२९ ऑगस्ट २०१९

दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत बुमराह ठरला अव्वल

✍विंडीज विरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाने आपली पकड मजबूत बसवली आहे. पहिल्या डावात फलंदाजी करताना भारताने 297  धावांपर्यंत मजल मारली. यानंतर इशांत शर्मा आणि इतर भारतीय गोलंदाजांच्या भेदक
माऱ्याच्या जोरावर भारताने विंडीजला 222  धावांमध्ये गारद केलं. इशांत शर्माने विंडीजचा निम्मा संघ गारद केला.

✍तर त्याला मोहम्मद शमी आणि रविंद्र जाडेजाने प्रत्येकी 2-2 तर जसप्रीत बुमराहने 1 बळी घेत चांगली साथ दिली.जसप्रीत बुमराहने मात्र केवळ एक बळी मिळवत दिग्गज गोलंदाजांना मागे टाकत अव्वल स्थान पटकावलं आहे.

✍कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी सामने खेळून सर्वात जलद 50 बळींचा टप्पा गाठणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह अव्वल स्थानावर पोहचला आहे. त्याने 11 व्या सामन्यात ही कामगिरी करुन दाखवली.

✍तसेच बुमराहने वेंकटेश प्रसाद आणि मोहम्मद शमी  यांच्या नावावर संयुक्तपणे असलेला 13 सामन्यांचा विक्रम मोडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

महत्वाचे प्रश्न

    भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते ? – कर्नाळा (जिल्हा रायगड) 🔸भारतातील पहिले वृत्तपत्र कोणते ? – ‘द बेंगाल गॅझेट ‘ (१७८०) 🔹भारतातील ...