारत - हवाई लक्ष्यांवर हल्ला करून ते नष्ट करू शकणाऱ्या उच्च-ऊर्जा लेसर-निर्देशित (DEA) शस्त्र प्रणालीची यशस्वी चाचणी घेणारा भारत जगातील च...