२४ डिसेंबर २०१९

इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर

📛निरनिराळ्या कारणांमुळे इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात भारत आघाडीवर असल्याची माहिती समोर आली आहे.

📛यावर्षी देशातील निरनिराळ्या भागांमध्ये विविध कारणांमुळे 95 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली होती.

📛नागरिकत्व सुधारणा कायदा लागू झाल्यानंतर त्या विरोधात देशातील अनेक भागांमध्ये आंदोलन करण्यात येत आहे.

📛त्यानंतरही कोणत्याही प्रकारची अफवा पसरू नये यासाठी देशाच्या काही भागांमध्ये इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

📛इंटरनेट सेवा बंद ठेवण्याच्या निर्णयामुळे मोठं आर्थिक नुकसान झाल्याची माहिती ‘इंडियन कौन्सिल फॉक रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक रिलेशन्स’सोबतच दोन थिंक टँकनं सादर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.

📛2012 पासून आतापर्यंत देशभरात 367 वेळा इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आली आहे.

📛2018 मध्ये जगभरातील इंटरनेट सेवेच्या बंदच्या प्रकरणांपैकी तब्बल 67 टक्के प्रकरणं ही भारतातील आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

19 april महत्त्वपूर्ण चालू घडामोडी MCQ

१. कोणत्या राज्यात अलीकडेच उत्खननामुळे सर्वात उंच जैन मूर्ती धोक्यात आली ? अ. राजस्थान / राजस्थान बी. कर्नाटक C. मध्य प्रदेश D. तेलंगणा उत्त...