यशाचा राजमार्ग
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
०६ जून २०२६
राज्यांचे मुख्यमंत्री व राज्यपाल
आधुनिक भारताचा इतिहास-महत्वाच्या संस्था/समाज/पुस्तके/ग्रंथ/इतर
पंचायती राज Oneliners
अलीकडील महत्त्वाची पुस्तके व लेखक
२८ मे २०२६
भारताची राज्यघटना 200 प्रश्न आणि उत्तर
अधिक माहितीसाठी नक्की पहा : www.yashacharajmarg.com
1.राज्यसभेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात?
1. राष्ट्रपती
2. महान्यायवादी
3.उपराष्ट्रपती✅
4.पंतप्रधान
2. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकारणाचा अध्यक्ष कोण असतो?
1.पोलीस अधीक्षक
2.जिल्हाधिकारी✅
3.मुख्य कार्यकारी अधिकारी
4.पालकमंत्री
3.महाराष्ट्रातून लोकसभेत किती सदस्य निवडून जातात?
1.46
2. 48✅
3.50
4 44
4.मतदारासाठी आवश्यक पात्रता वय 21 वरुन 18 वर्षे कोणत्या घटनादुरुस्तीने करण्यात आले?
1.61 वी✅
2. 62 वी
3.71 वी
4.81 वी
5.नव्या कायद्याच्या प्रस्तावाला काय म्हणतात?
1.ठराव
2. अध्यादेश
3.वटहुकूम
4.विधेयक✅
6.भारत सरकारचा प्रमुख कायदेशीर सल्लागार कोण असतो?
1.भारताचा नियंत्रक व महालेखापाल
2.सर्वाच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश
3.भारताचा महान्यायवादी✅
4. Ad. जनरल
7.संसदेचे कायमस्वरूपी सभागृह कोणते?
1.लोकसभा
2.राज्यसभा✅
3.विधानसभा
4.विधानपरिषद
8.भारतातील भाषिक तत्वावर निर्माण झालेल पहिलं राज्य कोणतं?
1.पंजाब
2.महाराष्ट्र
3.गुजरात
4 आंध्रप्रदेश✅
9.कोणत्या घटकराज्यात विधानपरिषद अस्तित्वात नाही?
1.महाराष्ट्र
2.कर्नाटक
3.गुजरात✅
4. केरळ
10.राज्यघटना दुरुस्तीची पद्धत कोणत्या कलमामध्ये स्पष्ट करण्यात आली आहे?
1. 361
2.368✅
3.371
4.378
1. खालीलपैकी कोणत्या मार्गदर्शक तत्त्वाचे मूलभूत अधिकारात रुपांतर झाले आहे?
१.काम करण्याचा अधिकार
२.माहिती अधिकार
३.चांगल्या पर्यावरणाचा अधिकार
४.शिक्षणाचा अधिकार✅
2. सरपंचा विरुद्ध चा अविश्वास ठराव दोन तृतीयांश बहुमत न मिळाल्याने संमत झाला नाही तर पुढीलपैकी काय होऊ शकते?
१.अविश्वास ठराव पुन्हा सहा महिन्यांच्या आत आणता येतो
२.अविश्वास ठराव पुन्हा आणताच येत नाही
३.एक वर्षानंतर त्याच सरपंचा विरुद्ध अविश्वास ठराव मांडता येतो✅
४.सरपंचाला विवाद अर्ज उच्च न्यायालयात सादर करता येतो
3. महाराष्ट्राच्या रचनेनंतर इ. स. १९६० या वर्षी महाराष्ट्र राज्य विधानसभेचे अध्यक्ष कोण होते?
१.श्री ग मवळकर
२.श्री त्र्य शि भारदे
३.श्री स ल सिलम✅
४.श्री के कृ वानखेडे
4. 'नेमो डिबेट ई इंडेक्स इन प्रोप्रिया क्वाझा' (Nemo Debet Esse Index In Propria Causa) या लॅटिन माक्झिम चा पुढीलपैकी के अर्थ आहे?
१.राजा कधीही चूक करत नाही
२.कोणतीही व्यक्ती स्वतः च्या प्रकरणात न्यायाधीश असू शकत नाही✅
३.बाजू मांडण्याची संधी दिल्या शिवाय कोणत्याही व्यक्तीला शिक्षा देण्यात येणार नाही
४.जो ऐकेल तोच निर्णय देईल
5.भारतीय संसदेतील स्थायी समितीची महत्वाची कार्ये कोणती?
अ)शासकीय कार्याचे निःपक्षपाती परीक्षण
ब)कामगिरी चे मूल्यमापन व देखरेख
क)राज्यशासनाच्या कार्यांचे मूल्यमापन
ड)पुरवणी अंदाजाचे परीक्षण
१.अ, ब आणि क
२.अ, ब आणि ड✅
३.अ, क आणि ड
४.ब, क आणि ड
6.राज्यघटनेच्या मसुद्यावर 'वकिलांचे नंदनवन' अशी टीका केली जाते, त्याची कारणे कोणती आहेत?
१.मसुद्याची भाषा केवळ न्यायालयांना च परिचित आहे
२.तरतुदी मागील धनव्यर्थ केवळ अनुभवी व घटनात्मक कायद्यात पारंगत व्यक्तीला च समजू शकतो
३.मसुदा लोकांना सत्या पासून दूर नेतो म्हणतात
४.मसुदा समितीतील सात पैकी तीन सभासद त्या काळातील कायदे तज्ञ होते✅
7. भारतीय संविधानाच्या १० व्या परिशिष्टां नुसार एखादा सदस्य अपात्र आहे किंवा नाही हे ठरविण्याचा अधिकार पुढीलपैकी कोणाला आहे?
अ)राज्यसभेचे अध्यक्ष
ब)लोकसभेच सभापती
क)भारताचे राष्ट्रपती
ड)सर्वोच्च न्यायालय
१.अ, ब, क
२.अ, ब,क, ड
३.अ, ब✅
४.अ, ब, ड
8.वार्षिक केंद्रीय आर्थिक अंदाजपत्रकला लोकसभेची मंजुरी न मिळाल्यास
१.अंदाजपत्रक दुरुस्ती करून फेरसदर केले जाते
२.राज्यसभेचा अभिप्राय घेण्याकरिता ठेवले जाते
३.राष्ट्रपतींच्या अभिप्रायासाठी पाठवले जाते
४.पंतप्रधान व मंत्रिमंडळाला राजीनामा द्यावा लागतो✅
9. खालीलपैकी कोणत्या राज्याने नव्याने विधानपरिषदेची स्थापना केली आहे?
१.महाराष्ट्र
२.राजस्थान
३.जम्मू काश्मीर
४.आंध्र प्रदेश✅
10. संसद अधिवेशन चालू नसताना शासनाला नैसर्गिक संकटावर झालेला खर्च कशातून भागवता येतो?
१.आकस्मिक निधी
२.सांचीत निधी
३.भविष्य निर्वाह निधी✅
४.यापैकी नाही
1.कोणत्या घटना दुरुस्ती द्वारे राष्ट्रपती ना मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार वागणे बंधनकारक आहे?
१.४२ वी घटना दुरुस्ती ✅
२.४४ वी घटना दुरुस्ती
३.24 वी घटना दुरुस्ती
४.५२ वी घटना दुरुस्ती
2.१९३५ च्या कायद्यांत कशाची तरतूद होती?
१.प्रौढ मताधिकर
२.साम्राज्यांर्गत शासनाधिकार
३.सापेक्ष स्वायत्तता
४.प्रांतिक स्वायत्तता✅
3.संविधानाच्या प्रारंभी भारताचा नागरिक होण्याकरिता कोणती अट आवश्यक नव्हती?
१.भारतात अधिवास आणि
२.भारतात जन्म किंवा
३.माता व पितांचा भारतात जन्म किंवा✅
४.अशा प्रारंभ पूर्वी किमान ५ वर्षे भारतात सामान्यतः निवास
4.खालीलपैकी कोणत्या न्यायालयीन निर्णया द्वारे प्रास्ताविका ही घटनेचा भाग नाही असे प्रतिपादन करण्यात आले?
१.बेरुबाली खटला ✅
२.गोलाखनाथ खटला
३.केशवानंद भारती खटला
४.बोम्मई विरुद्ध भारताचे संघराज्य
5.घटनेच्या कलम ८२ मधील सध्याच्या तरतुदी प्रमाणे, राज्या-राज्यामध्ये लोकसभेच्या जागांचे समायोजन यापुढे कोणत्या वर्षा नंतर होऊ शकते?
१.२०१८
२.२०२१
३.२०२६✅
४.२०३१
6.भारताचे कोणते मुख्य न्यायाधीश होते ज्यांनी काही काळ प्रभारी राष्ट्रपती पदाची जबाबदारी सांभाळली?
१.एम सी छागल
२.एम हिदायतुल्ला✅
३.वाय चंद्रचूड
४.यापैकी नाही
7.भारताचे राष्ट्रपती म्हणून कोणाचा कालावधी सर्वात कमी होता?
१.डॉ सर्वपल्ली राधाकृष्ण
२.डॉ झाकीर हुसेन✅
३.श्री व्ही व्ही गिरी
४.डॉ फकरुद्दी अली महंमद
8.ऍमिकस कुरी हे संबोधन कशासाठी वापरतात?
१.न्यायालयाचा मित्र वकिल✅
२.न्यायालयाचा संदेशवाहक
३.नायलायचा एक पगारी अधिकारी
४.न्यायालयाचे एक ब्रिटिशकालीन नामाभिधान
9.महाराष्ट्र स्थापनेचा सुवर्ण महोत्सव कोणत्या वर्षी साजरा करण्यात आला?
१.२०००
२.२००५
३.२०१०✅
४.२०११
10.भारतातील भाषावार प्रांतरचनेच्या प्रक्रियेत खालीलपैकी कोणत्या भागाचा अधिक पुढाकार होता?
१.मराठवाडा
२.आंध्र प्रदेश ✅
३.महाराष्ट्र
४.कर्नाटक
1. 'मार्गदर्शक तत्वे कोऱ्या चेकप्रमाणे आहेत ज्यांचे वटवणे बँकेच्या इच्छेवर सोडलेले आहे' असे कोणी म्हटले आहे?
१.डॉ बी आर आंबेडकर
२.प्रो के टी शहा✅
३.एन जी रंगा
४.बी एन राव
2. भारतीय संविधानाने नागरिकांना आर्थिक न्यायाची खात्री कशाद्वारे दिली आहे?
१.उद्देशपत्रिका✅
२.मूलभूत अधिकार
३.मूलभूत कर्तव्ये
४.राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक तत्वे
3. आंतरराज्यीय नद्या व नद्या खोरे विवादाबाबत खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
१.संसद कायदा करून आंतरराज्यीय नदी अथवा नदी खोऱ्यामधील पाणी वापर, वाटप अथवा नियंत्रण याबाबत तरतूद करू शकते.
२.संसद कायदा करून आशा आंतरराज्यीय जल विवादाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे अधिकार बंदीत करू शकत नाही✅
३.संसद कायद्याद्वारे उच्चन्यायालयाच्या अथवा इतर कनिष्ठ न्यायालयाच्या अधिकार क्षेत्रातून हा विषय वगळण्याची तरतूद करू शकते
४.महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांमधील कृष्णा पाणीवाटप लवाद हा राज्य घटनेच्या कलम २६२ च्या तरतुदी नुसार जाहीर करण्यात आला आहे.
4. खालीलपैकी कोणती/कोणत्या संस्था वैधानिक नाहीत?
अ.राष्ट्रीय विकास परिषद
ब.विद्यापीठ अनुदान आयोग
क.नियोजन आयोग
ड.केंद्रीय दक्षता आयोग
१.फक्त अ
२.अ आणि ब
३.अ आणि क✅
४.ब आणि ड
5.भारतीय राज्यघटनेच्या कलम १२ नुसार "राज्य" या संज्ञेत खालीलपैकी कोणती संस्था/यंत्रणा अंतर्भूत होत नाही?
१.विधानसभा
२.विधानपरिषद
३.उच्च न्यायाल✅
४.जिल्हा परिषद
6. राज्य मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्ष पदी पुढीलपैकी कोण असू शकते?
१.जे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते
२.जे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते
३.जे उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते✅
४.जे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते
7.भारतीय संविधानात अनुछेद ३७१ काय सांगतो?
१.जम्मू व काश्मीर बाबत विषय तरतूद
२.केवळ उत्तम पूर्व भागाकरिता विशेष तरतुदी
३.निव्वळ हैदराबाद राज्यकरिता विशेष तरतूद
४.विविध राज्यांकर्ता विशेष तरतुदी✅
8. संविधानाच्या प्रारंभी आंग्ल भारतीय समाजातील व्यक्तींच्या नियुक्त्या १५ ऑगस्ट १९४७ पूर्वीप्रमाणेच पुढीलपैकी कोणत्या विभागात केल्या जात होत्या?
अ. रेल्वे
ब.सीमाशुल्क
क.आयकर
ड. डाक व तार
१.अ ब आणि क
२.ब क आणि ड
३.अ ब आणि ड✅
४.अ क आणि ड
9. भारतीय राज्यघटनेची उद्देश पत्रिका प्रथमतः केव्हा दुरुस्त करण्यात आली?
१.१९५२
२.१९६६
३.१९७६✅
४.१९८६
10. ए के क्रयपाक विरुद्ध केंद्र (AIR 1970 S. C. 150) च्या खटल्या मध्ये खालीलपैकी कोणता मुद्दा होता?
१.आर्थिक पक्षपात
२.वैयक्तिक पक्षपात✅
३.विषय पक्षपात
४.वरील सर्वच
1. खालीलपैकी कोणत्या भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्य वरून असे निदर्शनास येते की, वास्तविक कार्यकारी सत्ता पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली कार्य करणाऱ्या मंत्रिमंडळाच्या हातात आहे?
१.प्रातिनिधिक लोकशाही
२.अध्यक्षीय लोकशाही
३.सांसदीय लोकशाही✅
४.प्रत्यक्ष लोकशाही
2. "आम्ही त्यांना कोणतीही वास्तविक सत्ता दिली नाही, पण आम्ही त्यांचे स्थान अधिकाराचे आणि प्रतिष्टेचे केले आहे" राष्ट्रपतींच्या स्थानाबाबत असे कोण म्हणाले?
१.पंडित जवाहरलाल नेहरू✅
२.डॉ बाबासाहेब आंबेडकर
३.के एम मुन्शी
४.डॉ राजेंद्र प्रसाद
3. राष्ट्रपतींच्या दयेच्या अधिकारसंबंधी प्रतिपादन केलेल्या पुढील विधनातील अयोग्य विधान कोणते?
१.कोर्ट मार्शल द्वारा देण्यात आलेल्या शिक्षेस हा अधिकार लागू पडत नाही✅
२.राष्ट्रपती या अधिकाराचा वापर मंत्री परिषदेच्या सल्ल्याने च करतात
३.राष्ट्रपतींच्या या अधिकाराच्या वापराचे न्यायालयीन पुनर्विलोकन करता येत नाही
४.घटनेच्या कलम ७२ नुसार या अधिकाराचा वापर करताना विशिष्ट मार्गदर्शक तत्वे मांडण्याची गरज नाही
4. भारतात खालीलपैकी कोणत्या परिस्थितीत प्रशासकीय अधिकाऱ्याने बजावलेल्या स्वेच्छानिर्णय अधिकाऱ्यांचे न्यायिक पुनर्विलोकन होऊ शकते?
१.प्रशासकीय निर्णयाची योग्यता बघण्यासाठी
२.साक्षी पुराव्याची योग्यता पुन्हा पडताळणीसाठी
३.निर्णय प्रक्रिया बरोबर झाली की नाही हे पडताळण्यासाठी✅
४.वरीलपैकी एक ही नाही
5. पुढील राज्यांचा निर्मिती नुसार क्रम लावा.
१.झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड
२.उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड
३.छत्तीसगड, झारखंड, उत्तराखंड
४.छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड✅
6. यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री कोण होते?
१.मोरारजी देसाई
२.वसंतराव नाईक
३.मारोतराव कन्नमवार✅
४.शंकरराव चव्हाण
7.खालीलपैकी कोण राज्यपाल आणि मंत्री परिषद यातील दुवा म्हणून भूमिका बजावतात?
१.राज्यपाल
२.मुख्यमंत्री✅
३.मूख्य सचिव
४.राज्य सरकार
8. काही राज्य कायदेमंडळे द्विगृही आहेत. त्यांच्यामध्ये विधेयक पारित करण्या संदर्भात असहमती असल्यास, कोणता पर्याय उपलब्ध असतो?
१.राज्यपाल दोन्ही सदनांची संयुक्त बैठक बोलावतात आणि त्यामध्ये बहुमताने जो निर्णय होईल तो मान्य होतो
२.राज्यपालांचा निर्णय अंतिम असतो
३.विशिष्ट मुदत संपल्यानंतर विधानसभेचा निर्णय अंतिम असतो✅
४.सादर बाब निर्णयासाठी राष्ट्रपती कडे पाठवली जाते
9. कोणत्या राज्यांना ७३ व्या घटनादुरुस्तीतील तरतुदी पासुन सूट देण्यात आली आहे?
अ)मिझोराम
ब)मेघालय
क)नागालँड
ड)अरुणाचल प्रदेश
१.अ, ब, क✅
२.ब, क, ड
३.क, ड, अ
४.ड, अ, ब
10. शिक्षणच्या व्यवसायिकर्णावर कोणत्या समितीने भर दिला?
१.कोठारी समिती
२.बोगीरवर समिती
३.चटोपाध्यय समिती✅
४.बळवंत राय मेहता समिती
1. भारतीय राज्यघटनेत ५२ वी घटनादुरुस्ती कोणत्या हेतूने करण्यात आली?
अ)पक्षांतरला आळा घालणे
ब)मतदारांची वयोमर्यादा वाढवणे
क)निवडणूक प्रक्रियेत बदल करणे
ड)निवडणूक आयोगा बहू सदस्यीय करणे
१.फक्त अ✅
२.अ आणि ब
३.अ ब क
४.अ ब ड
2. निवडणूक आयोगाच्या भूमिकेशी विसंगत असलेल्या विधानाची निवड करा.
अ)मतदारसंघांची आखणी करणे
ब)राजकीय पक्षांना मान्यता देने
क)उमेदवाराच्या निवडणूक खर्चास पूर्ण मोकळीक देणे
ड)देशभरातील निवडणूका सुरळीत पार पाडणे
१.अ आणि क✅
२.अ आणि ब
३.ब आणि ड
४.अ आणि ड
3. भारतीय संविधानाच्या कोणत्या भागात "कायद्याचे राज्य" या तत्वाचा समावेश केला आहे?
अ)संविधानाची प्रस्तावना
ब)भाग lll मूलभूत हक्क
क)भाग IV-A मूलभूत कर्तव्ये
१.अ आणि ब फक्त✅
२.अ, ब आणि क
३.ब आणि क
४.वारीपैकी कोणताही नाही
4. प्रशासनिक न्यायाधिकरण....
नुसार अस्तित्वात येतात?
१.विभाग
२.प्रशासन
३.कायदा✅
४.न्यायपालिका
5. नैसर्गिक न्यायचा नियम...... ला लागू होत नाही?
१.कायदे करण्या संबंधी कायदेमंडळची कृती✅
२.न्यायालय विषयक कृती
३.प्रशासकीय कृती
४.वरीलपैकी एक ही नाही
6. विभाग प्रमुखाच्या परवानगीशिवाय खालीलपैकी कोणत्या मुद्द्यावर राज्यातील कार्यालयीन अप्रकाशित नोंदींवर आधारित पुरावा देता येत नाही?
१.विभागीय धोरण
२.सार्वजनिक धोरण✅
३.अधिकारीय धोरण
४.वरीलपैकी काही नाही
7. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम, १९८९ अंतर्गत जास्तीत जास्त शिक्षा कोणती आहे?
१.पाच वर्षे व दंड
२.सात वर्षे व दंड
३.जन्मठेप
४.मृत्यूदंड✅
8. संघ लोकसेवा आयोग राष्ट्रपतींना पुढील बाबींवर सल्ला देतो.
अ)नागरी सेवा आणि पदांच्या भरती पद्धतीन संदर्भातील बाबी
ब)भारत सरकारच्या अधीन काम करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या अनुशासना बाबत ची प्रकरणे
क)एका वर्षांपेक्षा अधिक कालावधीच्या तात्पुरत्या स्वरूपात करण्यात आलेल्या नेमणुका व त्यासंबंधी ची नियमितता
ड)सनदी सेवा आणि पदांवरील नेमनुकसाठी अनुकराव्याच्या तत्वा संबधी
१.अ आणि ब
२.ब आणि क
३.अ, ब आणि क
४.अ, ब, क आणि ड✅
9. खालीलपैकी भारतीय रिजर्व बँकेचे गव्हर्नर कोण नव्हते?
१.सी रंगराजन✅
२.मनमोहन सिंग
३.डॉ डी सुबाराव
४.नरेंद्र जाधव
10. लोकलेखा समितीवर शासनाचे किती प्रतिनिधी नेमलेले असतात?
१.एक
२.दोन
३.तीन
४.एकही नाही✅
1. भारतातील घटनादुरुस्ती प्रक्रियेविषयी कोणते विधान अयोग्य आहे?
१.घटनादुरुस्ती विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात सादर करता येते
२.घटनादुरुस्ती विधेयकाला संमती राष्ट्रपतींना घ्यावीच लागते
३.घटनादुरुस्ती विधेयक सादर करण्यापूर्वी राष्ट्रपतींची संमती आवश्यक असते✅
४.घटनादुरुस्ती विधेयकसबंधी संसदेच्या दोन्ही सभागृहात असहमती निर्माण झाल्यास संयुक्त अधिवेशन बोलावण्याची तरतूद नाही
2. भारतीय संविधानाच्या प्रस्ताविकेतील 'सार्वभौम' या संकल्पनेतून खालीलपैकी कोण कोणता अर्थ ध्वनित होतो?
अ)बाह्य हस्तक्षेपविना भारत स्वतः शी निगडित निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो
ब)संघ आणि घटकराज्ये दोन्ही सार्वभौम आहेत
क)भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो
ड)भारताच्या संघाकडे राष्ट्रीय प्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत
१.ब, क, ड
२.अ, ब, क
३.अ, क, ड✅
४.अ, ब, ड
3. खलील विधान वाचून अचूक पर्याय निवडा.
विधी मंत्रालयाने तयार केलेला मसुदा कच्चा असल्याचे कारण देत प्रतिबंधात्मक स्थानबद्दता वाढवणारे विधेयक मे १९९७५ मध्ये सभापतींना विरोधकांनी रद्द करण्याची आवश्यकता पटवून दिली. अशा उदाहरणांचे वर्णन कशा प्रकारे केले जाते?
१.विधिमंडळाची सक्रियता
२.अंत्यतिक विधीवाध✅
३.कार्यकारी मंडळाची सक्रियता
४.प्रशासकीय सक्रियता
4. लोकसभेत अनुसुचित जाती व अनुसूचित जनजाती याच्याकरता जागा राखून ठेवण्या संदर्भात कोणत्या राज्यकरिता वेगळी तरतूद आहे?
१.केवळ आसाम करीता✅
२.केवळ जम्मू व काश्मीर करिता
३.वरील दोन्ही करिता
४.वरील कोणाही करीत नाही
5. घटनेमध्ये मूलभूत कर्तव्यंचा समावेश.... च्या शिफारशी वरून करण्यात आला?
१.वल्लभभाई पटेल समिती
२.कृपलानी समिती
३.सरकारिया आयोग
४.स्वर्णसींग समिती✅
6. भारतीय संविधानाच्या १९ (१) व्या कलमात खालीलपैकी कोणत्या स्वातंत्र्याचा विशेषत्वाने समावेश नाही?
१.भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
२.मुद्रण स्वतंत्र्य ✅
३.भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार स्वतंत्र
४.विनाशस्त्र व शांतपणे एकत्र जमण्याचे स्वतंत्र
7. खालीलपैकी कोणते विषय घटनेच्या समवर्ती सूचित अंतर्भूत आहेत?
अ)शिक्षण
ब)व्ययसाय कर
क)वजन माप मानके (प्रमाण)
ड)वजन
ई)वने
१.अ, ड, इ✅
२.अ, ब, क
३.सर्व
४.एकही नाही
8. खालीलपैकी कोणत्या दाव्यात 'ध्वनी क्षेपकाच्या वापरावर सार्वजनिक आरोग्यासाठी मर्यादा हे कायदेशीर कारण आहे' असे सर्वोच्च न्यायालयाने निकालात म्हटले आहे?
१.स्टेट ऑफ राजस्थान विरुद्ध जी चावला
२.हिम्मतलाल विरुद्ध पोलीस कमिशनर✅
३.कृष्ण गोपाळ विरुद्ध स्टेट ऑफ एम पी
४.धनलाल विरुद्ध आय जी पोलीस बिहार
9. संसदेच्या कामकाजाच्या भाषेबाबत कोणते विधान खरे आहे?
अ)संसदेचे कामकाज हिंदीतून चालवण्यात येते
ब)संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवण्यात येते
क)संविधानाच्या प्रारंभी संसदेचे कामकाज हिंदीतून किंवा इंग्रजीतून चालवता येत होते
ड)सभापती/अध्यक्ष त्यांच्या अनुज्ञेने सदस्य आपल्या मातृभाषेत भाषण करू शकतो
१.अ, क
२.ब, ड
३.फक्त ब
४.फक्त अ✅
10. खलील दोन विधानांपैकी कोणते अयोग्य आहे?
अ)आतापावेतो नियमित राष्ट्रपती म्हणून डॉ झाकीर हुसेन यांचा कार्यकाल सर्वात कमी राहिला
ब)डॉ झाकीर हुसेन व श्री फकरुद्दीन हेच दोघे केवळ त्यांचा राष्ट्रपती म्हणून त्यांचा कार्यकाल पूर्ण करू शकले नाहीत
१.फक्त अ
२.फक्त ब✅
३.दोन्ही नाही
४.दोन्हीही
ग्रामसेवक / सचिव.
🅾️नमणूक : मुख्य कार्यकारी अधिकारी
🅾️नजीकचे नियंत्रण : गट विकास अधिकारी
🅾️कर्मचारी : ग्रामविकास खात्याचा वर्ग-3 चा
1. ग्रामपंचायतीचा सचिव म्हणून काम करतो.
2. ग्रामपंचायतीचे दफ्तर सांभाळणे
3. कर्मचार्यांवर नियंत्रण ठेवणे.
4. ग्रामपंचायतीचा अहवाल पंचायत समिती व जिल्हा परिषदेला देणे.
5. व्हिलेज फंड सांभाळणे.
6. ग्रामसभेचा सचिव म्हणून काम पाहणे.
7. ग्रामपंचातीच्याबैठकांना हजर राहणे व इतिबृत्तांत लिहणे.
8. गाव पातळीवर बाल विवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून काम करणे.
9. जन्म-मृत्यूची नोंद करणे.
1. कृषी
2. समाज कल्याण
3. जलसिंचन
4. ग्राम संरक्षण
5. इमारत व दळणवळण
6. सार्वजनिक आरोग्य व दळणवळण सेवा
7. सामान्य प्रशासन
🅾️गरामसभा : मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार निर्मिती करण्यात आली आहे.
🅾️बठक : आर्थिक वर्षात (26 जानेवारी, 15 ऑगस्ट, 2 ऑक्टोंबर)
🅾️सभासद : गावातील सर्व प्रौढ मतदार यांचा समावेश होता.
🅾️अध्यक्ष : सरपंच नसेल तर उपसरपंच
🅾️गरामसेवकाची गणपूर्ती : एकूण मतदारांच्या 15% सभासद किंवा एकूण100 व्यक्तींपैकी जी संख्या कमी असेल.
यशाचा राजमार्ग प्रश्नसंच
1) महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस पडणारा जिल्हा?
उत्तर- सोलापूर
2) महाराष्ट्रातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा जिल्हा कोणता?
उत्तर- अहमदनगर
3) जागतिक योग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 21 जून
4) पानिपतचे तिसरे युद्ध कोणत्या वर्षी झाले?
उत्तर- 1761
5) कोणत्या तारखेस घटना समितीने राष्ट्रीय ध्वज स्विकृत केला?
उत्तर- 22 जुलै 1947
6) वाफेवर चालणाऱ्या इंजिनाचा शोध कोणी लावला?
उत्तर-जेम्स वॅट
7) भारतीय पोलीस प्रशिक्षण अकादमी कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- तेलंगणा
8) अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर-औरंगाबाद
9) अहिराणी भाषेतील जगप्रसिद्ध कवयित्रि कोण आहेत?
उत्तर- बहिणाबाई चौधरी
10) डेसीबल या एककाने काय मोजतात ?
उत्तर- ध्वनीची तीव्रता
11) लोणार हे उल्काजन्य सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- बुलढाणा
12) तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे हा रोग होतो?
उत्तर- कर्करोग
13) डोळ्याच्या आरोग्यासाठी हे जीवनसत्व महत्त्वाचे आहे?
उत्तर- ए
14) महाराष्ट्रातला पहिला सोने शुद्धीकरण कारखाना या ठिकाणी आहे?
उत्तर- शिरपूर
15) उत्तर महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण कोणते?
उत्तर- तोरणमाळ
16) सर्वाधिक शहरी लोकसंख्या कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र
17) जागतिक महिला दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
उत्तर- 8 मार्च
18) डायलीसिस उपचार कोणत्या आजारात करतात?
उत्तर- मूत्रपिंडाचे विकार
19) कोवळ्या सूर्यप्रकाशापासून कोणते जीवनसत्व मिळते?
उत्तर- ड
20) महाराष्ट्र पठाराची निर्मिती कशाने झाली आहे?
उत्तर- भ्रंशमूलक उद्रेक
21) अर्ध मॅरेथॉन चे अंतर किती असते?
उत्तर- 21 कि.मी
22) भारताच्या राष्ट्रध्वजाची उंची आणि लांबी यांचे प्रमाण किती आहे?
उत्तर- 2:3
23) अन्नपदार्थाची ऊर्जा कोणत्या परिमाणात मोजली जाते?
उत्तर- कॅलरीज
24) इन्सुलिन हे प्राण्यांच्या कोणत्या अवयवामध्ये स्रवणारे संप्रेरक आहे?
उत्तर- स्वादुपिंड
25) हेलसिंकी हे शहर कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- फिनलंड
26) करा किंवा मरा हा मंत्र भारतास कोणी दिला?
उत्तर- महात्मा गांधी
27) मध्य रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे?
उत्तर- मुंबई
28) भारताचे तिनही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती
29) सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली झालेले चिपको आंदोलन कोणत्या कारणासाठी लढले गेले?
उत्तर- वृक्षतोड विरोधी आंदोलन
30) अणुऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती?
: उत्तर- डॉक्टर होमी जहांगीर भाभा
31) जयपूर फूट चे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते?
सर): उत्तर- डॉक्टर प्रमोद सेठी
32) भारतातील सर्व संरक्षण दलाचे सरसेनापती कोण असतात?
उत्तर- राष्ट्रपती
33) पायराईट हे कशासारखे दिसते म्हणून त्याला फूल्सगोल्ड म्हणून ओळखले जाते?
उत्तर- सोन्यासारखे
34) इन्डोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे?
उत्तर- कीडनाशक
35) रक्ताच्या कर्करोगासाठी कोणती संज्ञा लागू होते?
उत्तर- ल्युकेमिया
36) महाराष्ट्रात पंचायत राज पद्धती स्विकारण्यासंबंधी नेमले गेलेली समिती कोणती आहे?
उत्तर- वसंतराव नाईक समिती
37) गावाच्या पिकाची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो?
तलाठी
38) पंचायतराज ही मूळ संकल्पना कोणाची आहे?
उत्तर- महात्मा गांधी
39) परम-8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला?
उत्तर- डॉक्टर विजय भटकर
40) भारतातील कोणत्या उद्योगाला सनराईजक्षेत्र म्हणून ओळखले जाते?
उत्तर- वाहन
41) वि.वा शिरवाडकरांचे टोपण नाव कोणते?
उत्तर- कुसुमाग्रज
42) संयुक्त राष्ट्र संघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- न्यूयॉर्क
43) बुलढाणा जिल्ह्यात किती तालुके आहेत?
उत्तर- 13
44) माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- रायगड
45) सिद्धटेक हे अष्टविनायक गणपती चे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- अहमदनगर
46) केवलादेव राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- राजस्थान
47) विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर- कोल्हापूर
48) ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे?
उत्तर- ऑस्ट्रेलिया
49) कोटोपेक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे?
उत्तर- इक्वेडोर
50) अनातोलिया चे पठार कोणत्या देशात आहे?
उत्तर- तुर्कस्तान
51) झुलू जमात कोठे आढळते ?
उत्तर- दक्षिण आफ्रिका
52) सुएझ कालवा कोणत्या दोन महासागरांना जोडतो?
उत्तर- भूमध्य सागर व लाल सागर
53) कृष्णा नदीचे उगमस्थान कोणत्या राज्यात आहे?
उत्तर- महाराष्ट्र
54) शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे?
उत्तर- कावेरी
55) भारतीय रेल्वेचे दक्षिण-मध्ये झोनचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे?
उत्तर- सिकंदराबाद
56) बुडापेस्ट कोणत्या देशाची राजधानी आहे?
उत्तर- हंगेरी
57) अजिंठा -वेरूळ येथील कैलास मंदिर कोणत्या वंशाच्या राज्यकर्त्यांच्या काळात निर्माण केले आहे?
उत्तर- राष्ट्रकूट
58) सन 1885 मधील राष्ट्रीय सभेच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते?
उत्तर- व्योमेशचंद्र बॅनर्जी
59) 1905 मध्ये लंडन येथे इंडिया होमरूल सोसायटीची स्थापना कोणी केली?
उत्तर- श्यामजी कृष्णा वर्मा
60) फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना कोणी केली?
उत्तर- सुभाषचंद्र बोस
61) मराठा आणि केसरी या वृत्तपत्राशी कोण संबंधित आहे?
: उत्तर- लोकमान्य टिळक
62) कोणत्या कायद्यान्वये भारताचा राज्यकारभार ईस्ट इंडिया कंपनीकडून महाराणी (क्राऊन) कडे गेला?
: उत्तर- भारत सरकार अधिनिय 1858
63) मोर्ले-मिंटो सुधारणा कोणत्या वर्षाच्या कायद्याशी संबंधित आहे?
: उत्तर- 1909
64) पहिल्या गोलमेज परिषदेचे वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते?
: उत्तर- लॉर्ड आयर्विन
65) महात्मा गांधी यांची दांडी यात्रा कोणत्या आंदोलनाशी संबंधित आहे?
: उत्तर- सविनय कायदेभंग
66) poverty and Un-british Rule in india चे लेखक कोण आहेत?
: उत्तर- दादाभाई नौरोजी
67) पुर्ण स्वराज्य दिवस सर्वप्रथम कोणत्या वेळी साजरा करण्यात आला?
: उत्तर- 26 जानेवारी 1930
68) भारतीय घटना समितीच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते?
: उत्तर- डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर
69) राज्य पुर्नरचना आयोग 1953 चे अध्यक्ष कोण होते?
: उत्तर- फाजलअली
70) मूलभूत अधिकाराचा समावेश घटनेच्या कोणत्या भागात केला आहे?
: उत्तर- 3
71) भारतीय राज्यघटनेचे कलम 25 कशाशी संबंधित आहे?
: उत्तर- धर्मस्वातंत्र्याचे अधिकार
72) कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला?
: उत्तर- स्वर्णसिंह समिती
73) भारतीय राज्यघटनेचे कोणते कलम राष्ट्रपतीचे अध्यादेशाशी संबंधित आहे?
: उत्तर- कलम 123
74) संसदेच्या लोकलेखा समिती मध्ये जास्तीत जास्त किती सदस्य असतात?
: उत्तर- 22
75) केंद्र व राज्य यांच्यातील संबंधाविषयी घटनेच्या कोणत्या प्रकरणात तरतूद आहे?
: उत्तर- 11
76) जागतिक अपंग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
: उत्तर- 3 डिसेंबर
77) हंबनटोटा बंदर कोणत्या देशात आहे?
: उत्तर- श्रीलंका
78) सुजय कशाशी संबंधित आहे?
: उत्तर- ऑफशोअर पेट्रोलिंग व्हेसल
79) बॉक्साईट या धातुकापासून कोणते खनिज निष्कर्षण केले जाते?
: उत्तर- ॲल्युमिनियम
80) कोणती शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी आहे व त्यातून पित्तरस स्त्रवतो?
: उत्तर- यकृत
81) आवाजाची तीव्रता मोजण्याचे परिमाण कोणते आहे?
: उत्तर- डेसिबल
82) बाल्कन प्रदेश हा कोणत्या देशाच्या साम्राज्यात मोडणारा प्रदेश होता?
: उत्तर- तुर्कस्तान
83) भारताने कोणत्या साली आपल्या अर्थव्यवस्थेचे जागतिकीकरण केले?
: उत्तर- 1991
84) भारतात कोणत्या प्रकारची लोकशाही आहे?
: उत्तर- अप्रत्यक्ष
85) पंचायत समितीचा कार्यकारी/प्रशासकीय अधिकारी कोण असतो?
: उत्तर- गटविकास अधिकारी
86) क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते?
: उत्तर- राजस्थान
87) अष्टविनायकांपैकी किती गणेश मंदिरे ही पुणे जिल्ह्यात आहेत?
: उत्तर- 5
88) अहमदनगर-कल्याण मार्गावर कोणता घाट आहे?
: उत्तर- माळशेज
89) पुणे जिल्ह्यातील भाडघर धरण हे कोणत्या नदीवर बांधलेले आहे?
: उत्तर- वेलवंडी
90) भारत सरकारने कोणत्या दिवशी चलनातून 500 व 1000 रुपयांच्या नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला होता?
: उत्तर- 8 नोव्हेंबर 2016
91) कृषी क्षेत्रातील पीतक्रांती म्हणजे कोणत्या उत्पादनातील वाढ होय.
: उत्तर- तेलबीया
92) निरा- नरसिहापुर हे तीर्थ क्षेत्र पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात येते?
: उत्तर- इंदापुर
93) बहुजन समाजाला राजकीय निर्णयप्रक्रियेत सामावून घेण्यासाठी कोणी 1916 रोजी डेक्कन रयत असोसिएशन ही संस्था स्थापन केली?
: उत्तर- छत्रपती शाहू महाराज
94) पाचगणी हे शहर वसविण्यात कोणाचे योगदान आहे?
: उत्तर- जॉन चेसन
95) महाबळेश्वर मधील पॉईंट मध्ये समुद्रसपाटीपासून सर्वात उंचावर कोणता पॉईंट आहे?
: उत्तर- आर्थरसीट
96) साताऱ्याचे अजिंक्यतारा किल्ल्यास सर्वप्रथम मराठ्यांचा राजधानीचा मान कोणी दिला?
: उत्तर- छत्रपती राजाराम राजे
97) थोर समाजसुधारक गोपाळ गणेश आगरकर हे मूळचे कोणत्या तालुक्यातील होते?
: उत्तर- कराड
98) महाराष्ट्र इंटेलिजन्स अकॅडमी कोठे आहे?
: उत्तर- पुणे
99) कोणता दिवस पोलीस शहीद दिन म्हणून ओळखला जातो?
: उत्तर- 21 ऑक्टोंबर
100) कोणत्या योजनेअंतर्गत लैंगिक अत्याचार झालेल्या महिलांना आर्थिक सहाय्य करता येते?
: उत्तर- मनोधैर्य
Q 1) हा भारताचा द्वितीय क्रमांकाचा शेती आधारित उद्योग आहे?
उत्तर :- साखर उद्योग
Q 2) दगडी कोळश्याच्या जागतिक उत्पादनात भारताचा कितवा क्रमांक आहे?
उत्तर :- चौथा
Q 3) महाराष्ट्रात पश्चिम किनारपट्टी व सह्याद्रीच्या पश्चिम उतार या भागात प्रामुख्याने -------प्रकारचा पाऊस पडतो?
उत्तर :- प्रतिरोध पर्जन्य
Q 4) भारतातील कोणत्या शहरात केंद्रीय सागरी संशोधन संस्था (NIO) कार्यरत आहे?
उत्तर :- पणजी (गोवा)
Q 5) मान्सूनपूर्व पडणाऱ्या सरींना महाराष्ट्रात काय ---------म्हणतात?
उत्तर :- आम्रसरी
Q 6) भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य कोणते?
उत्तर :- झारखंड
Q 7) जागतिक वारसा स्थळ यादित महाराष्ट्रातील कोणत्या स्थळांचा समावेश होतो?
उत्तर :- अजिंठा आणि वेरुळ
Q 8) अभयारण्यांची संख्या व क्षेत्रफळ सर्वात जास्त असलेले राज्य कोणते?
उत्तर :- महाराष्ट्र
Q 9) देशातील घनकचर्यापासून ऊर्जानिर्मितीचा पहिला प्रकल्प कोणत्या महानगरपालिकेने सुरु केलेला आहे?
उत्तर :- पुणे
Q 10) अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते?
उत्तर :- राजेवाडी
गांधी युगाचा उदय
सत्याग्रह या तंत्राचा वापर त्यांनी प्रथम आफ्रिकेत ब्रिटीशांविरुद्ध केला.
आफ्रिकेतील ब्रिटिश शासन व गांधीजी यांच्यात तडजोड करण्यासाठी सन 1912 मध्ये नामदार गोखले यांनी आफ्रिकेला भेट दिली. त्यावेळी त्यांना गांधीजीच्या सत्याग्रहांच्या तंत्राचा प्रत्यक्ष अनुभव घेतला.
जगातील कोणत्याही शक्तिपुढे न झुकणारे ब्रिटिश शासन गांधीजीच्या सत्याग्रहापुढे हतबल झाले होते. या भेटीत गोखल्यांनी गांधीजींना स्वातंत्र्याच्या लढ्याकरिता भारतात येण्याची विनंती केली. ही विनंती प्रमाण मानून गांधीजी भारतात परत आले.
जानेवारी 1915 मध्ये गोपाळ कृष्ण गोखले यांच्या आग्रहावरून गांधीजी भारतात परतले होते. ते गोखले यांना गुरुस्थानी मानत असत.
1. भारतातील चळवळी :
भारतात आल्यानंतर गांधीजींनी खालील चळवळी सुरू केल्या.
चंपारण्य सत्याग्रह (सन 1917) -
चंपारण्य (बिहार) भागातील निळीच्या मळ्यात काम करणार्या गरीब शेतकर्यांवर यूरोपियन मळेवाल्याव्दारे होणारा अन्याय दूर करण्याकरिता गांधीजींनी चंपारण्य चळवळ सुरू केली.
साराबंधी चळवळ (सन 1918) -
1918 गुजरातमधील खेडा जिल्ह्यामध्ये दुष्काळ पडून मोठ्या प्रमाणात दुष्काळामुळे पिके बुडाली असतांना ब्रिटिश अधिकारी शेतकर्याकडून जबरदस्तीने शेतसारा वसूल करीत असत.
गांधीजींनी शासनाच्या या कृती विरुद्ध खेडा येथे साराबंदी चळवळ सुरू केली.
शासनाने गांधीजींच्या चळवळीची दखल घेऊन दुष्काळग्रस्त भागात जमीन महसूल वसुलीला स्ग्थगिती देण्याचा निर्णय घेतला.
हा गांधीजीचा दूसरा विजय होता.
रौलॅक्ट अॅक्ट किंवा काळा कायदा सत्याग्रह (सन 1919) -
भारतातील राष्ट्रीय आंदोलन व क्रांतिकारी चळवळीला प्रतिबंध घालण्याकरिता ब्रिटिश शासनाने सर सिडने रौलेट यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या शिफारसीवरून अनार्काकल अँड रिव्हॉल्युशनरी क्राईम अॅक्ट पास केला.
या कायद्यातील तरतुदीनुसार कोणत्याही व्यक्तिला विना चौकशी अटक करण्याचा व त्याच्यावर तात्काळ खटला चालविण्याचा अधिकार शासनाला प्राप्त झाला होता.
या रौलॅक्ट कायद्याबद्दल निषेध करण्याकरिता 6 एप्रिल 1919 हा दिवस संपूर्ण भारतभर बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
हा काँग्रेसमार्फत पाळण्यात आलेला पहिला अखिल भारतीय बंद होय.
13 एप्रिल 1919 रोजी अमृतसरमधील जालियनवाला बागेत रौलेट कायद्याच्या निषेधार्थ सभा बोलाविण्यात आली.
या सभेवर जनरल डायर नावाच्या अधिकार्याने नीरपराध लोकांवर गोळीबार केला.
2. असहकार आंदोलन :
डिसेंबर 1920 मध्ये नागपूर येथे भरलेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा कार्यक्रम हाती घेण्यात आला.
सतत दोन वर्षे भारतात अहिंसक मार्गाने असहकार आंदोलन सुरू झाले.
फेब्रुवारी 1922 मध्ये उत्तरप्रदेशातील चौरीचौरा येथे एका हिंसक जमावाने पोलिस स्टेशनला आग लावली.
या आगीत पोलिस अधिकार्यासह 21 जन मृत्यूमुखी पडले.
या घटनेमुळे गांधीजींनी व्यथित होऊन अहसहकार आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली.
3. स्वराज्य पक्षाची स्थापना :
सन 1919 च्या कायदेमंडळाच्या कायद्यानुसार सन 1923 मध्ये निवडणूका होणार होत्या.
असहकार आंदोलन ठरावातील विधीमंडळाच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचे धोरण मागे घेऊन विधिमंडळाच्या निवडणुकीत भाग घ्यावा आणि तेथे शासनाची अडवणूक करण्याच्या उद्देशाने चित्तरंजनदास व मोतीलाल नेहरू यांनी सन 1923 मध्ये अलाहाबाद येथे स्वराज्य पक्षाची स्थापना केली.
काँग्रेसमधील फुट टळावी म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षाला मान्यता दिली व त्यांना विधीमंडळाच्या निवडणुकीत भाग घेण्यास मान्यता दिली.
4. सायमन कमिशन (1928) :
भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी डिसेंबर 1927 मध्ये भारतीयांना पुढील राजकीय सुधरणा देण्याच्या उद्देशाने अहवाल तयार करण्याकरिता सर जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली कमिशन नेमले.
या कमिशनमधील सातही सदस्य इंग्रज होते.
या कमिशनमध्ये एकही भारतीय नेत्यांस स्थान देण्यात आले नव्हते.
या घटनेमुळे राष्ट्रीय काँग्रेसने सायमन बहिष्कार टाकला.
5. नेहरू रिपोर्ट (1928) :
भारतमंत्री लॉर्ड बर्कनहेड यांनी सर्व पक्षांना मान्य असेल अशी राज्यघटना कोंग्रेसने तयार करावी असे आव्हान केले.
राष्ट्रीय कोंग्रेसने हे आव्हान स्विकारून फेब्रुवारी 1928 मध्ये घटनेचा मसुदा तयार करण्याकरिता मोतीलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली घटना समिती स्थापन करण्यात आली.
नेहरू समितीने तयार केलेला अहवाल भारताच्या इतिहासामध्ये नेहरू रिपोर्ट म्हणून ओळखला जातो.
6. सविनय कायदेभंग आंदोलन :
1229 चे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन पंडित जवाहरलाल नेहरू अध्यक्षतेखाली लाहोर येथे भरले होते.
या अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून बोलतांना पंडित नेहरु यांनी संपूर्ण स्वातंत्र्याची मागणी केली आणि महात्मा गांधीजी यांच्या नेतृत्वाखालील सविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.
26 जानेवारी 1930 हा दिवस संपूर्ण भारतभर स्वातंत्र्याच्या प्रतिज्ञेचा दिवस म्हणून पाळण्याचा निर्णय घेण्यात आला.
7. दांडी येथील मिठाचा सत्याग्रह :
सविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमाअंतर्गत गांधीजींनी दांडी येथे मिठाचा कायदा मोडण्याचा निर्णय घेतला.
12 मार्च 1930 रोजी गांधीजींनी साबरमती आश्रमातून गुजरातमधील दांडी येथे जाण्याकरिता आपल्या 78 अनुयायासह प्रवासाला सुरुवात केली.
385 किलोमीटर अंतर पार करून गांधीजी 6 एप्रिल रोजी दांडी येथे पोहचले. तेथे गांधीजी व त्यांच्या अनुसायांनी मिठाचा कायदा मोडला. याच घटनेबरोबर देशात अनेक ठिकाणी सविनय कायदेभंग आंदोलनाला सुरुवात झाली.
यामध्ये गुजरातमधील धरासना, महाराष्ट्रातील वडाळा(मुंबई), शिरोडा व मालवण (सिंधुदुर्ग) आणि कर्नाटकमधील शनिकट्टा इत्यादी ठिकाणे मिठाच्या सत्याग्रहात विशेष गाजले.
महाराष्ट्रातील बिळाशी, कळवण, संगमनेर व चीरनेर इत्यादि ठिकाणे जंगल सत्याग्रहामध्ये खूप प्रसिद्धीला आली.
सविनय कायदेभंग आंदोलनात खालील ठिकाणे प्रसिद्धीला आली.
6 मे रोजी सोलापूरच्या जिल्हाधिकार्याने लोकांना आवर घालण्यासाठी बेछूट गोळीबार करण्याचे आदेश दिले.
आंदोलन चिरडून टाकण्याकरिता शासनाने लष्कराला पाचारण केले व सोलापूर शहरात लष्करी कायदा लागू केला.
8. वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन :
सन 1940 मध्ये मौलाना आझाद यांच्या अध्यक्षतेखाली रामगढ येथे राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. या अधिवेशनामध्ये महात्मा गांधीजींनी वैयक्तिक सत्याग्रह आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली.
महात्मा गांधीजींनी वैयक्तिक आंदोलनाचे आपले पहिले अनुयायी म्हणून विनोबा भावे यांची निवड केली.
विनोभा भावेनंतर जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांची सत्याग्रही म्हणून निवड करण्यात आली होती.
9. भारत छोडो आंदोलन (1942) :
क्रिप्स योजनेनंतर स्वातंत्र्यासाठी प्रखर चळवळ करण्याचा निर्धार राष्ट्रीय सभेने केला.
14 जुलै 1942 रोजी वर्धा येथे सेवाग्राम आश्रमात भरलेल्या अखिल भारतीय काँग्रेस वर्किंग कमिटीच्या बैठकीत चलेजाव आंदोलन ठराव पास करण्यात आला.
8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथे गवालिया टॅक मैदानावर गांधीजींनी आपल्या भाषणात बोलतांना इंग्रजांना भारत सोडून जाण्याचा आदेश दिला. त्याच बरोबर भारतीयांनी या क्षणापासून स्वत:ला स्वतंत्र समजावे आणि स्वातंत्र्याच्या रक्षणाकरिता करा किंवा मरा असा संदेश दिला. त्यानंतर भारतात चलेजाव आंदोलनाला सुरुवात झाली.
प्रति सरकारे -
इंग्रज राजवट उलथून पडण्याचा एक भाग म्हणून राष्ट्रीय नेत्यांनी प्रतिसरकार स्थापन केले.
प्रतिसरकार म्हणजे इंग्रज शासनाचा कारभार बंद पाडून लोकांनी निवडलेल्या पंचायतीमार्फत गावगाड्याचा कारभार चालविणे होय.
चलेजाव आंदोलन काळामध्ये सातारा येथे नाना पाटील यांनी स्थापन केलेले प्रतिसरकार देशभर खूपच गाजले.
महाराष्ट्राखेरीज उत्तरप्रदेशमधील (बलिया), बिहारमधील (भागलपूर), बंगालमधील (मिदानपूर) येथील प्रतिसरकारे खूपच गाजली.
सशस्त्र प्रतिकाराची चळवळ -
सन 1934 मध्ये जयप्रकाश नारायण यांनी आचार्य नरेंद्र देव, डॉ. राममनोहर लोहिया, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांच्या सहकार्याने राष्ट्रीय काँग्रेस अंतर्गत समाजवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केला होती.
या संघटनेच्या अरुणा असफअली, उषा मेहता, एस.एम.जोशी, साने गुरुजी, जयप्रकाश नारायण, अच्युतराव पटवर्धन इ. लोकांनी गुप्तपणे रेडिओ केंद्रे चालवून सरकारी अत्याचाराच्या बातम्या प्रसारीत करणे, पत्रके छापणे व ती वाटणे इत्यादी कार्य भूमिगत राहून केले.
भारतीय सैनिकाचा उठाव -
चलेजाव आंदोलनाच्या काळात 18 फेब्रुवारी 1946 रोजी मुंबईतील तलवार युद्धनौकेवरील भारतीय सैनिकांनी ब्रिटिश शासनाविरुद्ध बंड उभारले. बी.सी. दत्त या उठावाचे प्रमुख होते.
या पाठोपाठ कराची व मद्रास येथील नाविक दलात उठाव झाला.
नौसेनेच्या उठावाला पाठींबा देण्याकरिता कराची, अंबाला व दिल्ली येथील विमानदलातील सैनिकांनी उठाव केला.
सरदार वल्लभभाई पटेलांनी उठावात मध्यस्ती केल्यामुळे सैनिकांचा हा उठाव शमला.
10. भारताची स्वातंत्र्याकडे वाटचाल :
सन 1945 मध्ये इंग्लंडमध्ये सत्ताबदल होऊन मेजर अॅटली यांच्या नेतृत्वाखाली मजूर पक्ष सत्तेत आला. हा पक्ष सुरुवातीपासून स्वातंत्र्य देण्याच्या बाजूने होता.
मार्च 1946 मध्ये पार्लमेंटमध्ये बोलतांना मेजर अॅटली यांनी इंग्लंड लवकरच भारताला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न करेल व त्याविषयी वाटाघाटी करण्याकरिता भारतात एक कमिशन पाठविण्याची घोषणा केली.
त्रिमंत्री योजना (सन 1946) -
या घोषनेनुसार मेजर अॅटली 24 मार्च 1946 रोजी स्टफर्ड क्रिप्स, लॉर्ड पेथिक लॉरेन्स व ए.व्ही. अलेक्झांडर हे तीन सभासदांचे कमिशन भारतात पाठविले.
या त्रिमंत्री कमिशनने राष्ट्रीय काँग्रेसची स्वातंत्र्याची मागणी मान्य करून एक योजना भारतीयांपुढे मांडली. ही योजना त्रिमंत्री योजना म्हणून प्रसिद्ध आहे.
हंगामी सरकार -
त्रिमंत्री कामिशनच्या योजनेनुसार त्यावेळचे व्हॉईसरॉय वेव्हेलने 2 सप्टेंबर 1946 रोजी पंडित नेहरू यांच्या नेतृत्वाखाली हंगामी सरकारची स्थापना करण्यात आली.
माऊंट बॅटन योजना -
24 मार्च 1947 रोजी माऊंट बॅटन भारतात आले.
भारतात आल्याबरोबर निरनिराळ्या पक्षांच्या राजकीय नेत्यांशी भेटी घेऊन फाळणीची योजना तयार केली.
3 जून 1947 रोजी ही योजना प्रसिद्ध करण्यात आली.
मुस्लिम लीग व राष्ट्रीय काँग्रेसने या योजनेला मान्यता दिल्यानंतर ब्रिटिश संसदेने 18 जुलै 1947 रोजी भारतीय स्वातंत्र्याचा कायदा पास केला.
___________________________________
बलवंतराय मेहता समिती.
♦️सथापना :- 16 जानेवारी 1957.
♦️अहवाल सादर :- 27 नोव्हेंबर 1957.
♦️सदस्य :- फुलसिंग ठाकूर, बी.जी. राव, डी.पी. सिंग.
♦️राष्ट्रीय विकास परिषदेने जानेवारी 1958 मध्ये अहवाल स्वीकारला.
⭕️♦️⚠️बलवंतराय मेहता समितीच्या महत्वाच्या शिफारशी :-
♦️तीन स्तरावर ग्राम प्रशासन व्यवस्था.
♦️जिल्हाधिकारी हा जि.प.चा पदसिध्द अध्यक्ष.
♦️जि.प. मध्ये खासदार, आमदार, मध्यम स्तर पंचायतीचे अध्यक्ष, जि.प. अधिकारी यांना सदस्यत्व.
♦️पचायत समितीचे ग्रामपंचायतीद्वारे अप्रत्यक्ष गठन.
♦️गरा.पं. ची स्थापना प्रौढ व प्रत्यक्ष निवडणुकीने.
♦️गरा.पं. मध्ये 2 महिला व 1 अनु. जाती-जनजाती हे स्वीकृत सदस्य.
♦️कर चुकव्याना मतदानाचा अधिकार नसावा.
♦️दोन / जास्त ग्रा.पं. ची मिळून न्यायपंचायत.
गटविकास अधिकारी (B.D.O) बद्दल संपूर्ण माहिती.
🅾️ पचायत समितीचा सचिव गटविकास अधिकारी असतो.
🅾️गटविकास अधिकार्याची निवड महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होते तर त्याची नेमणूक महाराष्ट्र शासन करते.
🅾️ गटविकास अधिकारी हा वर्ग 1 व वर्ग 2 दर्जाचा अधिकारी असतो.
🅾️गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा प्रशासकीय अधिकारी असतो.
🅾️गटविकास अधिकारी हा पंचायत समितीचा कार्यकारी अधिकारी असतो.
🅾️गटविकास अधिकार्यावर नजिकचे नियंत्रण जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्याचे असते.
🅾️ गटविकास अधिकारी हा पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव असतो.
🅾️पचायत समितीचे अंदाजपत्रक गटविकास अधिकारी तयार करतो.
🅾️पचायत समितीस मिळणार्या अनुदानातील रकमा काढण्याचे व त्यांचे वाटप करण्याचे अधिकार गटविकास अधिकार्याला आहेत.
🅾️ पचायत समितीच्या वर्ग 3 व वर्ग 4 कर्मचार्यांच्या रजा मंजूर करण्याचा अधिकार गटविकास अधिकार्याला आहेत.
🅾️ पचायत समितीचा खर्च गटविकास अधिकार्याच्या संमतीने करावा लागतो.
🅾️पचायत समितीचा अहवाल गटविकास अधिकारी सी.ई.ओ.कडे पाठवीत असतो.
🅾️पचायत समितीच्या कार्याची यशस्वीता गटविकास अधिकार्यावर अवलंबून असते.
🅾️गटविकास अधिकार्याला शिक्षा करण्याचा अधिकार विभागीय आयुक्तास असतो.
🅾️ पचायत समिती व जिल्हा परिषद यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
🅾️ राज्यशासन व पंचायत समिती यामधील दुवा म्हणून गटविकास अधिकारी काम पाहतो.
जिल्हा परिषदेबद्दल संपूर्ण माहिती:
जिल्हा परिषद ही पंचायतराजमधील महत्वाची संस्था असून त्यातील शिखर संस्था म्हणून ओळखली जाते. नाईक समितीच्या शिफारशिनुसार महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 कलम क्र.6 नुसार प्रत्येक जिल्हयासाठी नागरी जिल्हे सोडून एक जिल्हा परिषद स्थापन करण्यात आली. महाराष्ट्रात जिल्हा परिषदेची स्थापना 1 मे, 1962 रोजी करण्यात आली.
रचना :-
प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये एक अध्यक्ष आणि जिल्हापरिषद सदस्य मिळून एक जिल्हापरिषद निर्माण करण्यात येईल.
सभासद संख्या -
प्रत्येक जिल्हापरिषदेमध्ये लोकसंख्येनुसार राज्य निवडणूक आयोगाने ठरवून दिल्याप्रमाणे कमीत 50 व जास्तीत जास्त 75 इतके सभासद असतात. हे सर्व सदस्य प्रत्यक्ष निवडणुकीव्दारे निवडले जातात. स्वीकृत सदस्य पद्धत पुर्णपणे बंद करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील सर्व पंचायत समितीचे सर्व सभापती हे जिल्हापरिषदेचे पदसिद्ध सदस्य असतात.
सभासदांची निवडणूक -
प्रत्यक्ष प्रौढ गुप्त मतदान पद्धतीने राज्यनिर्वाचन आयोग दर पाच वर्षानी होते.
पात्रता (सभासदांची) -
जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडणूक लढविण्याकरिता पुढील पात्रतेच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे.
1. तो भारताचा नागरिक असावा.
2. त्याच्या वयाची 21 वर्ष पूर्ण झालेली असावी.
3. 1961 च्या कायद्याप्रमाणे (जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम) किंवा त्यामध्ये केलेल्या बदलानुसार पात्र असावा.
आरक्षण :
1961 च्या जिल्हा परिषद स. अधिंनियमातील कलम क्र. 12/2 (A) विशिष्ट जागा राखीव ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.
तसेच महिलांसाठी राखीव जागांची तरतूद 110 व्या घटना दुरूस्तीनुसार सहयोगी सदस्य घेण्याची पद्धत बंद करण्यात आली. फक्त सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे सदस्य असतात.
कार्यकाल :
5 वर्ष इतका असतो परंतु काही कारणावरून जिल्हापरिषद विसर्जित करण्याचा अधिकार राज्यशासनाला आहे. अशी जिल्हा परिषद विसर्जित झाल्यानंतर या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत निवडणुका घेणे बंधनकारक आहे.
अध्यक्ष / उपाध्यक्षाची निवड :
जिल्हा परिषदेतील निवडून आलेल्या सदस्यांमधुनच अध्यक्ष/उपाध्यक्षांची निवड केली जाते. परंतु काही कारणांवरून त्यांच्या निवडीच्यावेळी तंटा निर्माण झाल्यास त्या तारखेपासून 30 दिवसांच्या आत विभागीय आयुक्ताकडे तक्रार करावी लागते. त्याने दिलेल्या निर्णयाविरुद्ध 30 दिवसांच्या आत राज्य सरकारकडे तक्रार करावी लागते.
कार्यकाल :
अध्यक्ष / उपाध्यक्षांचा कार्यकाल इ.स 2000 च्या तरतुदींनुसार अडीच वर्ष इतका करण्यात आला आहे.
राजीनामा :
1. अध्यक्ष - विभागीय आयुक्ताकडे
2. उपाध्यक्ष - जिल्हा परिषद अध्यक्षाकडे
मानधन :
1. अध्यक्ष - 20,000/-
अविश्वासाचा ठराव - अध्यक्ष/उपाध्यक्षाची निवड झाल्यापासून 6 महिन्यांपर्यंत अविश्वासाचा ठराव मांडता येत नाही आणि तो फेटाळल्यास त्या तारखेपासून 1 वर्षापर्यंत मांडता येत नाही.
सचिव - जिल्हा परिषदेचा पदसिद्ध सचिव हा मुख्य कार्यकारी अधिकारी असतो.
बैठक :
जिल्हा परिषदेच्या एका आर्थिक वर्षात चार बैठका होतात. म्हणजेच दर तीन महिन्यांनी एक बैठक घेतली जाते.
मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) : प्रत्येक जिल्हा परिषदेसाठी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून नेमलेला असतो. तो भारतीय प्रशासन सेवेसाठी आयएएस दर्जाचा अधिकारी असतो. त्याची नेमणूक आणि बदली करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे.
परीक्षेसाठी महत्वाचे
◆ ग्रामपंचायतीचा प्रशासकीय प्रमुख - ग्रामसेवक
◆ ग्रामपंचायतीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सरपंच
◆ ग्रामपंचायतीचा सचिव - ग्रामसेवक
◆ ग्रामसभेचे अध्यक्षस्थान - सरपंच
◆ सरपंचाच्या अनुपस्थित - उपसरपंच
◆ पंचायत समितीच्या प्रशासकीय प्रमुख - गटविकास अधिकारी
◆ पंचायत समितीचा वास्तव कार्यकारी प्रमुख - सभापती
◆ पंचायत समितीचे सचिव - गटविकास अधिकारी
◆ पंचायत समितीच्या स्थायी समितीचा पदसिद्ध सचिव - BDO
◆ सरपंच समितीचे पदसिद्ध अध्यक्ष - पं. समितीचे उपसभापती
◆ सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव - विस्तार अधिकारी
◆ जिल्हा परिषदेचे प्रशासकीय प्रमुख - CEO
◆ जिल्हा परिषदेचे वास्तू कार्यकारी प्रमुख - जि. प. अध्यक्ष
◆ जिल्हा परिषदेचे पदसिद्ध सचिव - Dy. CEO
◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध अध्यक्ष - जि. प. अध्यक्ष
◆ जि. प. स्थायी समिती पदसिद्ध सचिव - Dy. CEO
◆ जिल्हा आमसभेचे अध्यक्ष - पालकमंत्री
◆ जिल्हा आमसभेचे सचिव - जिल्हाधिकारी
◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे अध्यक्ष - पालकमंत्री
◆ जिल्हा नियोजन व विकास मंडळाचे सचिव - जिल्हाधिकारी
◆ नगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - मुख्याधिकारी
◆ नगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - नगराध्यक्ष
◆ नगरपालिकेचा पदसिद्ध सचिव - मुख्याधिकारी
◆ महानगरपालिकेचा प्रशासकीय प्रमुख - आयुक्त
◆ महानगरपालिकेचा वास्तव कार्यकारी प्रमुख - महापौर
◆ महानगरपालिकेचा सचिव - आयुक्त